शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अभियांत्रिकी प्रवेशापूर्वी क्षमता तपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

मुळात अभियांत्रिकी म्हणजे काय? हे प्रथमतः समजून घेतले पाहिजे. विज्ञानाचे नियम, मूलभूत ज्ञानाचा अभ्यास करून त्यायोगे विविध उपकरणे, ॲप्लिकेशन ...

मुळात अभियांत्रिकी म्हणजे काय? हे प्रथमतः समजून घेतले पाहिजे. विज्ञानाचे नियम, मूलभूत ज्ञानाचा अभ्यास करून त्यायोगे विविध उपकरणे, ॲप्लिकेशन तंत्रज्ञान विकसित करणे अभियांत्रिकी क्षेत्रात गरजेचे आहे. त्यासाठी बारावीपर्यंतचा असलेला पक्का पाया, चिकाटी, कष्टाची तयारी, अभ्यासक्रमाबाहेरचे शिकून घेण्याची मानसिकता विद्यार्थ्यांकडे हवी. सुरुवातीला हुशार समजला जाणारा एक विशिष्ट विद्यार्थीवर्गच अभियांत्रिकीसाठी प्रवेश घ्यायचा. अभियांत्रिकीचे शिक्षण आणि त्यासाठी लागणारी कुवत विद्यार्थ्यांकडे होती. त्यामुळे पदवी मिळताच त्यांना मनासारखी नोकरीही मिळत होती. त्या काळातील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वत:चे मोठमोठे व्यवसाय सुद्धा उभे केले.

सर्वांनाच तंत्रज्ञानाचे शिक्षण या नावाखाली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि शासन यांच्या धोरणामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढली. विविध शाखांची प्रवेशक्षमता वाढली. परंत, दुर्देेैवाने प्रवेशाचे निकष शिथिल झाले. त्यामुळे कुणालाही अभियांत्रिकीला प्रवेश घेणे सोपे झाले. अभियांत्रिकी शिक्षणासाठी मूलभूत ज्ञान (बारावीपर्यंतचे), चिकाटी, कष्ट करण्याची तयारी लागते. परंतु, अभियांत्रिकी प्रवेशाचे निकष कमी केल्याने आणि प्रवेशक्षमता वाढल्याने ज्याची कुवत नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळणे सुलभ झाले. परंतु, त्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मात्र, ज्ञानवंत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. तसेच कमीत कमी कष्टात उतीर्ण होण्याची वृत्ती वाढली.

केवळ उत्तीर्ण होणे, ४० ते ५० टक्के गुण मिळविणे, असे अंतिम ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. त्यामुळे अभियांत्रिकीच्या मूळ उद्देशालाच धक्का पोहोचला. मात्र, अभियांत्रिकीचे सर्वच विद्यार्थी असा विचार करत नाहीत. बरेचशे विद्यार्थी बारावीला कमी गुण असूनही, अभियांत्रिकी परीक्षेत चांगले गुण, ज्ञान मिळवून चांगल्या नोकरीला लागल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी चार वर्षांत अभ्यासाबरोबरच स्वत:लाही विकसित केले. आवश्यक प्रशिक्षण घेऊन ज्ञान आत्मसात करून चांगल्या पदावर पोहचले. मात्र, दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे.

औद्योगिक क्षेत्रातही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मागणी असते. परंतु, कामचुकारपणा, बेशिस्त आदी गोष्टींमुळे वर्षभरातच नोकरी गमवावी लागणारे विद्यार्थीही भरपूर आहेत. पदवी मिळाली पण नोकरी नाही? त्यामुळे ज्यांची परिस्थिती चांगली आहे, असे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करतात. हे नाही? जमले म्हणून ते’ अशा वृत्तीमुळे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणारी टक्केवारी सुद्धा कमी झाली आहे. काही विद्यार्थी बँकिंग किंवा मार्केटिंगमध्ये नोकरी पत्करतात. राहिलेला वर्ग शेवटी कॉल सेंटरची नोकरी स्वीकारतो. हे कटू सत्य आहे. हे सर्व टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पालक, शासन आणि शिक्षण संस्थांनी विशेष अभ्यास करणे आवश्यक आहे.

आपल्या मुलाला दहावीला ९० टक्के आहेत किंवा माझे स्वप्न आहे म्हणून अभियांत्रिकीला प्रवेश घे, असे करण्यापेक्षा प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची क्षमता जाणून घेणे गरजेचे आहे. त्याच्या आवडीचा विचार करूनच त्याचा प्रवेश निश्चित केला पाहिजे. त्यामुळे अभियांत्रिकीची विशेष आवड असणारे विद्यार्थीच प्रवेश घेतील, आनंदाने शिकतील आणि या सगळ्याचा परिणाम निकाल आणि त्यांना लागणाऱ्या नोकऱ्यांवर होइल. आवड असलेले विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देतील.

महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि प्लेसमेंटसाठी प्रयत्नशील असतात. कारण प्लेसमेंट वाढले तर प्रवेश वाढतील, अशी सोपी धारणा त्यासाठी असते. दुर्दैवाने अभियांत्रिकीची आवड नसणारे, आईवडिलांची इच्छा म्हणून प्रवेश घेणारे किंवा शॉर्टकट घेऊन यशस्वी होता येईल, असा ॲटिट्यूड असणारे विद्यार्थी कोणत्याही प्रशिक्षणास प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये नोकरीसाठी लागणारे कौशल्य विकसित होत नाही. त्याचा परिणाम मिळणाऱ्या नोकरीवर होतो. या विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घेतले, प्रशिक्षण घेतले व विविध कौशल्य विकसित केले ते सर्व चांगल्या पदावर काम करत आहे. परंतु, जे विद्यार्थी केवळ टाइमपास म्हणून किंवा केवळ प्रमाणपत्रासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात उपस्थिती दर्शवतात. असे विद्यार्थी चांगल्या नोकरीचे निकष पूर्ण करू शकत नाही. मग शेवटी पर्याय म्हणून त्यांना मार्केटिंगचा किंवा वर्क सेंटरच्या ठिकाणी नोकरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी दहावी-बारावीच्या गुणांच्या मागे धावणे कमी करून प्रत्यक्ष शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात आणि विद्यार्थी व पालकांच्या मानसिकतेत बदल करून गुणवंत विद्यार्थी घडवले तरच प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी नोकरी आणि व्यवसाय करणे शक्य होईल.

- गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, अभियांत्रिकी विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ