शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

कदमवाकवस्ती, लोणी काळभोरचे पाणी रसायनयुक्तच

By admin | Updated: February 23, 2016 03:10 IST

सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावच्या नळ-पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी

लोणी काळभोर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावच्या नळ-पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी व बोअरवेल बाधित झाल्या आहोत. पाझरलेल्या पाण्यात क्षार, क्लोरिन आणि इतर रसायनांचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे सोडलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी सध्यापेक्षा अधिक काळजी न घेतल्यास भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.गेल्या महिन्यात जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणी पुरविण्यास सुरुवात झाली आहे. मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्पातून पाणी उचलून ते साडेसतरानळी येथे शुद्धीकरण केले जाते, असे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु, या पाण्यावर कुठलीच प्रक्रिया न करता हे मैलापाणी जसेच्या तसे कालव्यात सोडले जाते, असे पूर्व हवेलीतील नागरिकांचे म्हणणे आहे. हे पाणी अतिशय खराब असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कालव्यालगत असलेल्या विहिरी, कूपनलिकांमधील पाणी खराब होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कालव्यांलगत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी पुणे येथील राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून आलेल्या अहवालामध्ये कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची एंजल हायस्कूल येथील विहीर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची वगरेवस्ती येथील विहीर, तर बल्लाळवस्ती येथील बोअरवेलमधील पाण्यात क्षार व क्लोरिनचे प्रमाण आढळून आले आहे. परंतु, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामध्ये ही मानवी शरीरास घातक अशी रसायने आढळून आलेली नाहीत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत चार ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामुळे सध्या तरी येथील नागरिकांना या पाण्यांमुळे कोणताही धोका नाही. परंतु, जुना कालवा बारा महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे सध्या त्यातून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे. भविष्यात हे प्रमाण वाढणार असून, त्या वेळी जलशुद्धीकरणाच्या खर्चाचा मोठा भार काही दोष नसतानाही या दोन्ही ग्रामपंचायतींना उचलावा लागणार आहे. (वार्ताहर)प्रक्रिया करूनच पाणी सोडाराज्य प्रयोगशाळेकडून पाण्याबाबत आलेल्या अहवालामध्ये या पाण्यात क्षार व क्लोरिन जास्त प्रमाणात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब मानवी जीवितासाठी गंभीर बाब असून, हे पाणी पिण्यात आले तर त्वचारोग व विविध प्रकारचे पोटाचे रोग होऊ शकतात. आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत पुणे महापालिकेशी तत्काळ पत्रव्यवहार करून पाण्यावर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करून त्यानंतर ते पाणी जुन्या कालव्यात सोडण्यात यावे, असे सांगणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भगवान पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सलग अहवाल प्राप्त होताच दोन्ही ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही आजारास न घाबरता खासगी रुग्णालयात न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी यावे.- डॉ. डी. जे. जाधव, आरोग्याधिकारी, लोणी काळभोर