शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीस गावांसाठी ‘छावणी’ची चाचपणी

By admin | Updated: May 3, 2016 03:25 IST

पुढील काळात जिल्ह्यातील ३० गावांना चाराटंचाईची झळ बसू शकते. येथील २२ हजार ५१८ जनावरांना प्रतिदिन २८ हजार ७५० मेट्रिक टन चारा लागू शकतो, असा प्राथमिक अहवाल जिल्हा

पुणे : पुढील काळात जिल्ह्यातील ३० गावांना चाराटंचाईची झळ बसू शकते. येथील २२ हजार ५१८ जनावरांना प्रतिदिन २८ हजार ७५० मेट्रिक टन चारा लागू शकतो, असा प्राथमिक अहवाल जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे दिला आहे. ‘त्या’ गावांसाठी चारा छावणी/ डेपासाठी चाचपणी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात टंचाईसंदर्भात झालेल्या आढावा बैैठकीत चारा छावणी व डेपोची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. १९व्या पशुगणनेनुसार म्हणजे २०१२ या वर्षातील आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मागणी झालेल्या गावांत नेमकी आजच्या घडीला किती जनावरे आहेत, याचे ठोस उत्तर प्रशासनाकडे नव्हते. या वेळी मोरगाव या एका गावाच्या जनावरांच्या स्थितीचा आढावा घेतला असता त्यात मोठी तफावतही दिसून आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय जनावरांची संख्या व प्रतिदिन द्यावयाचे चाऱ्याचे प्रमाण अंतिमत: निश्चित करून तत्काळ अहवाल सदार करावा. कृषी विभागाने सर्व पिकांपासून उपलब्ध होणारा चारा, भविष्यातील चाराटंचाई विचारात घेऊन वैरण विकास कार्यक्रमांतर्गत करायचे बियाणेवाटप, त्यासाठी आवश्यक निधी, याबाबत प्रस्ताव आवश्यक असल्यास सादर करावा, असे आदेश दिले होते.त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने संभाव्य चाराटंचाईग्रस्त गावांकरिता आवश्यक चाऱ्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ३० गावांत २२ हजार ५१८ जनावरांना दरदिवशी २८ हजार ७५० मेट्रिक टन चारा लागू शकतो, असे कळविले आहे. या ३० गावांत १५ हजार ७७४ मोठी व ६ हजार ७४४ लहान जनावरे आहेत. मोठ्या जनावरांना १५ किलो, तर लहान जनावरांना ७.५ किलो चारा दरदिवशी लागेल.शेळ्या-मेंढ्यांचाही चाऱ्यामध्ये समावेशटंचाईत यापूर्वी शेळ्या-मेंढ्यांना चारा पुरविणे बंधनकारक नव्हते. मात्र, या वर्षी शासनाने शेळ्या-मेंढ्यांनाही चारा पुरवावा, असे कळविले आहे. त्यामुळे चारा छावणी किंवा डेपोत त्यांचाही समावेश होणार आहे.