शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

कारखानदारांचे रासायनिक पाणी गटारांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:55 IST

पावसाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र महाड औद्योगिक वसाहतीमधील उघडे प्लॉट आणि गटारे रंगीबेरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : पावसाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र महाड औद्योगिक वसाहतीमधील उघडे प्लॉट आणि गटारे रंगीबेरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. नालेसफाई न झाल्याने आता गटारांतील रसायनमिश्रित सांडपाणी रस्त्यावरच येवू लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळा सुरू झाला की महाड एमआयडीसी परिसरातील अनेक कारखान्यांमधून घातक रासायनिक सांडपाणी गटारांमध्ये, नाल्यांमध्ये सोडण्यात येते. यंदा देखील अशीच परिस्थिती या महाड औद्योगिक वसाहत औद्योगिक वसाहतीची झाली आहे. सुरुवातीच्या थोड्या लागणाऱ्या पावसामध्ये संपूर्ण महाड औद्योगिक वसाहत क्षेत्र रंगीबेरंगी झाली आहे. दरवर्षी मात्र गटारांमध्ये सोडण्यात येणारे पाणी सरळ सरळ वाहत थेट नदीला मिसळते. यंदा मात्र महाराष्टÑ औद्योगिक वसाहत महामंडळाकडून अद्याप या परिसरातील गटारांची साफसफाई न झाल्यामुळे हे सोडण्यात येणारे गटारातील रासायनिक सांडपाणी गटारांमध्येच तुंबून राहिले आहे, तर मोठ्या पावसात हे सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. काही उघड्या प्लॉटमध्येही साचल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर येणाºया तसेच गटारांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे औद्योगिक परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. तर या गटारांमध्ये तुंबलेले घातक रसायन पाण्यामुळे परिसरातून नागरिक तसेच कामगारवर्गाला याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत असून आरोग्यास धोकादायक बनला आहे.महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने बंद अवस्थेत आहे. कारखान्यांमध्ये पडलेले किंवा जुना स्टॉक असलेली पावडर किंवा रसायन पावसाच्या पाण्याबरोबरच वाहून येते. तर अनेकदा छोट्या कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते.महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या मागच्या बाजूस असलेल्या उघड्या जागेमध्ये पावसापूर्वीच केमिकल पाणी दिसत होते. पावसामुळे या प्लॉटला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून संपूर्ण प्लॉट पांढºया रंगाच्या रासायनिक पाण्याने भरला आहे. त्याचबरोबर सानिक, शेट्ये, मल्लक, निंबुस, सुदर्शन अशा इतर अनेक कारखान्यांसमोर गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी तुंबले आहे. सुदर्शन कारखान्यासमोरील गटारामध्ये गेली दोन महिन्यापासूनच सांडपाणी साचले आहे.हेच रासायनिक पाणी पुढे सावित्री नदीत मिसळते. त्यामुळे नदीलगतच्या गावांना दूषित पाणी मिळत आहे. औद्योगिक वसाहतीतील झालेल्या या अवस्थेबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा महाराष्टÑ औद्योगिक वसाहत महामंडळ असो याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या गटारांची साफसफाई महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाकडून होणे गरजेची होती. मात्र त्यांचेकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वीचे काढायचे टेंडर ऐन पावसाळ्यात काढण्यात आल्याची माहिती महाराष्टÑ औद्योगिक महामंडळाच्या सूत्राकडून देण्यात आली आहे.>बदल्यांचा फटकामहाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बहुतेक अधिकाºयांच्या बदल्या झाल्या झाल्या आहेत. नवीन येणारे अधिकारी यांना मात्र या परिसराची माहिती कमी असते. सध्या नवीन आलेल्या अधिकाºयांचा गैरफायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रात हा उद्योग पाणी सोडण्याचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी येणाºया अधिकाºयांनी लवकरच या परिसराची पाहणी करून या कारखानदारांना लगाम लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.