शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साखर कामगारांच्या मुलांनाही लागलेत ‘आयटी’चे वेध

By admin | Updated: February 3, 2017 03:59 IST

बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आता साखर कारखानदारीचे अर्थकारण बदलताना दिसत आहे. ‘पॅकेज’च्या युगात साखर कामगारांची मुले आता ‘आयटी’ क्षेत्राकडे वळू लागली आहेत.

- महेश जगताप,  सोमेश्वरनगर बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आता साखर कारखानदारीचे अर्थकारण बदलताना दिसत आहे. ‘पॅकेज’च्या युगात साखर कामगारांची मुले आता ‘आयटी’ क्षेत्राकडे वळू लागली आहेत. यामुळे भविष्यात साखर कारखानदारीला कुशल कामगारांना मुकावे लागणार असल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे. साखर कारखानदारीचा कामगार पिढ्यानपिढ्या कमी पगारात भरडून निघाला आहे. सध्या पॅकेजचे युग चालू असतानाही काही साखर कामगार अजूनही महिन्याला सहा ते सात हजारांवर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका करताना दिसत आहे. साखर कारखान्यातील कमी पगारामुळे उत्तम शिक्षण घेतलेली मुले साखर कारखान्यांमधील नोकरी डावलताना दिसत आहेत. लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन तिथे काम करण्यास प्राधान्य देत आहेत. साखर कारखान्यात नोकरीची शाश्वती राहिली नाही, दुष्काळ, उसाची कमतरता, साखरेला भाव नसणे अशी कारणे दाखवून साखर कारखाने कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवतात. अनेक सहकारी साखर कारखाने आता मोडीत निघाले आहेत. दोन-दोन वर्षांचे कामगारांचे पगार थकीत आहेत. परिणामी नोकरी सोडून साखर कामगारांच्या कुटुंबाला शेतात अथवा इतर ठिकाणी मजुरी करून आपल्या कुटुंंबाची उपजीविका चालवावी लागत आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांचा साखर कारखानदारीकडे पाहण्याचा दृष्टिीकोन बदलला आहे. ‘साखर कारखान्यात नोकरी नको रे बाबा’ अशी मानसिकता या तरुण पिढीची झाली आहे. पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी साखर कारखान्यापेक्षा विविध कंपन्यांत चांगले ‘पॅकेज’ तसेच नोकरीची शाश्वती जास्त असते. म्हणूनच आयटीकडे ओढा वाढतो आहे. नवीन पिढी ग्रामीण भागात काम करण्यास तयार नाही, त्यामुळे ते सुरुवातीला केवळ एक दोन वर्षे कारखान्यात अनुभव घेऊन निघून जातात. साखर कारखानदारीत राजकारणच जास्त चालते. (सहकारी आणि खासगी) प्रामाणिकपणे काम करूनदेखील ना पदोन्नती ना पगारवाढ असे म्हणत नवीन शिकाऊ अभियंते केवळ अनुभव घेऊन निघून जात आहेत. कारखान्यात काम करणारे बहुतेक कर्मचारी हे शेती करता येईल म्हणून जवळच्याच कारखान्यात काम करण्यास प्राधान्य देतात, शेती व पगार या दोन्हीवर घर चालवतात. परंतु शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न व कमी पगार यातून ते प्रगती साधू शकत नाही, म्हणून देखील सध्या नवीन पिढी साखर क्षेत्रात काम करण्यास तयार नाही. सध्या बरेच सहकारी साखर कारखाने बंद पाडले जात आहेत. खासगी साखर कारखाने कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा देत नाहीत, इतर कंपन्यांप्रमाणे सुरक्षा साधने तसेच जादा वेळ काम (ओव्हरटाईम) केल्याचा जादा मोबदला देत नाहीत. बेरोजगारीची कुऱ्हाड कधीही कोसळेल, या कारणांमुळे साखर क्षेत्रात काम करण्यास उच्चशिक्षित तरुण तयार नाहीत. सध्या साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत, असा निव्वळ देखावा केला जात आहे, असे साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांचे म्हणणे आहे. शासनाने जरी १५ टक्के पगारवाढ करण्याचे ठरवले असले, तरी होणारी पगारवाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. ही पगारवाढ कामगारांच्या कौटुंबिक गरजा भागविणारी नाही. साखर कारखानदारांनी याचा विचार करावा, अन्यथा भविष्यात साखर कारखान्यांच्या अडचणीत भर पडल्याशिवाय राहणार नाही. या वर्षी उसाच्या कमतरतेमुळे बरेच साखर कारखाने चालू झाले नाहीत त्यामुळे तेथील बरेच अभियंते आणि इतर कामगारांनी वेगळा रस्ता धरला आहे किंवा इतर कारखान्यात काम मिळवले आहे. कारखान्यांनीही वेळीच याकडे लक्ष दिले नाही; तर कारखान्यांना कुशल कामगारांना मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे.