शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नागरिकांना पडला पाणीटंचाईचा विसर

By admin | Updated: March 5, 2016 00:51 IST

पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे

पुणे : पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे. गेल्या ३ महिन्यांत केवळ ५३ तक्रारी या हेल्पलाइनवर करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर तक्रारींचा सुरू झालेला ओघ कमी झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी, बांधकामासाठी वापरले जात असल्यास, पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे दिसून आल्यास, पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक ०२०- २५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना कुणाल कुमार यांनी केल्या होत्या. पाण्याच्या तक्रारींसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सुरुवातीला तक्रारींचा मोठा पाऊस पडला. त्याची शहानिशा करून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये १५, जानेवारी २०१६ मध्ये २१, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये केवळ १७ तक्रारी या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांनी नोंदविल्या आहेत.महापालिकेच्या वतीने पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अजूनही अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहेत. जलतरण तलावही बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, मात्र जलतरण तलाव चालविणाऱ्या ठेकेदारांनी त्यामध्ये सवलत मिळवून ते चालूच ठेवले आहेत. (प्रतिनिधी)