शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलाच्या श्रेयवादात नागरिक वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

......................................... मांजरीतील समस्या; आरक्षणाच्या भितीने भूखंड विक्रीस उधाण .................................. दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे क्रॉसिंगवर ...

.........................................

मांजरीतील समस्या; आरक्षणाच्या भितीने भूखंड विक्रीस उधाण

..................................

दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाचे काम हा येथील कळीचा मुद्दा. ते सुरू झाल्यापासून वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. उड्डाण पुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी की नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी वारंवार भेट देत आहेत. मात्र, पुलाच्या कामाची प्रगती काही होताना दिसत नाही. पर्यायी रस्त्याचे नियोजन नाही, उड्डाण पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खड्ड्यातून रस्ता शोधायचा कसा असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

२०१७ मध्ये, ३४ गावांपैकी ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर उर्वरित गावे समाविष्ट होण्यासंदर्भात राजकीय खेळ्याही सुरू झाल्या. पेच-डावपेचाच्या या वादानंतर आता पुन्हा समाविष्ट गावांच्या यादीत मांजरी बुद्रुकचा समावेश झाला. अगोदर समाविष्ट झालेल्या गावात सोयीसुविधा देण्यातच महापालिका अपयशी ठरत असताना मग आणखी गावे समाविष्ट झाली तर काय अवस्था होईल, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. पहिला विकास आराखडा तयार होऊ द्या, नागरिकांच्या सूचना येऊ द्यात आणि आवश्यक विकास निधी उपलब्ध झाल्यानंतर गाव समाविष्ट करा. नाहीतर ʻना घर का, ना घाट काʼ, अशी सामान्य नागरिकांची ससेहोलपट होईल. अशी समिश्र भावना व्यक्त होताना दिसत आहे.

कोविड महामारीनंतर, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. शहरातील निवासी तसेच व्यावसायिक जागेची कमालीची दरवाढ यामुळे छोटेमोठे व्यावसायिक तुलनेने कमी भाडे असल्यामुळे या भागात झपाट्याने येऊ लागले आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. कचरापश्न कायमस्वरूपी सुटला जाता नाही. कचऱ्याचे ढीग रस्त्यांपर्यंत येत असल्याचे अधूनमधून चित्र दिसत आहे. याचे सुनियोजित व्यवस्थापन होण्याची गरज आहे. मोकळ्या जागेवर आरक्षण पडण्याअगोदर प्लॉटिंग करून विक्री करण्यावर भर दिला जात असल्याने बाग, क्रिडांगणे, शासकीय दवाखाने, प्रशासकीय कार्यालय यांच्यासाठी मोक्याच्या जागा शिल्लक राहतील की नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली.

........................................

कोट

नागरीकरण वाढल्यामुळे पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन यासारखे प्रश्न ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. हे प्रश्न महापालिकाच सोडवू शकते. मांजरीत असलेल्या बड्या कंपन्यांच्या आर्थिक गणितांमुळे या प्रक्रियेला विलंब होत आहे.

- शैलेंद्र बेल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते

...................

या अगोदर महापालिकेत गेलेल्या गावांत सोयी-सुविधा मिळत नसल्याने तेथे आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका नव्याने समाविष्ट होत असलेल्या गावांना मुलभूत सुविधा देऊ शकेल का, याबाबत साशंकता आहे.

अगोदर विकास आराखडा तयार करा, निधी उपलब्ध करा नंतर गाव समाविष्ट करा.

कृष्णा घुले, सजग नागरिक.

.....................

फोटो ओळ

रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यापुर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे वाहनचालकांना वर्षानुवर्षे कसरत करावी लागत आहे.