शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काम करण्यासाठी सक्षम म्हणून नागरिकांनी निवडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे:- केवळ राजकीय पार्श्वभूमी लाभली म्हणून आम्ही निवडून आलो असे नाही, तर राजकारणात काम करण्यासाठी आम्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे:- केवळ राजकीय पार्श्वभूमी लाभली म्हणून आम्ही निवडून आलो असे नाही, तर राजकारणात काम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, म्हणून आम्हाला नागरिकांनी निवडून दिले आहे. कोणतेही संकुचित विचार न ठेवता आजचे तरुण आणि सुशिक्षित राजकारणी एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून समाजाच्या तळागाळातील लोकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संविधानाला अपेक्षित लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असा सूर विविध राजकीय पक्षांच्या आमदार आणि खासदारांनी शनिवारी (दि. ९) आयोजित परिसंवादात व्यक्त केला.

जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनात ‘भारतीय संविधान आणि आजचे राजकारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे उपस्थित होते. यामध्ये खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. सूत्रसंचालन पत्रकार प्रसन्न जोशी यांनी केले.

आमदार रोहित पवार शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना म्हणाले, कृषी कायदे हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा प्रश्न आहे. परंतु, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत संविधानात्मक तिढा निर्माण करीत आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे कायदे केल्यामुळेच पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, संविधानाचा सोयीस्कररीत्या अर्थ लावून केवळ राजकारण खेळले जात आहे. लोकशाहीतील पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकार सर्व संविधानात्मक पदे, संस्था, तपास यंत्रणा या सगळ्याचा गैरवापर करीत आहे. शासन हे नेहमी मातृत्वाच्या भूमिकेत असावे. ज्याप्रमाणे माता दोन अपत्यांमध्ये भेदभाव करीत नाही, त्याप्रमाणे समानतेने धोरणांची आखणी करून अंमलबजावणी केली पाहिजे.

प्रास्ताविक जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी केले.

-------------------------------

...पण वेळप्रसंग आला तर शिवसेना ठोकशाहीवरही उतरू शकते

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले , प्रखर हिंदुत्व आणि संभाजीनगर ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची शिवसेनेची ठाम भूमिका आहे. त्यात कोणत्याही पातळीवर तडजोड होणार नाही. शिवसेनेला लोकशाहीच अपेक्षित आहे, पण वेळप्रसंगी शिवसेना ठोकशाहीवर उतरू शकते, मग ती काही वेळा शाब्दिक ठोकशाही देखील असते.

----------------------------------------------