शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र जिल्ह्यात १४ तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र जिल्ह्यात १४ तर पुण्यात केवळ ३ केंद्रे या वयोगटातील लसीकरणासाठी आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, लसींचा पुरवठा कमी असल्याने शहरातील नागरिक हे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यास येत आहे. यामुळे स्थानिक लसीकरणापासून वंचित राहत असल्यामुळे या केंद्रावर तणाव निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील केंद्रावर केवळ स्थानिकांनाच प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू असली तरी लसीच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील अनेक केंद्रेही बंद आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार ही केंद्र सुरू केली जाईल, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे. मात्र, अजूनही योग्य पुरवठा झालेला नाही. १८ ते ४४ वयोगातील लसीकरणासाठी प्रत्येक तालुक्यात एक केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रावर रोज १०० जणांचेच लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. कोरोनाचा प्रभाव हा कमी होत नसल्याने तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, लस उपलब्ध नसल्याने शहरातील केंद्रेही बंद आहे. यामुळे शहरी भागातील नागरिकांनी लसीकरणासाठी त्यांचा माेर्चा हा ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर वळवला आहे. शहरातील नागरिक ऑनलाइन नोंदणी सुरू होताच लवकर नाेंदणी करतात. यामुळे १०० ची नोंदणी ही लवकरच संपते. दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात असणाऱ्या या केंद्रांवर पुण्यातून येणाऱ्यांच्या रांगा लागत आहे. यात स्थानिक नागरिक नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ उडत आहे. आम्हाला आधी लस द्या, अशी भूमिका स्थानिक नागरिक घेत असल्यामुळे केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, डिंभेसारख्या दुर्गम भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील लोक लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहेत.

पुणे, मुंबई, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरांमध्ये लसीकरण करण्यासाठी दिवसभर रांगेत उभे रहावे लागते. टोकण काढावे लागते व एवढे करूनही लस मिळेल ह्याची शाश्वती नसते. त्यामुळे शहरी भागातील लोकांचे तीन ते चार दिवस लसीकरणासाठी जात आहेत. स्थानिकांची होणारी ही परवड थांबवण्यासाठी शहरातील लोकांना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात येऊ नये, अशी मागणी आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहंडुळे, आदिवासी नेते मारुती केंगले यांनी केली आहे.