शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चिऊताईला हवे हक्काचे घर!

By admin | Updated: March 20, 2017 04:16 IST

पूर्वीच्या दाट वनांमध्ये प्राणीपक्ष्यांनी जीवन समृद्ध होते, अशा या अप्रतिम सौंदर्यसंपन्नतेचे वर्णन तत्कालीन कवितांमधून

खोडद : पूर्वीच्या दाट वनांमध्ये प्राणीपक्ष्यांनी जीवन समृद्ध होते, अशा या अप्रतिम सौंदर्यसंपन्नतेचे वर्णन तत्कालीन कवितांमधून, गीतांमधून नेहमीच होत आले आहे. पर्यावरण व निसर्गातील पशुपक्ष्यांविषयी वर्णन करण्यासाठी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले ‘जहाँ डाल डाल पर सोने कि चिडियाँ करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा...! हे देशभक्तीपर गीत आपल्या सर्वांचेच आवडीचे व परिचीत आहे. या गीतामध्ये लेखकाने चिमणीला ‘सोने की चिडियाँ’ असा उल्लेख करून आपल्या लाडक्या व आवडत्या चिऊताईला म्हणजेच चिमणीला सोन्याची उपमा दिली आहे. निश्चितच यावरून आपल्या लक्षात येते,की एकेकाळी आपल्या देशात चिमण्यांची संख्या मुबलक होती. सध्या सिमेंट काँक्रिटच्या जंगलात निसर्गाचा समतोल ढासळला आणि पक्षी माणसापासून दूर जाऊ लागले.‘भारतीय चिमणी म्हणजे इंग्रजीमधील इंडियन हाऊस स्पॅरो, ही चिमणी १५ सेंमी लांबीची व सुमारे २० ते २२ ग्रॅम वजनाची असते. विणीच्या हंगामात जोडीने राहणाऱ्या या चिमण्या हंगाम नसताना मोठ्या थव्याने रात्रीच्या वेळी एकत्र मुक्काम करतात. त्यांची स्वत:ची अशी वसतिस्थाने असतात. त्या नेहमीच जमावाने किंवा घोळक्याने दिसतात. चिमणा-चिमणीची जोडी हंगामाच्या दिवसात सतत प्रणयमग्न झालेली दिसून येते. या काळात त्यांच्या प्रेमाला भरती येते. चिर्रर... चिर्रर... चिर्रर अशा काहीशा मोठ्या आवाजात नर गाऊ लागतो, मग मादी त्याच्याजवळ येऊन पिसे काढण्याचे नाटक करते, यातच एकमेकांचा जोडीदार ठरला जातो. खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी सांगितले. ‘संपूर्ण जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात शेतीसाठी सर्वाधिक खतांचा वापर केला जातो, याचाच दुष्परिणाम चिमण्यांवर झाला आहे. चिमण्यांच्या पिलांचे मुख्य अन्न म्हणजे पिकांवरील कीटक व सुरवंट होय. पिलांच्या जन्मानंतर सुरुवातीचे १५ दिवस पिलांना या कीटकांवरच उदरनिर्वाह करावा लागतो. चिमण्यांची पिले जन्मत: दाणे खाऊ शकत नाहीत, पण शेती पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीमुळे पिलांचे अन्नच नाहीसे झाले आहे, पिलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे कीटकच न मिळाल्याने चिमण्यांची पिले अल्पायुषी होत आहेत. साधारणपणे ९०च्या दशकात भारतात मोबाईल क्रांती झाली. शहरातील इमारतींवर तर ग्रामीण भागातील शेतांमध्ये मोबाईलचे टॉवर्स उभे राहीले. मात्र या मोबाईल टॉवर्समधून प्रवर्तीत होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी चिमण्यांसह माणसालाही हानीकारक ठरत आहे. विद्युत चुंबकीय लहरींमुळे स्पेनमधील चिमण्या गायब झाल्या, हे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. चिमण्यांच्या प्रजननशक्तीवर व आरोग्यावर या लहरींचा मोठा परिणाम होत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे.