शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र जिल्ह्यात १४ तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र जिल्ह्यात १४ तर पुण्यात केवळ ३ केंद्रे या वयोगटातील लसीकरणासाठी आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, लसींचा पुरवठा कमी असल्याने शहरातील नागरिक हे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यास येत आहे. यामुळे स्थानिक लसीकरणापासून वंचित राहत असल्यामुळे या केंद्रावर तणाव निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील केंद्रावर केवळ स्थानिकांनाच प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू असली तरी लसीच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील अनेक केंद्रेही बंद आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार ही केंद्र सुरू केली जाईल, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे. मात्र, अजूनही योग्य पुरवठा झालेला नाही. १८ ते ४४ वयोगातील लसीकरणासाठी प्रत्येक तालुक्यात एक केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रावर रोज १०० जणांचेच लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. कोरोनाचा प्रभाव हा कमी होत नसल्याने तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, लस उपलब्ध नसल्याने शहरातील केंद्रेही बंद आहे. यामुळे शहरी भागातील नागरिकांनी लसीकरणासाठी त्यांचा माेर्चा हा ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर वळवला आहे. शहरातील नागरिक ऑनलाइन नोंदणी सुरू होताच लवकर नाेंदणी करतात. यामुळे १०० ची नोंदणी ही लवकरच संपते. दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात असणाऱ्या या केंद्रांवर पुण्यातून येणाऱ्यांच्या रांगा लागत आहे. यात स्थानिक नागरिक नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ उडत आहे. आम्हाला आधी लस द्या, अशी भूमिका स्थानिक नागरिक घेत असल्यामुळे केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, डिंभेसारख्या दुर्गम भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील लोक लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहेत.

पुणे, मुंबई, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरांमध्ये लसीकरण करण्यासाठी दिवसभर रांगेत उभे रहावे लागते. टोकण काढावे लागते व एवढे करूनही लस मिळेल ह्याची शाश्वती नसते. त्यामुळे शहरी भागातील लोकांचे तीन ते चार दिवस लसीकरणासाठी जात आहेत. स्थानिकांची होणारी ही परवड थांबवण्यासाठी शहरातील लोकांना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात येऊ नये, अशी मागणी आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहंडुळे, आदिवासी नेते मारुती केंगले यांनी केली आहे.