शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

‘छत्रपती’ला २१ कोटी ३६ लाखांचा दंड

By admin | Updated: March 2, 2016 01:13 IST

राष्ट्रवादी (ता. इंदापूर) कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला तब्बल २१ कोटी ३६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बारामती :राष्ट्रवादी (ता. इंदापूर) कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला तब्बल २१ कोटी ३६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २०१५-१६च्या गळीत हंगामासाठी गाळप परवानाच घेतला नाही. त्यामुळे या काळात गाळप केलेल्या उसावर प्रतिटन ५०० रुपये दराने हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम भरली नाही तर कारखान्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आदेश दिले आहेत.छत्रपती साखर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील गळीत हंगामातील थकबाकी एका महिन्यात देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर साखर आयुक्तांनी गाळप परवाना दिला होता.मात्र, कारखाना व्यवस्थापनाने वारवांर साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांनी सुनावण्या घेऊन सूचना दिल्या. त्यानंतरदेखील संचालक मंडळाने मागील गळीत हंगामातील प्रतिटन १३० रुपये थकबाकी सभासदांना अदा केलेली नाही. छत्रपती सहकारी साखर कारखाना हा बारामतीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असून बारामती आणि इंदापूरचे कार्यक्षेत्र याअंतर्गत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची करून गेल्या निवडणुकीत पॅनल उभे केले होते. या पॅनलला पूर्ण बहुमतही मिळाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधूनच बंडखोरी करून बाहेर पडलेले राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचे विरोधी पॅनल होते. अजित पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात छत्रपती कारखान्याच्या संचालकपदापासून झाली. गेल्या वर्षीपर्यंत बॅँकेचे प्रतिनिधी या नात्याने ते संचालक होते. कारखान्याने थकबाकी दिली नसल्याबद्दल शेतकरी कृती समितीच्या वतीने पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. एफआरपीमधून कोणतीही कपात करता येत नाही. मंंत्री समितीच्या आदेशानुसार संबंधित कपात बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावर साखर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. दंड केलेली रक्कम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँक प्रतिनिधी, चीफ अकाउंटंट, कार्यकारी संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल करावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दंडाची झळ कारखाना, सभासदांना बसू देऊ नये, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे. कारखान्याने कारवाईला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी कृती समितीने लढा देण्याचा इशारा दिला आहे.(प्रतिनिधी)