शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

ऊसतोड मजुरांची मुले येणार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

संघटनांकडून स्वागत : पहिल्या टप्प्यात २०, तर एकूण ८२ कायमस्वरूपी वसतिगृहे पुणे : राज्यातील ऊसतोड मजुरांची मुले-मुली आता शिक्षणाच्या ...

संघटनांकडून स्वागत : पहिल्या टप्प्यात २०, तर एकूण ८२ कायमस्वरूपी वसतिगृहे

पुणे : राज्यातील ऊसतोड मजुरांची मुले-मुली आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांतील ४१ तालुक्यांत ८२ वसतिगृहे उभारण्यात येणार असून, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी अधिकृत निर्णय जाहीर केला आहे. सध्या इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू करण्याचा सूचना दिल्या आहेत. राज्यातील अनेक ऊसतोड कामगार संघटनांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या ''संत भगवानबाबा वसतिगृह योजने''अंतर्गत वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात निवास आणि भोजनाची मोफत सुविधा देण्यात येणार आहे.

राज्यातील साखर कारखान्याकडून प्रतिटन १० रुपये आणि राज्य शासनाकडून १० रुपये असे एकूण २० रुपये याप्रमाणे महामंडळाला निधी देण्यात येणार आहे. या निधीतून वसतिगृहातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर ''द युनिक फाउंडेशन'' या संस्थेने दहा जिल्ह्यांतील अभ्यास करून अहवाल प्रकाशित केला होता.

----

पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांत उभारणार वसतिगृह

राज्यात ऊसतोड कामगारांना जास्त लोकसंख्या असलेल्या १० तालुक्यांत मुलींचे एक आणि मुलांचे एक असे एकूण २० वसतिगृहांची उभारणी करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि जामखेड हे दोन तालुके, बीड जिल्ह्यातील केज, पाटोदा, परळी, गेवराई, बीड, माजलगाव हे सहा तालुके तर जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसांगवी हे दोन तालुके अशा १० तालुक्यांमध्ये एकूण २० वसतिगृह पहिल्या टप्प्यात उभारणार आहे.

-----

इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू करणार

पहिल्या टप्प्यात २० वसतिगृह उभारण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात या ४१ तालुक्यांत इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुला-मुलींना प्रत्यक्ष शिक्षण देण्यास सुरुवात करणार आहे.

------

''कोयता मुक्ती'' चळवळीची नांदी ठरेल

ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रथमच वसतिगृह उभारण्यात येत आहे. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या मुलांना शिक्षण मिळाल्यास येणारी पिढी मजुरीच्या व्यवसायातून मुक्त होईल. शासनाने ही योजना यशस्वीपणे राबविल्यास ''कोयता मुक्ती'' चळवळीची नांदी ठरेल. वसतिगृह शासन नियंत्रणात चालवणे आवश्यक आहे. त्यावरच योजनेचे यश अवलंबून असेल.

- डॉ. सोमिनाथ घोळवे, वरिष्ठ संशोधक, द युनिक फाउंडेशन