शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमधील चंगळवाद कमी करायला हवा : डॉ. आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

पुणे: आज मुलांना स्वभान लवकर येतंय. पण त्यातून मुलं आत्मकेंद्रित झाली आहेत, कारण पालक आत्मकेंद्रित आहेत. म्हणूनच त्यांच्यातील चंगळवाद ...

पुणे: आज मुलांना स्वभान लवकर येतंय. पण त्यातून मुलं आत्मकेंद्रित झाली आहेत, कारण पालक आत्मकेंद्रित आहेत. म्हणूनच त्यांच्यातील चंगळवाद कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी समतोल जीवनशैली अंगीकारायला हवी, अशी भूमिका मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मांडली. आता कुटुंब आणि समाज एकत्र यायला हवा. कारण पोस्ट पँडेमिक काळात ध्रुवीकरण वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाने सुरू केलेल्या सामाजिक पालकत्व विभागाच्या उद्घाटनप्रसंगी आॅनलाइन मुलाखतीत ते बोलत होते. पत्रकार उत्तमकुमार इंदोरे व सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता शिंगटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

सामाजिक पालकत्व हा काही नवीन प्रकार नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘‘सामाजिक पालकत्व हे वैयक्तिक पालकत्वाच्या आधीपासून आहे. टोळी काळापासून ते चालत आलेलं आहे. त्यामुळे मुलाला समाजापर्यंत पोहोचवणं आणि मग त्याचं समाजानेही संगोपन करणं या दोन्ही गोष्टी घडायला हव्यात.

मुलांना बेगडीपणा बरोबर कळतो. त्यामुळे त्यांना अस्सलपणा दाखवावा लागतो. त्यासाठी समाजातील चांगुलपणा त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा. मोठ्या मुलांकडून लहान मुलांना शिकवणं, त्यांचं मेंटॉर होणं हे सामाजिक भान देण्यासाठी करायला हवं. रक्ताची नाती आणि सामाजिक नाती दोन्ही महत्त्वाची आहेत. पण जैविक नात्याला असलेलं अवास्तव महत्व कमी करावं असेही ते म्हणाले. ’मिळून सा-याजणी’चा सामाजिक पालकत्व विभाग या कामात सगळ्यांचा समन्वयक बनू शकतो. त्यासाठी समाजात चाललेलं चांगलं काम दाखवणारं व्यासपीठ या विभागाने उपलब्ध करून द्यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘मिळून सा-याजणी’च्या संपादिका डॉ. गीताली वि. मं. यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप मसहूर यांनी आभार मानले.

------------------------------