शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

नागरिकांना पडला पाणीटंचाईचा विसर

By admin | Updated: March 5, 2016 00:51 IST

पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे

पुणे : पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे. गेल्या ३ महिन्यांत केवळ ५३ तक्रारी या हेल्पलाइनवर करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर तक्रारींचा सुरू झालेला ओघ कमी झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी, बांधकामासाठी वापरले जात असल्यास, पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे दिसून आल्यास, पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक ०२०- २५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना कुणाल कुमार यांनी केल्या होत्या. पाण्याच्या तक्रारींसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सुरुवातीला तक्रारींचा मोठा पाऊस पडला. त्याची शहानिशा करून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये १५, जानेवारी २०१६ मध्ये २१, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये केवळ १७ तक्रारी या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांनी नोंदविल्या आहेत.महापालिकेच्या वतीने पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अजूनही अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहेत. जलतरण तलावही बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, मात्र जलतरण तलाव चालविणाऱ्या ठेकेदारांनी त्यामध्ये सवलत मिळवून ते चालूच ठेवले आहेत. (प्रतिनिधी)