शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रस्ता नसल्याने नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:50 IST

साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चासकमान : साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनदेखील रस्ताच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.निर्मळवाडी गावातील उपाळवाडी, लोहकरेवाडी, टोकेवाडी आदी वाड्यांमध्ये ३०० ते ४०० लोकांची नागरी वस्ती आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. परंतु या वस्त्याकडे जाण्यासाठी अद्याप रस्ताच झाला नसल्याने नागरिकांना शेताच्या बांधावरून वाट काढत प्रवास करावा लागतो. आम्ही गावचे नागरिक आहोत की नाही आणि असू तर मग असा अन्याय का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना शेतात गुडघ्या एवढा गाळ तुडवत वाट काढत प्रवास करावा लागत आहे. तर वाडीतील एखादा नागरिक अजारी पडला तर पुढील उपचारासाठी नेताना नागरिकांना झोळी करून न्यावे लागते. यामुळे एखादी अकस्मिक घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मुख्य व्यवसाय शेती असल्याने परिसरात शेतक-यांना पावळ्यात शेती पासून एकमेव उत्पन्न निघत असते. परंतु शेतात जाण्यासाठी तसेच मालाची ने आण करण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचणी येत आहेत. साकुर्डी येथील शाळेमध्ये जाण्यासाठी जवळपास 30 विद्यार्थ्यांना पाण्याचा प्रवाह आणि धोकादायक पायवाट ओलांडून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन तात्काळ रस्ता तयार करुन देण्याची मागणी चिंधू लोहकरे, तुकाराम गाडेकर, रामदास लांघी, चिमाजी लोहकरे, ज्ञानेश्वर लोहकरे, महादू लोहकरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.>आमची संपूर्ण हयात गेली; परंतु आमच्याकडे अद्याप रस्ताच झाला नाही. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही. आमच्या घराकडं कुठल्याही प्रकारचे वाहन येत नाही. आमच्याकडे दोन महिने लाईट नाही.- गीताबाई लोहकरे>आम्हा विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतर पार करून शाळेत जावे लागते. शाळेत जाताना शेताच्या बांधावरून, ओढ्यातून जावे लागते. एखादा मोठा पाऊस झाल्यावर पूर येत असल्याने आमची शाळा बुडते. कधी कधी आमचे आई-वडील शाळेत सोडण्यासाठी येतात. आमची रस्त्याची सोय व्हावी.- रोशन लांघी