शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिऊताईला हवे हक्काचे घर!

By admin | Updated: March 20, 2017 04:16 IST

पूर्वीच्या दाट वनांमध्ये प्राणीपक्ष्यांनी जीवन समृद्ध होते, अशा या अप्रतिम सौंदर्यसंपन्नतेचे वर्णन तत्कालीन कवितांमधून

खोडद : पूर्वीच्या दाट वनांमध्ये प्राणीपक्ष्यांनी जीवन समृद्ध होते, अशा या अप्रतिम सौंदर्यसंपन्नतेचे वर्णन तत्कालीन कवितांमधून, गीतांमधून नेहमीच होत आले आहे. पर्यावरण व निसर्गातील पशुपक्ष्यांविषयी वर्णन करण्यासाठी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले ‘जहाँ डाल डाल पर सोने कि चिडियाँ करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा...! हे देशभक्तीपर गीत आपल्या सर्वांचेच आवडीचे व परिचीत आहे. या गीतामध्ये लेखकाने चिमणीला ‘सोने की चिडियाँ’ असा उल्लेख करून आपल्या लाडक्या व आवडत्या चिऊताईला म्हणजेच चिमणीला सोन्याची उपमा दिली आहे. निश्चितच यावरून आपल्या लक्षात येते,की एकेकाळी आपल्या देशात चिमण्यांची संख्या मुबलक होती. सध्या सिमेंट काँक्रिटच्या जंगलात निसर्गाचा समतोल ढासळला आणि पक्षी माणसापासून दूर जाऊ लागले.‘भारतीय चिमणी म्हणजे इंग्रजीमधील इंडियन हाऊस स्पॅरो, ही चिमणी १५ सेंमी लांबीची व सुमारे २० ते २२ ग्रॅम वजनाची असते. विणीच्या हंगामात जोडीने राहणाऱ्या या चिमण्या हंगाम नसताना मोठ्या थव्याने रात्रीच्या वेळी एकत्र मुक्काम करतात. त्यांची स्वत:ची अशी वसतिस्थाने असतात. त्या नेहमीच जमावाने किंवा घोळक्याने दिसतात. चिमणा-चिमणीची जोडी हंगामाच्या दिवसात सतत प्रणयमग्न झालेली दिसून येते. या काळात त्यांच्या प्रेमाला भरती येते. चिर्रर... चिर्रर... चिर्रर अशा काहीशा मोठ्या आवाजात नर गाऊ लागतो, मग मादी त्याच्याजवळ येऊन पिसे काढण्याचे नाटक करते, यातच एकमेकांचा जोडीदार ठरला जातो. खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी सांगितले. ‘संपूर्ण जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात शेतीसाठी सर्वाधिक खतांचा वापर केला जातो, याचाच दुष्परिणाम चिमण्यांवर झाला आहे. चिमण्यांच्या पिलांचे मुख्य अन्न म्हणजे पिकांवरील कीटक व सुरवंट होय. पिलांच्या जन्मानंतर सुरुवातीचे १५ दिवस पिलांना या कीटकांवरच उदरनिर्वाह करावा लागतो. चिमण्यांची पिले जन्मत: दाणे खाऊ शकत नाहीत, पण शेती पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीमुळे पिलांचे अन्नच नाहीसे झाले आहे, पिलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे कीटकच न मिळाल्याने चिमण्यांची पिले अल्पायुषी होत आहेत. साधारणपणे ९०च्या दशकात भारतात मोबाईल क्रांती झाली. शहरातील इमारतींवर तर ग्रामीण भागातील शेतांमध्ये मोबाईलचे टॉवर्स उभे राहीले. मात्र या मोबाईल टॉवर्समधून प्रवर्तीत होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी चिमण्यांसह माणसालाही हानीकारक ठरत आहे. विद्युत चुंबकीय लहरींमुळे स्पेनमधील चिमण्या गायब झाल्या, हे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. चिमण्यांच्या प्रजननशक्तीवर व आरोग्यावर या लहरींचा मोठा परिणाम होत आहे, ही मोठी गंभीर बाब आहे.