शहरं
Join us  
Trending Stories
1
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
2
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
3
Operation Sindoor Live Updates: भारतात घुसखोरी करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना BSF जवानांनी ठार केले
4
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
5
India Pakistan Conflict :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ; जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी
6
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
7
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
8
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
9
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
10
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
11
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
12
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
13
टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."
14
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने खबरदारी
15
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
16
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
17
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?
18
India Pakistan: पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील २४ विमानतळे बंद
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
20
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!

मिरची, बटाटा, गाजर महागले

By admin | Updated: May 8, 2017 02:59 IST

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली. तर टोमॅटो व शेवग्याचे भाव उतरले.मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात रविवारी शेतमालाची १७० ते १८० ट्रक आवक झाली. बहुतेक भाज्यांची आवक स्थिर राहिल्याने भावात चढउतार झाला नाही. पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. हिरवी मिरचीला प्रति दहा किलोमागे ४०० ते ५०० रुपये, बटाटा ७० ते १०० रुपये, टोमॅटो ६० ते १००, शेवगा १२०-१५० तर गाजराला २२०-२६० रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख जुड्या तर मेथीची सव्वा लाख जुडींची आवक झाली. बाजारात गौरी जातीच्या कोथिंबीरीची सुमारे ५० ते ६० हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीरची ५०० ते ८०० रुपये तर मेथीची ४०० ते ६०० रुपये भावाने विक्री झाली.फळांना मागणीउकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांचा ओढा फळांचे सरबत, रसवंतीगृहाकडे असल्याने रसदार फळांना मागणी कायम आहे. आंब्यासह लिंबु, मोसंबी, संत्रा, कलिंगड, खरबुज या फळांना मागणी असल्याने भाव टिकून राहिले.सजावटीच्या फुलांना मागणी लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी असल्याने मार्केटयार्डातील फुलबाजारात या फुलांच्या भावात वाढ झाली. जर्बेरा, कार्नेशियन, डच गुलाब, ग्लॅडिएटर या फुलांना चांगली मागणी आहे. तर झेंडू, गुलछडी या फुलांचे भाव मागणीअभावी उतरले.डाळींच्या भावातील घट सुरूचलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली डाळींच्या भावातील घट आठवडाभर सुरूच राहिली. तर मागणी वाढल्याने साखरेचे भाव किंचित वाढले. खाद्यतेल, गुळ, पोहा, नारळ, साबुदाणा व इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारात तुरडाळीसह इतर डाळींच्या भावात सातत्याने घट होत आहे. प्रत्येक आठवड्यात क्टिंटलमागे १०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव खाली येत आहेत. मागील आठवडाभरातही हे २०० रुपयांनी कमी झाले. साखरेला काही प्रमाणात मागणी वाढल्याने क्विंटलमागे २५ रुपये वाढ झाली. मागणीअभावी खोबरेल तेलाचे भाव १५ किलोमागे १०० रुपयांनी उतरले. उलाढाल कमी झाल्याने गुळाचे भाव स्थिर राहिले. हरभरा डाळीच्या भावात घट झाल्याने बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरले. तर भाजक्या डाळीच्या भावातही ४० किलोमागे ६० ते ७० रुपयांची घट झाली. नारळाला मागणी कमी असल्याने ४० ते ५० रुपयांनी भाव उतरले. हळदीची मागणीही कमी झाली असून हळकुंड व हळदीच्या भावात क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची घट झाली. इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारातील वस्तुंचे भाव -डाळी (क्विंटल) - तुरडाळ - ५५००-६३००हरभरा डाळ - ७१००-७५००उडीदडाळ - ७०००-७५००मुगडाळ - ६०००-६५००मसुरडाळ - ५१००-५२००साखर - ३८२५-३८५०बेसन (५० किलो) ३६५०-३९५०हळद (१० किलो) ७५०-१२५०ं