शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चिमुकल्यांचा जातोय जीव

By admin | Updated: October 4, 2016 01:24 IST

गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये कधी वाहनचालकाची चुकी, तर कधी पालकांचा निष्काळजीपणा बालकांच्या जीवावर बेतला आहे

पिंपरी : गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये कधी वाहनचालकाची चुकी, तर कधी पालकांचा निष्काळजीपणा बालकांच्या जीवावर बेतला आहे. कामातील व्यस्तता, दुर्लक्ष, हलगर्जीपणा यांमुळे शहराच्या विविध भागांत अपघात, दुर्घटना घडल्या असून, चिमुकल्यांना जीव गमावण्याची वेळ आली आहे. सहा महिन्यांत घडलेल्या दहाघटनांतून बोध घेतला, तर अशा घटनांवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ताथवडे येथील ओम शिव कॉलनीत टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात आरती या तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. वडील बिगारी कामासाठी निघाले असता, खाऊचा हट्ट धरून ती वडिलांकडे धावत जात होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या टेम्पोची धडक बसली. डोक्याला जबर मार लागल्याने तिचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या ताज्या घटनेमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशीच घटना काही महिन्यांपूर्वी याच भागात घडली होती. घराबाहेर गणपती मंदिराच्या शेडच्या सावलीत झोपवलेले सहा महिन्यांचे बालक चालकाला नजरेस न पडल्याने मोटारीच्या चाकाखाली चिरडले. ही हृदयद्रावक घटना ताथवडे येथील सुखदा कॉलनीत घडली होती. सार्थक असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या त्या चिमुरड्याचे नाव होते. सहा महिन्यांच्या सार्थकला त्याच्या आजीने गणपती मंदिराच्या शेडमध्ये आणले. सार्थकची आई स्वयंपाक करीत होती. आजी बाळाला घेऊन बाहेर आली. तेथे बाळाची आत्यासुद्धा होती. थोड्या वेळाने बाळ झोपी गेले. त्याच्यावर पांघरूण घालून आजी व आत्या दोघी हात धुण्यासाठी घरात गेल्या. त्याचवेळी शेजारीच राहणारा एक जण मोटार बाहेर काढत होता. मोटार मागे घेत असताना, मोटारीच्या मागील चाकाखाली बाळ आले. काही कळण्याच्या आत ते चिरडले गेले.(प्रतिनिधी)