शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मिरची, बटाटा, गाजर महागले

By admin | Updated: May 8, 2017 02:59 IST

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली. तर टोमॅटो व शेवग्याचे भाव उतरले.मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात रविवारी शेतमालाची १७० ते १८० ट्रक आवक झाली. बहुतेक भाज्यांची आवक स्थिर राहिल्याने भावात चढउतार झाला नाही. पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. हिरवी मिरचीला प्रति दहा किलोमागे ४०० ते ५०० रुपये, बटाटा ७० ते १०० रुपये, टोमॅटो ६० ते १००, शेवगा १२०-१५० तर गाजराला २२०-२६० रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख जुड्या तर मेथीची सव्वा लाख जुडींची आवक झाली. बाजारात गौरी जातीच्या कोथिंबीरीची सुमारे ५० ते ६० हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीरची ५०० ते ८०० रुपये तर मेथीची ४०० ते ६०० रुपये भावाने विक्री झाली.फळांना मागणीउकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांचा ओढा फळांचे सरबत, रसवंतीगृहाकडे असल्याने रसदार फळांना मागणी कायम आहे. आंब्यासह लिंबु, मोसंबी, संत्रा, कलिंगड, खरबुज या फळांना मागणी असल्याने भाव टिकून राहिले.सजावटीच्या फुलांना मागणी लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी असल्याने मार्केटयार्डातील फुलबाजारात या फुलांच्या भावात वाढ झाली. जर्बेरा, कार्नेशियन, डच गुलाब, ग्लॅडिएटर या फुलांना चांगली मागणी आहे. तर झेंडू, गुलछडी या फुलांचे भाव मागणीअभावी उतरले.डाळींच्या भावातील घट सुरूचलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली डाळींच्या भावातील घट आठवडाभर सुरूच राहिली. तर मागणी वाढल्याने साखरेचे भाव किंचित वाढले. खाद्यतेल, गुळ, पोहा, नारळ, साबुदाणा व इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारात तुरडाळीसह इतर डाळींच्या भावात सातत्याने घट होत आहे. प्रत्येक आठवड्यात क्टिंटलमागे १०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव खाली येत आहेत. मागील आठवडाभरातही हे २०० रुपयांनी कमी झाले. साखरेला काही प्रमाणात मागणी वाढल्याने क्विंटलमागे २५ रुपये वाढ झाली. मागणीअभावी खोबरेल तेलाचे भाव १५ किलोमागे १०० रुपयांनी उतरले. उलाढाल कमी झाल्याने गुळाचे भाव स्थिर राहिले. हरभरा डाळीच्या भावात घट झाल्याने बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरले. तर भाजक्या डाळीच्या भावातही ४० किलोमागे ६० ते ७० रुपयांची घट झाली. नारळाला मागणी कमी असल्याने ४० ते ५० रुपयांनी भाव उतरले. हळदीची मागणीही कमी झाली असून हळकुंड व हळदीच्या भावात क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची घट झाली. इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.घाऊक बाजारातील वस्तुंचे भाव -डाळी (क्विंटल) - तुरडाळ - ५५००-६३००हरभरा डाळ - ७१००-७५००उडीदडाळ - ७०००-७५००मुगडाळ - ६०००-६५००मसुरडाळ - ५१००-५२००साखर - ३८२५-३८५०बेसन (५० किलो) ३६५०-३९५०हळद (१० किलो) ७५०-१२५०ं