शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

मुलांच्या स्वप्नांना हवे संस्कारांचे बळ

By admin | Updated: November 16, 2016 03:25 IST

‘‘आज धावपळीच्या जगामध्ये विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. त्यांना स्वत:ला व्यक्त होण्यासाठी वेळच मिळत नाही. जगण्याचे आधुनिकीकरण

पुणे : ‘‘आज धावपळीच्या जगामध्ये विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. त्यांना स्वत:ला व्यक्त होण्यासाठी वेळच मिळत नाही. जगण्याचे आधुनिकीकरण करताना आपण विद्यार्थ्यांची नकळत कुचंबणा केली आहे. त्यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी केवळ संस्कार आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी केले.प्रसिद्ध साहित्यिक बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन एस. एम. जोशी सभागृहात मंगळवारी झाले. त्या वेळी बर्वे बोलत होत्या. संमेलनाध्यक्ष डॉ. विकास आबनावे, स्वागताध्यक्ष प्रकाश रोकडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, माजी संमेलनाध्यक्ष शंकर आथरे, बंधुता ज्ञानपीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र भागवत, निमंत्रक महेंद्र भारती, संस्थेच्या सदस्या मीरा आबनावे, प्रा. सुनीता ननावरे आदी उपस्थित होते. समारंभानंतर विद्यार्थ्यांच्या साहित्याचे सादरीकरण झाले. त्यामध्ये कविता, नाट्यछटा, निबंध, उतारावाचन, कथाकथन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदींचा समावेश होता. उत्कृष्ट सादरीकरणांना डॉ. संगीता बर्वे, अरुण खोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रबोधनयात्री काव्यसंमेलनात डॉ. भीम गायकवाड, मृणाल जोशी, मधुश्री ओव्हाळ, मीना शिंदे, विजय वडवेवार, संगीता झिंजुरके, अनिल दीक्षित यांनी कविता सादर केल्या. (प्रतिनिधी)