शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

कडक उन्हाचे वन्यजीवांना चटके

By admin | Updated: April 11, 2017 03:45 IST

तीव्र उन्हाळ्यामुळे कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रातील गवत पूर्णपणे सुकून गेले आहे. तसेच, येथील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याने तहान-भुकेने वन्यजीव धोक्यात आले आहेत.

बारामती : तीव्र उन्हाळ्यामुळे कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रातील गवत पूर्णपणे सुकून गेले आहे. तसेच, येथील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याने तहान-भुकेने वन्यजीव धोक्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्वांत मोठे वनक्षेत्र म्हणून कळसचा उल्लेख होतो. कळससह इंदापूर तालुक्यात ६ हजार हेक्टरवर वनक्षेत्र पसरले आहे. इंदापूर वनक्षेत्रामध्ये खोकड, चिंकारा, मोर, कोल्हा, लांडगे, तरस आदीसह लहान-मोठे पशुपक्षी आढळतात. भादलवाडी तलाव आणि उजनी धरण परदेशी पक्ष्यांचे सारंगगार म्हणून ओळखले जाते. मात्र, यावर्षी भादलवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने चित्रबलाक आणि बगळ्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली. विणीच्या हंगामासाठी हे पक्षी दर वर्षी इंदापूर तालुक्यात येत असतात. यंदा प्रथमच बगळ्यांनी वालचंदनगर परिसरात वस्ती केली. मार्च महिन्यापासूनच येथील तापमानाने चाळिशी ओलांडली. परिणामी येथील वनक्षेत्रातील गवत, पाणवठे पूर्णपणे सुकून गेले. दर वर्षी उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात. साहजिकच त्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष होतो. चारा-पाण्याच्या शोधार्थ फिरणारे वन्यजीव अपघातात बळीदेखील पडतात. इंदापूर वनविभागाने वनक्षेत्रातील कोरड्या टाक्या भरण्यासाठी दोन टँकरची सोय केल्याचे सांगितले. मात्र, ६ हजार हेक्टर वनक्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यात दोन टँकरच्या साहाय्याने वन्यजीवांची कितपत तहान भागणार, असा प्रश्न प्राणिमित्रांमधून विचारला जात आहे. (वार्ताहर)इंदापूर वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक पाणवठे जास्त आहेत. तसेच, वनक्षेत्रात जलसंधारणाची कामेदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सध्या दोन टँकरद्वारे कळस भागातील पाणवठ्यात पाणी सोडण्याची सोय केली आहे. पुढील दोन दिवसांत कळस भागातील सर्व पाणवठे भरण्यात येतील. - राहुल काळे (वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर)