शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

चारुकाका सरपोतदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:01 IST

मराठी नाट्यचित्रसृष्टीचा आधारवड, अशी ओळख असलेले पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त नानासाहेब सरपोतदार उर्फ चारुकाका (८७) यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी

पुणे : मराठी नाट्यचित्रसृष्टीचा आधारवड, अशी ओळख असलेले पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त नानासाहेब सरपोतदार उर्फ चारुकाका (८७) यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे किशोर आणि अभयही दोन मुले, दोन सुना, तीन नातवंडे असा परिवार आहे. चारुकाका यांचे पार्थिव शनिवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पूना गेस्ट हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता वैैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.भालजी पेंढारकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाºया चारुकाकांना लष्करात भरती होण्याची इच्छा होती. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकमधील भोसला मिलिट्री स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पूना गेस्ट हाऊसची धुरा त्यांनी सात दशकांहून अधिक काळ समर्थपणे सांभाळली. रंगभूमी आणि चित्रसृष्टीचा चालता-बोलता आलेख अशी ओळख असलेले चारुकाका अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते.सात वर्षे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यांनी चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘घर गंगेच्या काठी’ आणि ‘जावई माझा भला’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.जीवा-सखा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी पहिल्यांदा पुण्यात आले होते, त्यावेळी पूना गेस्ट हाऊसला थांबले होते. चित्रीकरणासाठी मला कोल्हापूरला जायचे त्याच वेळी पानशेत धरण फुटल्याने पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मी ही त्यात अडकले. मी सुरक्षित आहे, असे मला मुंबईला फोन करून सांगायचे होते. मी फोन करण्यासाठी पूना गेस्ट हाऊसला गेले. तेथे अक्षरश: गर्दीने हॉटेल भरले होते. चारूकाका मात्र भाकरी आणि बेसन करुन रात्रभर लोकांना जेवायला घालत होते. मलाही त्यांनी तेथेच थांबवून घेतले. त्यांच्या आईच्या खोलीत माझी राहण्याची व्यवस्था केली. - सुलोचना, ज्येष्ठ अभिनेत्रीज्या ज्या वेळी चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील कलाकारांवर सकंट कोसळले त्या त्या वेळी चारूदत्त सरपोतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते प्रेमळ होते. त्यांच्या जाण्याने कलाकारांचे आश्रयस्थान हरवले आहे.- लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्रीचारूकाका हे कलाकारांचा आधारस्तंभ होते. अनेकांना त्यांनी जगण्याचा आधार दिला. त्यांना गमावणे म्हणजे मायेची सावली हरवल्यासारखे वाटत आहे.- कीर्ती शिलेदार, ज्येष्ठ गायिका