शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

‘छत्रपती’ला २१ कोटी ३६ लाखांचा दंड

By admin | Updated: March 2, 2016 01:13 IST

राष्ट्रवादी (ता. इंदापूर) कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला तब्बल २१ कोटी ३६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बारामती :राष्ट्रवादी (ता. इंदापूर) कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला तब्बल २१ कोटी ३६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २०१५-१६च्या गळीत हंगामासाठी गाळप परवानाच घेतला नाही. त्यामुळे या काळात गाळप केलेल्या उसावर प्रतिटन ५०० रुपये दराने हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम भरली नाही तर कारखान्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आदेश दिले आहेत.छत्रपती साखर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील गळीत हंगामातील थकबाकी एका महिन्यात देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर साखर आयुक्तांनी गाळप परवाना दिला होता.मात्र, कारखाना व्यवस्थापनाने वारवांर साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांनी सुनावण्या घेऊन सूचना दिल्या. त्यानंतरदेखील संचालक मंडळाने मागील गळीत हंगामातील प्रतिटन १३० रुपये थकबाकी सभासदांना अदा केलेली नाही. छत्रपती सहकारी साखर कारखाना हा बारामतीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असून बारामती आणि इंदापूरचे कार्यक्षेत्र याअंतर्गत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची करून गेल्या निवडणुकीत पॅनल उभे केले होते. या पॅनलला पूर्ण बहुमतही मिळाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधूनच बंडखोरी करून बाहेर पडलेले राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचे विरोधी पॅनल होते. अजित पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात छत्रपती कारखान्याच्या संचालकपदापासून झाली. गेल्या वर्षीपर्यंत बॅँकेचे प्रतिनिधी या नात्याने ते संचालक होते. कारखान्याने थकबाकी दिली नसल्याबद्दल शेतकरी कृती समितीच्या वतीने पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. एफआरपीमधून कोणतीही कपात करता येत नाही. मंंत्री समितीच्या आदेशानुसार संबंधित कपात बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावर साखर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. दंड केलेली रक्कम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँक प्रतिनिधी, चीफ अकाउंटंट, कार्यकारी संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल करावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दंडाची झळ कारखाना, सभासदांना बसू देऊ नये, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे. कारखान्याने कारवाईला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी कृती समितीने लढा देण्याचा इशारा दिला आहे.(प्रतिनिधी)