शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

मुलांमधील चंगळवाद कमी करायला हवा : डॉ. आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

पुणे: आज मुलांना स्वभान लवकर येतंय. पण त्यातून मुलं आत्मकेंद्रित झाली आहेत, कारण पालक आत्मकेंद्रित आहेत. म्हणूनच त्यांच्यातील चंगळवाद ...

पुणे: आज मुलांना स्वभान लवकर येतंय. पण त्यातून मुलं आत्मकेंद्रित झाली आहेत, कारण पालक आत्मकेंद्रित आहेत. म्हणूनच त्यांच्यातील चंगळवाद कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी समतोल जीवनशैली अंगीकारायला हवी, अशी भूमिका मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मांडली. आता कुटुंब आणि समाज एकत्र यायला हवा. कारण पोस्ट पँडेमिक काळात ध्रुवीकरण वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाने सुरू केलेल्या सामाजिक पालकत्व विभागाच्या उद्घाटनप्रसंगी आॅनलाइन मुलाखतीत ते बोलत होते. पत्रकार उत्तमकुमार इंदोरे व सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता शिंगटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

सामाजिक पालकत्व हा काही नवीन प्रकार नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘‘सामाजिक पालकत्व हे वैयक्तिक पालकत्वाच्या आधीपासून आहे. टोळी काळापासून ते चालत आलेलं आहे. त्यामुळे मुलाला समाजापर्यंत पोहोचवणं आणि मग त्याचं समाजानेही संगोपन करणं या दोन्ही गोष्टी घडायला हव्यात.

मुलांना बेगडीपणा बरोबर कळतो. त्यामुळे त्यांना अस्सलपणा दाखवावा लागतो. त्यासाठी समाजातील चांगुलपणा त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा. मोठ्या मुलांकडून लहान मुलांना शिकवणं, त्यांचं मेंटॉर होणं हे सामाजिक भान देण्यासाठी करायला हवं. रक्ताची नाती आणि सामाजिक नाती दोन्ही महत्त्वाची आहेत. पण जैविक नात्याला असलेलं अवास्तव महत्व कमी करावं असेही ते म्हणाले. ’मिळून सा-याजणी’चा सामाजिक पालकत्व विभाग या कामात सगळ्यांचा समन्वयक बनू शकतो. त्यासाठी समाजात चाललेलं चांगलं काम दाखवणारं व्यासपीठ या विभागाने उपलब्ध करून द्यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘मिळून सा-याजणी’च्या संपादिका डॉ. गीताली वि. मं. यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप मसहूर यांनी आभार मानले.

------------------------------