शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सभापतींची निवड बिनविरोध?

By admin | Updated: April 11, 2017 03:33 IST

स्थायी समितीच्या सभापती निवडीनंतर महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांच्या सभापतिपदासाठी

पिंपरी : स्थायी समितीच्या सभापती निवडीनंतर महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने एकाच समितीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा बहुमताच्या जोरावर समिती सभापतींची निवड बिनविरोध करण्याची शक्यता आहे. विधी समिती सभापतिपदासाठी शारदा सोनवणे, तर उपसभापतिपदासाठी अश्विनी जाधव, शहर सुधारणा समिती सभापतिपदासाठी सागर गवळी व उपसभापतिपदासाठी शैलेश मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी सुनीता तापकीर व राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी तर उपसभापतिपदासाठी योगिता नागरगोजे, तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतिपदासाठी भाजपाचे लक्ष्मण सस्ते यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले. विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी उमेदवारीअर्ज सोमवारी दुपारी तीन ते पाचपर्यंत दाखल करण्यात आले. महिला व बालकल्याण समिती वगळता इतर कोणत्याही पक्षाने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला नाही. महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाकडून चारही जागांवर ज्यांची नावे निश्चित केली जातील, त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जाते. भाजपाकडून अर्ज भरतेवेळी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार उपस्थित होते. विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी शनिवारी निवडणूक होईल. (प्रतिनिधी) स्पष्ट बहुमतामुळे सर्व समित्या भाजपाकडेमहापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्षनेता या महत्त्वाच्या पदांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीचे वेध लागले आहेत. महापालिकेत पाच विषय समित्या असून, त्यापैकी स्थायी समिती अध्यक्षपदी सीमा सावळे यांची बिनविरोध निवड झाली. विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असून, बहुमतामुळे या समित्याही भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे.बँकेत पैसे असूनही खोळंबा नोटाबंदी निर्णयानंतर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. घरात लग्नकार्य असताना स्वत:च्या खात्यातून गरजेपुरती रक्कमही काढता येत नव्हती. रुग्णालयाचे बिल अदा करण्यातही अडचणी येत आहेत. नोटाबंदीला पाच महिने उलटल्यानंतरही अडचणी संपलेल्या नाहीत. बँकेत पैसे असूनही केवळ अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शनिवार व रविवारी बँकांचे सलग कामकाज बंद असल्यामुळे नागरिक सोमवार उजाडण्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र, सोमवारीसुद्धा एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांचा संयम सुटला.