शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कडक उन्हाचे वन्यजीवांना चटके

By admin | Updated: April 11, 2017 03:45 IST

तीव्र उन्हाळ्यामुळे कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रातील गवत पूर्णपणे सुकून गेले आहे. तसेच, येथील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याने तहान-भुकेने वन्यजीव धोक्यात आले आहेत.

बारामती : तीव्र उन्हाळ्यामुळे कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रातील गवत पूर्णपणे सुकून गेले आहे. तसेच, येथील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याने तहान-भुकेने वन्यजीव धोक्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्वांत मोठे वनक्षेत्र म्हणून कळसचा उल्लेख होतो. कळससह इंदापूर तालुक्यात ६ हजार हेक्टरवर वनक्षेत्र पसरले आहे. इंदापूर वनक्षेत्रामध्ये खोकड, चिंकारा, मोर, कोल्हा, लांडगे, तरस आदीसह लहान-मोठे पशुपक्षी आढळतात. भादलवाडी तलाव आणि उजनी धरण परदेशी पक्ष्यांचे सारंगगार म्हणून ओळखले जाते. मात्र, यावर्षी भादलवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने चित्रबलाक आणि बगळ्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली. विणीच्या हंगामासाठी हे पक्षी दर वर्षी इंदापूर तालुक्यात येत असतात. यंदा प्रथमच बगळ्यांनी वालचंदनगर परिसरात वस्ती केली. मार्च महिन्यापासूनच येथील तापमानाने चाळिशी ओलांडली. परिणामी येथील वनक्षेत्रातील गवत, पाणवठे पूर्णपणे सुकून गेले. दर वर्षी उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात. साहजिकच त्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष होतो. चारा-पाण्याच्या शोधार्थ फिरणारे वन्यजीव अपघातात बळीदेखील पडतात. इंदापूर वनविभागाने वनक्षेत्रातील कोरड्या टाक्या भरण्यासाठी दोन टँकरची सोय केल्याचे सांगितले. मात्र, ६ हजार हेक्टर वनक्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यात दोन टँकरच्या साहाय्याने वन्यजीवांची कितपत तहान भागणार, असा प्रश्न प्राणिमित्रांमधून विचारला जात आहे. (वार्ताहर)इंदापूर वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक पाणवठे जास्त आहेत. तसेच, वनक्षेत्रात जलसंधारणाची कामेदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सध्या दोन टँकरद्वारे कळस भागातील पाणवठ्यात पाणी सोडण्याची सोय केली आहे. पुढील दोन दिवसांत कळस भागातील सर्व पाणवठे भरण्यात येतील. - राहुल काळे (वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर)