शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST

-- इंदापूर : इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये ठराविक यावेळेस नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजेच्या ...

--

इंदापूर : इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये ठराविक यावेळेस नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंसह इतर व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली होती. वैद्यकीय सेवा सर्वांना दिवसभर देण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊन संपत नाही तोच आणखी १५ जूनपर्यंत लॉकडाऊनचे आदेश आले असून, आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सूट देण्यात आली. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे समाजातील सर्वच घटकांतील लघू व्यावसायिक, व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग, यांच्यामध्ये चिंता व्यक्त होत आहे.

इंदापूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात, बेरोजगार युवकांनी राष्ट्रीय बँकांकडून लाखाचे कर्ज घेऊन आपले उद्योग, व्यवसाय सुरू केले. यामध्ये भाडेतत्त्वावर महागड्या व्यापारी संकुलातील दुकाने घेऊन, त्यामध्ये लाखो रुपयांचा माल खरेदी करून विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवला आहे. मात्र, वाढत्या लॉकडाऊनमुळे मालाची विक्री मोठ्या प्रमाणात थांबल्यामुळे, व्यापार करणाऱ्यांना घटकांना बँकेच्या दर महिन्याच्या कर्जाची परतफेड करण्याची असमर्थता व्यक्त होत आहे. ज्या खासगी दुकानांना भाडेतत्त्वावर घेतले आहेत. त्याचे भाडेसुद्धा भरण्यास अकार्यक्षम ठरत असून, राष्ट्रीय बँकांची दर महिन्याचे हप्ते भरावे लागतात. यासाठी पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे कापड व्यापार यासह इतर उद्योग करणाऱ्यांमध्ये दररोज होत असलेला व्यवहार थांबल्यामुळे सर्व घटकांतील व्यापारी आर्थिक संकटात पुरते सापडले आहेत.

इंदापूर शहरातील तर वेगवेगळ्या उद्योगांवर संक्रांत आली आहे. एवढेच नाही तर जीवनावश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणाऱ्या किराणा व्यावसायिक यांनासुद्धा जेमतेम कमी वेळ देण्यात आल्यामुळे, त्यांचा माल सुद्धा कमी स्वरूपात विक्री होत असल्याने त्यांच्यामध्ये चिंता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांकडे मागील कर्ज थकीत असल्यामुळे, शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन आणि इतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे घेण्याची गरज असून, शेतकऱ्यांना राष्ट्रीय बँकांकडून आणि खासगी बॅंकांकडून लवकरात लवकर कर्ज मागणी होत आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे उपलब्ध व्हावे, याकरिता कृषी सेवा केंद्र खुले ठेवण्यात येत असून, शेतकऱ्यांना हमी युक्त बियाणे मिळावे, यासाठी प्रशासनाकडून तालुका कृषी अधिकारी, तसेच इतर प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

--

चौकट :

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करणे गरजेचे

सद्य:स्थितीत माॅन्सून वारे धडकले असून, शेतकऱ्यांमध्ये पेरणीची आणि शेतीच्या मशागतीची तयारी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, दर वर्षी मिळणाऱ्या राष्ट्रीय बँकांकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट होत असून, अर्धे अधिक शेतकरी अवैध सावकारीच्या सवाई दीडच्या विळख्यात अडकण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शक्यतोवर वेळेच्या आत पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास अवैध सावकारीच्या विळख्यातून त्याची मुक्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

___

चौकट :

इंदापूर शहरातील जुन्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास कशासाठी ?

इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांना थोडे समजून घ्या. असा सल्ला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिला असताना देखील, कारवाईचा बडगा पुढे येत आहे. इंदापूर शहरात तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे, तालुक्यातील १४० गावांतून नागरिक काही वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. खरेदीसाठी अपुरा वेळ असल्यामुळे व दुकानांमध्ये गर्दी करायची नाही, असा दंडक असल्यामुळे थोडाफार अवधी पाच दहा मिनिटांचा दुकान बंद करण्यासाठी लागला, तर शासकीय दंडक दाखवून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना कायम वरदान ठरणाऱ्या या व्यापाऱ्यांना नाहक त्रास नको, असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.