शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हाचे वन्यजीवांना चटके

By admin | Updated: April 11, 2017 03:45 IST

तीव्र उन्हाळ्यामुळे कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रातील गवत पूर्णपणे सुकून गेले आहे. तसेच, येथील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याने तहान-भुकेने वन्यजीव धोक्यात आले आहेत.

बारामती : तीव्र उन्हाळ्यामुळे कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रातील गवत पूर्णपणे सुकून गेले आहे. तसेच, येथील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याने तहान-भुकेने वन्यजीव धोक्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्वांत मोठे वनक्षेत्र म्हणून कळसचा उल्लेख होतो. कळससह इंदापूर तालुक्यात ६ हजार हेक्टरवर वनक्षेत्र पसरले आहे. इंदापूर वनक्षेत्रामध्ये खोकड, चिंकारा, मोर, कोल्हा, लांडगे, तरस आदीसह लहान-मोठे पशुपक्षी आढळतात. भादलवाडी तलाव आणि उजनी धरण परदेशी पक्ष्यांचे सारंगगार म्हणून ओळखले जाते. मात्र, यावर्षी भादलवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने चित्रबलाक आणि बगळ्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली. विणीच्या हंगामासाठी हे पक्षी दर वर्षी इंदापूर तालुक्यात येत असतात. यंदा प्रथमच बगळ्यांनी वालचंदनगर परिसरात वस्ती केली. मार्च महिन्यापासूनच येथील तापमानाने चाळिशी ओलांडली. परिणामी येथील वनक्षेत्रातील गवत, पाणवठे पूर्णपणे सुकून गेले. दर वर्षी उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात. साहजिकच त्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष होतो. चारा-पाण्याच्या शोधार्थ फिरणारे वन्यजीव अपघातात बळीदेखील पडतात. इंदापूर वनविभागाने वनक्षेत्रातील कोरड्या टाक्या भरण्यासाठी दोन टँकरची सोय केल्याचे सांगितले. मात्र, ६ हजार हेक्टर वनक्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यात दोन टँकरच्या साहाय्याने वन्यजीवांची कितपत तहान भागणार, असा प्रश्न प्राणिमित्रांमधून विचारला जात आहे. (वार्ताहर)इंदापूर वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक पाणवठे जास्त आहेत. तसेच, वनक्षेत्रात जलसंधारणाची कामेदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सध्या दोन टँकरद्वारे कळस भागातील पाणवठ्यात पाणी सोडण्याची सोय केली आहे. पुढील दोन दिवसांत कळस भागातील सर्व पाणवठे भरण्यात येतील. - राहुल काळे (वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर)