शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

चिलापीने गिळले इतर प्रजातींचे मासे (दिल्लीसाठी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:15 IST

शिवाजी पवार श्रीरामपूर : जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, ढोरा या नद्यांमध्ये आता केवळ चिलापी याच प्रजातीचा मासा व ...

शिवाजी पवार

श्रीरामपूर : जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, ढोरा या नद्यांमध्ये आता केवळ चिलापी याच प्रजातीचा मासा व तोही मोठ्या संख्येने मिळून येत आहे. प्रदूषित पाण्यातही चिलापी तग धरून राहतो व गुणाकारात वाढतो. इतर माशांना मात्र तो जगू देत नाही. त्यामुळे खवय्यांना खुणावणारे गावरान वाम, कटला, रावस, मरळ, खवली हे मासे जलाशयांतून हद्दपार झाले आहेत.

या वर्षी उशिराने का होईना सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मासेमारीला चांगले दिवस आले आहेत. जिल्ह्यातून दररोज ३० टन माशांची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मालेगाव तसेच भिवंडी, दादर येथून माशांना मागणी आहे.

मिळून येणाऱ्या माशांमध्ये चिलापीचा समावेश आहे. इतर सर्वच मासे आता नामशेष झाल्यात जमा आहेत. जाळे टाकले की त्यात केवळ चिलापी अडकणार हे ठरलेले. इतर प्रजातीचे केवळ चार-दोन मासेच मिळून येतात. ३० टनांमध्ये अवघे ५ ते १० टक्के इतर मासे आढळून येत आहेत. पूर्वी चिलापी हा केवळ उजनी धरणापुरताच मर्यादित होता. इंदापूर, भिगवण हे चिलापीचे मुख्य बाजारकेंद्र. आता मात्र त्याने जिल्ह्यातील सीना ते गोदावरी या सर्वच नद्यांचा ताबा घेतला आहे. डुक्करमासा या नावानेच त्याची वेगळी ओळख आहे. खाऱ्या, गोड्या किंवा अतिशय प्रदूषित पाण्यातही तो टिकून राहतो. त्यामुळेच डुक्करमासा हे नाव त्याला चिकटले.

एखाद्या नदीत अथवा जलाशयांत तो घुसला की तेथे स्वत:चे प्रस्थ वाढवितो. पाण्यातील शेवाळ तर खातोच, मात्र वेळप्रसंगी इतर माशांची अंडीही फस्त करतो. चिलापीची उत्पादनक्षमता अफाट आहे. त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतर माशांवर मात्र संक्रांत आली आहे. ते नामशेष होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

--------

गरिबांचा मेवा

चिलापीला गरिबांचा मेवा म्हटले जाते. कारण अवघ्या ४० ते ५० रुपये किलो दरामध्ये तो उपलब्ध होतो. ६०० ते ८०० रुपये किलोच्या सुरमई व पापलेटपेक्षा चिलापीवरच ताव मारलेला बरा, असे खवय्ये म्हणतात. अगदी मुंबईतील गरीब व मध्यमवर्गीय घटकांना तो परडवतो.

------------

मासेमारीत अनेकांना रोजगार

चिलापीचे पीक जोमाने बहरले आहे. त्यामुळे नद्या व जलाशयांमध्ये हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चारशे रुपयांचे दहा किलो मासे हातोहात ८०० रुपयांना व्यापाऱ्यांना विकून मोकळे होता येते व रोजंदारी सुटते.

---------

चिलापीचे आक्रमण थोपविणे गरजेचे आहे. स्थानिक माशांच्या जाती जतन कराव्या लागतील. त्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा फार उशीर होईल.

-इम्रान शेख, मासे व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते

श्रीरामपूूर.

----