शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

शहरात उन्हाळी शिबिरांचे फुटले पेव

By admin | Updated: April 25, 2015 05:10 IST

सध्या शहराच्या विविध भागांत अभिनय- नाट्य, क्रीडा, कला अशा वेगवेगळ्या शिबिरांचे मोठे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत.

अमोल जायभाये, पिंपरीसध्या शहराच्या विविध भागांत अभिनय- नाट्य, क्रीडा, कला अशा वेगवेगळ्या शिबिरांचे मोठे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहेत. शहरात सध्या उन्हाळी शिबिरांचे पेव फुटले आहे. शिबिराचे आयोजन करण्यासाठी लागणारे प्रशिक्षक, प्रशिक्षित व्यक्तींची कमतरता असल्याने मुलांना कोणाकडे आणि कसे पाठवायचे, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. शहरामध्ये उन्हाळी शिबिरांचे फॅ ड मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शाळेला सुट्टी लागताच शिबिराच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्याकडे कल वाढत आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा शहरातील वेगवेगळ्या भागात या उन्हाळी शिबिरांचा बोजवारा झाला आहे. त्यामध्ये काय शिकवले जाते आणि कोण शिकवते, याकडे लक्ष नसल्यामुळे मुलांचा विकास होण्याऐवजी नुकसानच होत आहे. उन्हाळी शिबिरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी शिबिराला पाठवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळी शिबिराचा दर्जा घसरत चालला आहे. पाच ते सहा दिवसांच्या शिबिरातून काय सिद्ध होणार, हे माहितीच नसते. अनेक प्रकारची शिबिरे असतात. त्या शिबिरांचे शुल्क ही ३००० रुपयांपासून १०,०००पर्यंत व त्यापेक्षाही जास्त आहेत. त्यांचे आयोजन एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत करण्यात येते. यामध्ये क्रीडा शिबिरे, डान्स शिबिरे, साहसी खेळ, कला, जंगल सफरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मात्र, शिबिरांचे आयोजन करताना त्यातील प्रशिक्षकांच्या गुणकौशल्यांची माहिती घेतली जात नाही. अनेक शिबिरे असे आहेत, की तेथे दोन-तीन तासच मुलांना शिकवले जाते. शिबिरातील प्रमुख शिक्षक राज्यस्तरावर किंवा इतर ठिकाणी झळकलेले असतात. त्यांच्या नावावर शिबिरे भरवली जातात. मात्र, प्रत्यक्षात मुलांना शिकवण्यासाठी दुसरेच प्रशिक्षक मानधनावर घेतलेले असतात. त्यामुळे मुलांना प्रशिक्षकांचा काहीच फायदा होत नाही वा त्यांच्याकडून काही शिकायलाही मिळत नाही. शिबिराचे आयोजन करताना त्यांची व्यवस्थित माहिती घेतलेली नसते. त्यासाठी अधिकृत मार्गदर्शक नसतो. त्यामुळे मुलांना काहीच शिकायला मिळत नाही. शिबिरामध्ये मुलांवर संस्कार व्हायला हवेत. त्यामध्ये चांगल्या प्रशिक्षकांच्या हाताखाली त्या-त्या क्षेत्रातील बारीक सारीक गोष्टींची माहिती मिळाली पाहिजे. त्यामध्ये करिअर करण्यासाठी त्याचा काही उपयोग होणे गरजेचे असते. शिबिरामध्ये विद्यार्थी किती असावेत, याची मर्यादा नसते. जितके प्रवेश मिळतील, त्या प्रमाणात विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष देता येत नाही वा त्यांना कोणत्याही गोष्टी शिकवता येत नाहीत. शिबिरामध्ये प्रवेश घेताना पालकांना मुलांनी काही ना काही तरी शिकावे. त्याचा फायदा अभ्यासात आणि कलागुणांमध्ये दिसावा, यासाठी ते पैसे भरत असतात. मात्र, त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.