शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांची मुले येणार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

संघटनांकडून स्वागत : पहिल्या टप्प्यात २०, तर एकूण ८२ कायमस्वरूपी वसतिगृहे पुणे : राज्यातील ऊसतोड मजुरांची मुले-मुली आता शिक्षणाच्या ...

संघटनांकडून स्वागत : पहिल्या टप्प्यात २०, तर एकूण ८२ कायमस्वरूपी वसतिगृहे

पुणे : राज्यातील ऊसतोड मजुरांची मुले-मुली आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांतील ४१ तालुक्यांत ८२ वसतिगृहे उभारण्यात येणार असून, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी अधिकृत निर्णय जाहीर केला आहे. सध्या इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू करण्याचा सूचना दिल्या आहेत. राज्यातील अनेक ऊसतोड कामगार संघटनांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या ''संत भगवानबाबा वसतिगृह योजने''अंतर्गत वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात निवास आणि भोजनाची मोफत सुविधा देण्यात येणार आहे.

राज्यातील साखर कारखान्याकडून प्रतिटन १० रुपये आणि राज्य शासनाकडून १० रुपये असे एकूण २० रुपये याप्रमाणे महामंडळाला निधी देण्यात येणार आहे. या निधीतून वसतिगृहातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर ''द युनिक फाउंडेशन'' या संस्थेने दहा जिल्ह्यांतील अभ्यास करून अहवाल प्रकाशित केला होता.

----

पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांत उभारणार वसतिगृह

राज्यात ऊसतोड कामगारांना जास्त लोकसंख्या असलेल्या १० तालुक्यांत मुलींचे एक आणि मुलांचे एक असे एकूण २० वसतिगृहांची उभारणी करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि जामखेड हे दोन तालुके, बीड जिल्ह्यातील केज, पाटोदा, परळी, गेवराई, बीड, माजलगाव हे सहा तालुके तर जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसांगवी हे दोन तालुके अशा १० तालुक्यांमध्ये एकूण २० वसतिगृह पहिल्या टप्प्यात उभारणार आहे.

-----

इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू करणार

पहिल्या टप्प्यात २० वसतिगृह उभारण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात या ४१ तालुक्यांत इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुला-मुलींना प्रत्यक्ष शिक्षण देण्यास सुरुवात करणार आहे.

------

''कोयता मुक्ती'' चळवळीची नांदी ठरेल

ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रथमच वसतिगृह उभारण्यात येत आहे. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या मुलांना शिक्षण मिळाल्यास येणारी पिढी मजुरीच्या व्यवसायातून मुक्त होईल. शासनाने ही योजना यशस्वीपणे राबविल्यास ''कोयता मुक्ती'' चळवळीची नांदी ठरेल. वसतिगृह शासन नियंत्रणात चालवणे आवश्यक आहे. त्यावरच योजनेचे यश अवलंबून असेल.

- डॉ. सोमिनाथ घोळवे, वरिष्ठ संशोधक, द युनिक फाउंडेशन