शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

चिटफंडांना पोलिसांचेच अभय

By admin | Updated: September 14, 2015 04:39 IST

चिटफंड चालविणाऱ्या कंपन्यांचे थेट पोलिसांशीच साटेलोटे असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात हा धंदा तेजीत सुरू आहे. चिटफंडांना पोलिसांचेच अभय आहे.

विश्वास मोरे , पिंपरी चिटफंड चालविणाऱ्या कंपन्यांचे थेट पोलिसांशीच साटेलोटे असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात हा धंदा तेजीत सुरू आहे. चिटफंडांना पोलिसांचेच अभय आहे. फसवणूक होऊन माया गोळा करून कार्यालयास टाळा ठोकून पसार होईपर्यंत कोणताही चिटफंड मालक पोलिसांच्या हातात सापडत नाही. फसवणूक झालेल्यांना केवळ पोलीस आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे हाती काहीही पडलेले नाही. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे. येथे कष्टकरी कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. कमी गुंतवणुकीत कमी वेळेत अधिक पैसे मिळताहेत असे कोणी आमिष दाखविले की, कामगारवर्ग निश्चितच आकर्षिक होतो. कष्टकऱ्यांची ही मानसिकता ओळखून चिटफंड चालकांनी आपला धंदा जोरात सुरू ठेवला आहे. दर आठवड्याला चिटफंड गैरव्यवहाराचे किमान एक प्रकरण उघडकीस येऊनही फसणाऱ्यांचे प्रमाण वाढतेच आहे. फसवणूकप्रकरणी साईप्रसाद चिटफंडाचे प्रमुख बाळासोहब भापकर, मुलगा शशांक भापकर आणि वंदना पत्नी यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला भापकराच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फसवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.गाववाल्यांचेच काळे धन अधिकचिटफंडातील काही कंपन्या गाववाल्यांपैकी काहींनी सुरू केलेल्या आहेत. चिंचवड, पिंपरी आणि भोसरीतील चिटफंड काही गाववाले चालवितात. तर काहींना या शहरातील सत्ताधारी नेत्यांचे पाठबळ आहे. भिशी आणि जादा व्याजाचे आमिष दाखवून या चिटफंड मालकांनी स्थानिक शेतकऱ्यांना जाळ्यात ओढले आहे. त्यांनी आपल्याच गावचा माणूस आहे, कोठे जाईल, असा विश्वास ठेवून कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. अवधूत चिटफंडची फसवणूक उघडकीस आल्यानंतर प्लॉटिंग आणि शेतजमीन विकून आलेले पैसे गुंतवणूकदारांची झोप उडविली आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पुनावळे, ताथवडे, रावेत, वाकड, हिंजवडी येथील अनेक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. काही लोकांनी पंचवीस लाख ते शंभर कोटींपर्यंतची गुंतवणूक केली आहे. चिटफंड चालकांनी काळ्या धनावरच डल्ला मारल्याने दाद मागायची कोणाकडे अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशी होते फसवणूकमार्केटिंगचे विविध फंडे चिटफंड चालक आजमावितात. चेन पद्धतीने आणि कमिशन तत्त्वावर हा कारभार चालतो. भिशी योजना किंवा अधिक व्याजाचे आमिष दाखविले जाते. अमूक रकमेची गुंतवणूक करा. त्यावर आपणास दोन वर्षांत दामदुपट्ट पैसे मिळतील किंवा एक हजार रुपये गुंतवले, तर करोडपती कसे होता येईल, असे दर्शविणारा माहितीचा आणि आकड्यांचा खेळ करणारा, करोडपती होण्याचे चार्ट नागरिकांना दाखविले जातात. आपण स्वत: गुंतवणूक करून आणखी पाच जणांना आणि त्या प्रत्येकांना आणखी पाच जणांना आणले की, आपणास लाख रुपयांचा चेक मिळेल. तसेच दुबई, बँकॉक किंवा मलेशिया अशी परदेशवारीही करता येईल. असे स्वप्न दाखविले जात असल्याने त्या आमिषाला काही लोक बळी पडतात. लखपती किंवा करोडपती होण्याच्या नादात अनेक जण फसतात. कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्याची वेळअनेक चिटफंड किंवा भिशीचालक सामान्यांच्या स्वप्नांचा चुराडा करून कोट्यवधींची माया गोळा करून पसार झाले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांना फक्त पोलीस ठाण्यांच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे हाती काहीही पडलेले नाही. पोलीस आणि चिटफंड चालकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने कार्यालय सुरू असेपर्यंत तक्रारींची दखल घेतली जात नाही. हे प्रकरण आमच्या अखत्यारीत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जाते.पंचवीसहून अधिक कंपन्याशहरात पंचवीसहून अधिक चिटफंड कंपन्या आहेत. त्यात स्थानिकांच्या पाच ते सहा आणि अन्य कंपन्या महाराष्ट्राबाहेरील आहेत. आलिशान कार्यालये, सुटाबुटातील इंग्रजीत बोलणारे कर्मचारी पाहून कोणालाही भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. सहा महिने ते दोन वर्षे अशा कालखंडात जाळे पसरून फसवणूक करून सुमारे आठ ते दहा कंपन्यांनी पोबारा केलेला आहे.