शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

चारुकाका सरपोतदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:01 IST

मराठी नाट्यचित्रसृष्टीचा आधारवड, अशी ओळख असलेले पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त नानासाहेब सरपोतदार उर्फ चारुकाका (८७) यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी

पुणे : मराठी नाट्यचित्रसृष्टीचा आधारवड, अशी ओळख असलेले पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त नानासाहेब सरपोतदार उर्फ चारुकाका (८७) यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे किशोर आणि अभयही दोन मुले, दोन सुना, तीन नातवंडे असा परिवार आहे. चारुकाका यांचे पार्थिव शनिवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पूना गेस्ट हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता वैैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.भालजी पेंढारकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाºया चारुकाकांना लष्करात भरती होण्याची इच्छा होती. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकमधील भोसला मिलिट्री स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पूना गेस्ट हाऊसची धुरा त्यांनी सात दशकांहून अधिक काळ समर्थपणे सांभाळली. रंगभूमी आणि चित्रसृष्टीचा चालता-बोलता आलेख अशी ओळख असलेले चारुकाका अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते.सात वर्षे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यांनी चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘घर गंगेच्या काठी’ आणि ‘जावई माझा भला’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.जीवा-सखा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी पहिल्यांदा पुण्यात आले होते, त्यावेळी पूना गेस्ट हाऊसला थांबले होते. चित्रीकरणासाठी मला कोल्हापूरला जायचे त्याच वेळी पानशेत धरण फुटल्याने पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मी ही त्यात अडकले. मी सुरक्षित आहे, असे मला मुंबईला फोन करून सांगायचे होते. मी फोन करण्यासाठी पूना गेस्ट हाऊसला गेले. तेथे अक्षरश: गर्दीने हॉटेल भरले होते. चारूकाका मात्र भाकरी आणि बेसन करुन रात्रभर लोकांना जेवायला घालत होते. मलाही त्यांनी तेथेच थांबवून घेतले. त्यांच्या आईच्या खोलीत माझी राहण्याची व्यवस्था केली. - सुलोचना, ज्येष्ठ अभिनेत्रीज्या ज्या वेळी चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील कलाकारांवर सकंट कोसळले त्या त्या वेळी चारूदत्त सरपोतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते प्रेमळ होते. त्यांच्या जाण्याने कलाकारांचे आश्रयस्थान हरवले आहे.- लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्रीचारूकाका हे कलाकारांचा आधारस्तंभ होते. अनेकांना त्यांनी जगण्याचा आधार दिला. त्यांना गमावणे म्हणजे मायेची सावली हरवल्यासारखे वाटत आहे.- कीर्ती शिलेदार, ज्येष्ठ गायिका