शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कदमवाकवस्ती, लोणी काळभोरचे पाणी रसायनयुक्तच

By admin | Updated: February 23, 2016 03:10 IST

सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावच्या नळ-पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी

लोणी काळभोर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावच्या नळ-पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी व बोअरवेल बाधित झाल्या आहोत. पाझरलेल्या पाण्यात क्षार, क्लोरिन आणि इतर रसायनांचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे सोडलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी सध्यापेक्षा अधिक काळजी न घेतल्यास भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.गेल्या महिन्यात जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणी पुरविण्यास सुरुवात झाली आहे. मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्पातून पाणी उचलून ते साडेसतरानळी येथे शुद्धीकरण केले जाते, असे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु, या पाण्यावर कुठलीच प्रक्रिया न करता हे मैलापाणी जसेच्या तसे कालव्यात सोडले जाते, असे पूर्व हवेलीतील नागरिकांचे म्हणणे आहे. हे पाणी अतिशय खराब असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कालव्यालगत असलेल्या विहिरी, कूपनलिकांमधील पाणी खराब होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कालव्यांलगत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी पुणे येथील राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून आलेल्या अहवालामध्ये कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची एंजल हायस्कूल येथील विहीर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची वगरेवस्ती येथील विहीर, तर बल्लाळवस्ती येथील बोअरवेलमधील पाण्यात क्षार व क्लोरिनचे प्रमाण आढळून आले आहे. परंतु, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामध्ये ही मानवी शरीरास घातक अशी रसायने आढळून आलेली नाहीत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत चार ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामुळे सध्या तरी येथील नागरिकांना या पाण्यांमुळे कोणताही धोका नाही. परंतु, जुना कालवा बारा महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे सध्या त्यातून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे. भविष्यात हे प्रमाण वाढणार असून, त्या वेळी जलशुद्धीकरणाच्या खर्चाचा मोठा भार काही दोष नसतानाही या दोन्ही ग्रामपंचायतींना उचलावा लागणार आहे. (वार्ताहर)प्रक्रिया करूनच पाणी सोडाराज्य प्रयोगशाळेकडून पाण्याबाबत आलेल्या अहवालामध्ये या पाण्यात क्षार व क्लोरिन जास्त प्रमाणात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब मानवी जीवितासाठी गंभीर बाब असून, हे पाणी पिण्यात आले तर त्वचारोग व विविध प्रकारचे पोटाचे रोग होऊ शकतात. आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत पुणे महापालिकेशी तत्काळ पत्रव्यवहार करून पाण्यावर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करून त्यानंतर ते पाणी जुन्या कालव्यात सोडण्यात यावे, असे सांगणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भगवान पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सलग अहवाल प्राप्त होताच दोन्ही ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही आजारास न घाबरता खासगी रुग्णालयात न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी यावे.- डॉ. डी. जे. जाधव, आरोग्याधिकारी, लोणी काळभोर