शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना पडला पाणीटंचाईचा विसर

By admin | Updated: March 5, 2016 00:51 IST

पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे

पुणे : पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे प्रमाण गेल्या ३ महिन्यांत खूपच कमी झाले आहे. गेल्या ३ महिन्यांत केवळ ५३ तक्रारी या हेल्पलाइनवर करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर तक्रारींचा सुरू झालेला ओघ कमी झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी, बांधकामासाठी वापरले जात असल्यास, पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे दिसून आल्यास, पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक ०२०- २५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना कुणाल कुमार यांनी केल्या होत्या. पाण्याच्या तक्रारींसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सुरुवातीला तक्रारींचा मोठा पाऊस पडला. त्याची शहानिशा करून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये १५, जानेवारी २०१६ मध्ये २१, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये केवळ १७ तक्रारी या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांनी नोंदविल्या आहेत.महापालिकेच्या वतीने पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरात अजूनही अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहेत. जलतरण तलावही बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, मात्र जलतरण तलाव चालविणाऱ्या ठेकेदारांनी त्यामध्ये सवलत मिळवून ते चालूच ठेवले आहेत. (प्रतिनिधी)