शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

उड्डाणपूलाच्या श्रेयवादात नागरिक वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

......................................... मांजरीतील समस्या; आरक्षणाच्या भितीने भूखंड विक्रीस उधाण .................................. दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे क्रॉसिंगवर ...

.........................................

मांजरीतील समस्या; आरक्षणाच्या भितीने भूखंड विक्रीस उधाण

..................................

दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाचे काम हा येथील कळीचा मुद्दा. ते सुरू झाल्यापासून वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. उड्डाण पुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी की नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी वारंवार भेट देत आहेत. मात्र, पुलाच्या कामाची प्रगती काही होताना दिसत नाही. पर्यायी रस्त्याचे नियोजन नाही, उड्डाण पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खड्ड्यातून रस्ता शोधायचा कसा असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

२०१७ मध्ये, ३४ गावांपैकी ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर उर्वरित गावे समाविष्ट होण्यासंदर्भात राजकीय खेळ्याही सुरू झाल्या. पेच-डावपेचाच्या या वादानंतर आता पुन्हा समाविष्ट गावांच्या यादीत मांजरी बुद्रुकचा समावेश झाला. अगोदर समाविष्ट झालेल्या गावात सोयीसुविधा देण्यातच महापालिका अपयशी ठरत असताना मग आणखी गावे समाविष्ट झाली तर काय अवस्था होईल, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. पहिला विकास आराखडा तयार होऊ द्या, नागरिकांच्या सूचना येऊ द्यात आणि आवश्यक विकास निधी उपलब्ध झाल्यानंतर गाव समाविष्ट करा. नाहीतर ʻना घर का, ना घाट काʼ, अशी सामान्य नागरिकांची ससेहोलपट होईल. अशी समिश्र भावना व्यक्त होताना दिसत आहे.

कोविड महामारीनंतर, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. शहरातील निवासी तसेच व्यावसायिक जागेची कमालीची दरवाढ यामुळे छोटेमोठे व्यावसायिक तुलनेने कमी भाडे असल्यामुळे या भागात झपाट्याने येऊ लागले आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. कचरापश्न कायमस्वरूपी सुटला जाता नाही. कचऱ्याचे ढीग रस्त्यांपर्यंत येत असल्याचे अधूनमधून चित्र दिसत आहे. याचे सुनियोजित व्यवस्थापन होण्याची गरज आहे. मोकळ्या जागेवर आरक्षण पडण्याअगोदर प्लॉटिंग करून विक्री करण्यावर भर दिला जात असल्याने बाग, क्रिडांगणे, शासकीय दवाखाने, प्रशासकीय कार्यालय यांच्यासाठी मोक्याच्या जागा शिल्लक राहतील की नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली.

........................................

कोट

नागरीकरण वाढल्यामुळे पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन यासारखे प्रश्न ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. हे प्रश्न महापालिकाच सोडवू शकते. मांजरीत असलेल्या बड्या कंपन्यांच्या आर्थिक गणितांमुळे या प्रक्रियेला विलंब होत आहे.

- शैलेंद्र बेल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते

...................

या अगोदर महापालिकेत गेलेल्या गावांत सोयी-सुविधा मिळत नसल्याने तेथे आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका नव्याने समाविष्ट होत असलेल्या गावांना मुलभूत सुविधा देऊ शकेल का, याबाबत साशंकता आहे.

अगोदर विकास आराखडा तयार करा, निधी उपलब्ध करा नंतर गाव समाविष्ट करा.

कृष्णा घुले, सजग नागरिक.

.....................

फोटो ओळ

रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यापुर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे वाहनचालकांना वर्षानुवर्षे कसरत करावी लागत आहे.