शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शहर ‘अ’ दर्जाचे, वेतन ‘ब’ दर्जाचे

By admin | Updated: February 20, 2016 01:10 IST

केंद्र सरकारच्या वित्त विभागाने पुणे अर्बन एरियाला (पुणे व पिंपरी-चिंचवड एकत्रित) अ दर्जा जाहीर करून वर्ष उलटले. या परिसरातील आपल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने त्यासाठीच्या

पुणे : केंद्र सरकारच्या वित्त विभागाने पुणे अर्बन एरियाला (पुणे व पिंपरी-चिंचवड एकत्रित) अ दर्जा जाहीर करून वर्ष उलटले. या परिसरातील आपल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने त्यासाठीच्या खास भत्ताही लागू केला, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मात्र त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडे डोळे लावून बसावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असून त्यामुळे या भागातील लाखो सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.लोकसंख्येच्या निकषावर केंद्र सरकार देशातील शहरांना काही विशिष्ट दर्जा बहाल करीत असते. ५० लाख लोकसंख्या ओलांडणाऱ्या शहराला अ दर्जा, त्या खालोखाल ब व नंतर क अशी विभागणी करण्यात येते. या दर्जावर त्या शहरातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर अनुक्रमे ३०, २० व १० टक्के असा खास भत्ता मिळतो. पुणे अर्बन एरिया या भागाला गेली अनेक वर्षे ब दर्जा होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर २० टक्के भत्ता दिला जात होता. वर्षभरापूर्वी केंद्र सरकारच्या वित्त विभागाने हा दर्जा बदलून अ केला. त्यानंतर लगेचच कर्मचाऱ्यांच्या खास भत्त्यातही वाढ होणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने या भागातील आपल्या कर्मचाऱ्यांना (केंद्र सरकारी आस्थापनेत असलेले) हा खास भत्ता लगेचच वाढवून दिला व तोही पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ एप्रिल २०१५ पासून. राज्य सरकारने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष विनायक लहाडे यांनी सांगितले. राज्य सरकारचे या भागातील सर्व कर्मचारी, अनुदानित शाळांमधील (सरकारी तसेच खासगी अनुदानितही) शिक्षक, कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, अशा किमान १ लाखापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना या खास भत्त्याचा लाभ मिळू शकतो. मूळ वेतन ३० हजार रुपये असेल (वर्ग-१) तर त्यांना सध्या त्यावर २० टक्के भत्ता मिळतो. त्यात १० टक्के वाढ होईल. म्हणजे हा भत्ता ३ हजार रुपये होईल. याचप्रकारे वर्ग -२ च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २ ते अडीच हजार, वर्ग-३च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ हजार रुपये वाढ होईल. त्यामुळे सर्व कर्मचारी या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकार मात्र त्यांना आश्वासन देण्याशिवाय दुसरे काहीही करायला तयार नाही. (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांचा हा न्याय्य हक्क आहे, सरकारचा आपल्याच कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित आहे हे यावरून सिद्ध होते. आंदोलन झाल्याशिवाय काही द्यायचेच नाही असे त्यांचे धोरण दिसते आहे.- लक्ष्मीकांत पाचारणे, अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना