शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रस्ता नसल्याने नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:50 IST

साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चासकमान : साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनदेखील रस्ताच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.निर्मळवाडी गावातील उपाळवाडी, लोहकरेवाडी, टोकेवाडी आदी वाड्यांमध्ये ३०० ते ४०० लोकांची नागरी वस्ती आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. परंतु या वस्त्याकडे जाण्यासाठी अद्याप रस्ताच झाला नसल्याने नागरिकांना शेताच्या बांधावरून वाट काढत प्रवास करावा लागतो. आम्ही गावचे नागरिक आहोत की नाही आणि असू तर मग असा अन्याय का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना शेतात गुडघ्या एवढा गाळ तुडवत वाट काढत प्रवास करावा लागत आहे. तर वाडीतील एखादा नागरिक अजारी पडला तर पुढील उपचारासाठी नेताना नागरिकांना झोळी करून न्यावे लागते. यामुळे एखादी अकस्मिक घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मुख्य व्यवसाय शेती असल्याने परिसरात शेतक-यांना पावळ्यात शेती पासून एकमेव उत्पन्न निघत असते. परंतु शेतात जाण्यासाठी तसेच मालाची ने आण करण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचणी येत आहेत. साकुर्डी येथील शाळेमध्ये जाण्यासाठी जवळपास 30 विद्यार्थ्यांना पाण्याचा प्रवाह आणि धोकादायक पायवाट ओलांडून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन तात्काळ रस्ता तयार करुन देण्याची मागणी चिंधू लोहकरे, तुकाराम गाडेकर, रामदास लांघी, चिमाजी लोहकरे, ज्ञानेश्वर लोहकरे, महादू लोहकरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.>आमची संपूर्ण हयात गेली; परंतु आमच्याकडे अद्याप रस्ताच झाला नाही. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही. आमच्या घराकडं कुठल्याही प्रकारचे वाहन येत नाही. आमच्याकडे दोन महिने लाईट नाही.- गीताबाई लोहकरे>आम्हा विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतर पार करून शाळेत जावे लागते. शाळेत जाताना शेताच्या बांधावरून, ओढ्यातून जावे लागते. एखादा मोठा पाऊस झाल्यावर पूर येत असल्याने आमची शाळा बुडते. कधी कधी आमचे आई-वडील शाळेत सोडण्यासाठी येतात. आमची रस्त्याची सोय व्हावी.- रोशन लांघी