शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

काम करण्यासाठी सक्षम म्हणून नागरिकांनी निवडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे:- केवळ राजकीय पार्श्वभूमी लाभली म्हणून आम्ही निवडून आलो असे नाही, तर राजकारणात काम करण्यासाठी आम्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे:- केवळ राजकीय पार्श्वभूमी लाभली म्हणून आम्ही निवडून आलो असे नाही, तर राजकारणात काम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, म्हणून आम्हाला नागरिकांनी निवडून दिले आहे. कोणतेही संकुचित विचार न ठेवता आजचे तरुण आणि सुशिक्षित राजकारणी एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून समाजाच्या तळागाळातील लोकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संविधानाला अपेक्षित लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असा सूर विविध राजकीय पक्षांच्या आमदार आणि खासदारांनी शनिवारी (दि. ९) आयोजित परिसंवादात व्यक्त केला.

जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनात ‘भारतीय संविधान आणि आजचे राजकारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे उपस्थित होते. यामध्ये खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. सूत्रसंचालन पत्रकार प्रसन्न जोशी यांनी केले.

आमदार रोहित पवार शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना म्हणाले, कृषी कायदे हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा प्रश्न आहे. परंतु, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत संविधानात्मक तिढा निर्माण करीत आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे कायदे केल्यामुळेच पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, संविधानाचा सोयीस्कररीत्या अर्थ लावून केवळ राजकारण खेळले जात आहे. लोकशाहीतील पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकार सर्व संविधानात्मक पदे, संस्था, तपास यंत्रणा या सगळ्याचा गैरवापर करीत आहे. शासन हे नेहमी मातृत्वाच्या भूमिकेत असावे. ज्याप्रमाणे माता दोन अपत्यांमध्ये भेदभाव करीत नाही, त्याप्रमाणे समानतेने धोरणांची आखणी करून अंमलबजावणी केली पाहिजे.

प्रास्ताविक जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी केले.

-------------------------------

...पण वेळप्रसंग आला तर शिवसेना ठोकशाहीवरही उतरू शकते

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले , प्रखर हिंदुत्व आणि संभाजीनगर ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची शिवसेनेची ठाम भूमिका आहे. त्यात कोणत्याही पातळीवर तडजोड होणार नाही. शिवसेनेला लोकशाहीच अपेक्षित आहे, पण वेळप्रसंगी शिवसेना ठोकशाहीवर उतरू शकते, मग ती काही वेळा शाब्दिक ठोकशाही देखील असते.

----------------------------------------------