शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नसल्याने नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:50 IST

साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चासकमान : साकुर्डी (ता. खेड) या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निर्मळवाडी ते उपाळवाडी आदी वाड्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनदेखील रस्ताच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.निर्मळवाडी गावातील उपाळवाडी, लोहकरेवाडी, टोकेवाडी आदी वाड्यांमध्ये ३०० ते ४०० लोकांची नागरी वस्ती आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. परंतु या वस्त्याकडे जाण्यासाठी अद्याप रस्ताच झाला नसल्याने नागरिकांना शेताच्या बांधावरून वाट काढत प्रवास करावा लागतो. आम्ही गावचे नागरिक आहोत की नाही आणि असू तर मग असा अन्याय का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना शेतात गुडघ्या एवढा गाळ तुडवत वाट काढत प्रवास करावा लागत आहे. तर वाडीतील एखादा नागरिक अजारी पडला तर पुढील उपचारासाठी नेताना नागरिकांना झोळी करून न्यावे लागते. यामुळे एखादी अकस्मिक घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मुख्य व्यवसाय शेती असल्याने परिसरात शेतक-यांना पावळ्यात शेती पासून एकमेव उत्पन्न निघत असते. परंतु शेतात जाण्यासाठी तसेच मालाची ने आण करण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचणी येत आहेत. साकुर्डी येथील शाळेमध्ये जाण्यासाठी जवळपास 30 विद्यार्थ्यांना पाण्याचा प्रवाह आणि धोकादायक पायवाट ओलांडून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन तात्काळ रस्ता तयार करुन देण्याची मागणी चिंधू लोहकरे, तुकाराम गाडेकर, रामदास लांघी, चिमाजी लोहकरे, ज्ञानेश्वर लोहकरे, महादू लोहकरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.>आमची संपूर्ण हयात गेली; परंतु आमच्याकडे अद्याप रस्ताच झाला नाही. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही. आमच्या घराकडं कुठल्याही प्रकारचे वाहन येत नाही. आमच्याकडे दोन महिने लाईट नाही.- गीताबाई लोहकरे>आम्हा विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतर पार करून शाळेत जावे लागते. शाळेत जाताना शेताच्या बांधावरून, ओढ्यातून जावे लागते. एखादा मोठा पाऊस झाल्यावर पूर येत असल्याने आमची शाळा बुडते. कधी कधी आमचे आई-वडील शाळेत सोडण्यासाठी येतात. आमची रस्त्याची सोय व्हावी.- रोशन लांघी