शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

मिरची, बटाटा, गाजर महागले

By admin | Updated: May 8, 2017 02:59 IST

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली. तर टोमॅटो व शेवग्याचे भाव उतरले.मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात रविवारी शेतमालाची १७० ते १८० ट्रक आवक झाली. बहुतेक भाज्यांची आवक स्थिर राहिल्याने भावात चढउतार झाला नाही. पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. हिरवी मिरचीला प्रति दहा किलोमागे ४०० ते ५०० रुपये, बटाटा ७० ते १०० रुपये, टोमॅटो ६० ते १००, शेवगा १२०-१५० तर गाजराला २२०-२६० रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख जुड्या तर मेथीची सव्वा लाख जुडींची आवक झाली. बाजारात गौरी जातीच्या कोथिंबीरीची सुमारे ५० ते ६० हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीरची ५०० ते ८०० रुपये तर मेथीची ४०० ते ६०० रुपये भावाने विक्री झाली.फळांना मागणीउकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांचा ओढा फळांचे सरबत, रसवंतीगृहाकडे असल्याने रसदार फळांना मागणी कायम आहे. आंब्यासह लिंबु, मोसंबी, संत्रा, कलिंगड, खरबुज या फळांना मागणी असल्याने भाव टिकून राहिले.सजावटीच्या फुलांना मागणी लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी असल्याने मार्केटयार्डातील फुलबाजारात या फुलांच्या भावात वाढ झाली. जर्बेरा, कार्नेशियन, डच गुलाब, ग्लॅडिएटर या फुलांना चांगली मागणी आहे. तर झेंडू, गुलछडी या फुलांचे भाव मागणीअभावी उतरले.डाळींच्या भावातील घट सुरूचलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली डाळींच्या भावातील घट आठवडाभर सुरूच राहिली. तर मागणी वाढल्याने साखरेचे भाव किंचित वाढले. खाद्यतेल, गुळ, पोहा, नारळ, साबुदाणा व इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारात तुरडाळीसह इतर डाळींच्या भावात सातत्याने घट होत आहे. प्रत्येक आठवड्यात क्टिंटलमागे १०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव खाली येत आहेत. मागील आठवडाभरातही हे २०० रुपयांनी कमी झाले. साखरेला काही प्रमाणात मागणी वाढल्याने क्विंटलमागे २५ रुपये वाढ झाली. मागणीअभावी खोबरेल तेलाचे भाव १५ किलोमागे १०० रुपयांनी उतरले. उलाढाल कमी झाल्याने गुळाचे भाव स्थिर राहिले. हरभरा डाळीच्या भावात घट झाल्याने बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरले. तर भाजक्या डाळीच्या भावातही ४० किलोमागे ६० ते ७० रुपयांची घट झाली. नारळाला मागणी कमी असल्याने ४० ते ५० रुपयांनी भाव उतरले. हळदीची मागणीही कमी झाली असून हळकुंड व हळदीच्या भावात क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची घट झाली. इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारातील वस्तुंचे भाव -डाळी (क्विंटल) - तुरडाळ - ५५००-६३००हरभरा डाळ - ७१००-७५००उडीदडाळ - ७०००-७५००मुगडाळ - ६०००-६५००मसुरडाळ - ५१००-५२००साखर - ३८२५-३८५०बेसन (५० किलो) ३६५०-३९५०हळद (१० किलो) ७५०-१२५०ं