शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मुलांचे भविष्य बैलगाडीच्या चाकाखाली फरफटू नये!

By admin | Updated: November 5, 2014 23:25 IST

परिस्थितीचे कोयते बालमनाच्या वाढ्यावर बसू नयेत... रसही नाही अन् चोयट्याही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊन पुढच्या पिढ्यांचं आयुष्य तरी बैलगाड्यांच्या चाकाखाली फरफटू नये

शैलेश काटे, इंदापूरपरिस्थितीचे कोयते बालमनाच्या वाढ्यावर बसू नयेत... रसही नाही अन् चोयट्याही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊन पुढच्या पिढ्यांचं आयुष्य तरी बैलगाड्यांच्या चाकाखाली फरफटू नये... मुलांना आतूनच शिक्षणाची ‘गोडी’ लागावी, अशी उपाययोजना शासनाने करावी, अशी ऊसतोड कामगारांची सामूहिक अपेक्षा आहे. मात्र, ५ वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या साखरशाळाच बंद पडल्या आहेत. साखर शाळांच्या प्रश्नांसंदर्भात कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोडीसाठी येणाऱ्या कर्मचारांची जेव्हा भेट घेतली. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली. वास्तविक पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून जनार्थ ही सेवाभावी संस्था या मुलांसाठी साखरशाळा चालवित होती. चार-पाच वर्षांपासून त्या शाळा बंद झाल्या आहेत. आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना सामावून घेतले जात आहे. जुलै ते आॅक्टोंबर या कालावधीत गावाकडच्या शाळांमध्ये शिकणारी ही मुले नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत कारखान्याच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. कर्मयोगी सहकारीने जिल्हा परिषद शाळेला इमारत नसताना, शाळेसाठी पक्क्या पाच ते सहा खोल्या बांधल्या. नंतर जिल्हा परिषद शाळेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून इमारत बांधून घेतली. रिकाम्या झालेल्या आधीच्या शाळा खोल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेसाठी वापरात आणल्या जात आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अनंतराव निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोनशे मुले येत असताना केवळ ४५ ते ५० मुलेचं शाळेत दाखल होतात. त्यामुळे या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी. गाडीच्या चाकामागे त्यांच्या भवितव्याची फरफट होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.