शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चारित्र्य पडताळणीचा तुघलकी कारभार

By admin | Updated: February 12, 2017 04:52 IST

निवडणूक यंत्रणेच्या कारभारामुळे आधीच त्रस्त झालेल्या राजकीय पक्षांना पोलीस आयुक्तांच्या एका पत्राने तुघलकी कारभाराचा नमुना दाखविला आहे. मतदान प्रतिनिधींसाठी

पुणे : निवडणूक यंत्रणेच्या कारभारामुळे आधीच त्रस्त झालेल्या राजकीय पक्षांना पोलीस आयुक्तांच्या एका पत्राने तुघलकी कारभाराचा नमुना दाखविला आहे. मतदान प्रतिनिधींसाठी (पोलिंग एजंट) चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे केल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार संतप्त झाले आहेत. या सक्तीची प्रत्यक्षात अंमलबजावणी खुद्द पोलिसांनाही करणे शक्य नाही, असेच दिसत असूनही काही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रमाणपत्राचा आग्रह धरल्यामुळे राजकीय पक्षांच्या त्रासात भर पडली आहे.मतदार यादीत नाव आहे तीच व्यक्ती मतदान करते आहे, मतदान प्रक्रिया पार पाडली जात असताना कोणताही दबाव टाकला जात नाही, एकगठ्ठा मतदान होत नाही अशा गोष्टींकडे मतदान प्रतिनिधीने लक्ष ठेवायचे असते. ४१ प्रभागांमधील १६२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात एकूण १ हजार १०२ उमेदवार आहेत. मतदान केंद्रांची संख्या ३ हजार ४३२ आहे. काही प्रभागांमध्ये तेथील मतदारसंख्येनुसार १०० पेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक प्रभागातील ४ गटांत मिळून उमेदवारांची सरासरी संख्या १६ पेक्षा जास्त आहे. एका उमेदवाराचा प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिंग एजंट असतो. प्रत्येक प्रभागातील ४ गटांत मिळून किमान १६ मतदान प्रतिनिधी असतील. एखाद्या प्रभागात १०० मतदान केंद्रे असतील, तर तेथील मतदान प्रतिनिधींची संख्या किमान १ हजार ६०० इतकी होईल. ४१ प्रभागांची अशीच स्थिती आहे. सर्व प्रभागांचे मिळून काही हजार मतदान प्रतिनिधी होतील. त्या सर्वांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे पोलिसांना शक्य आहे का, असा बऱ्याच उमेदवारांचा सवाल आहे.चारित्र्य पडताळणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात १०० रुपये जमा करून अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज त्या कार्यालयाकडून संबंधित अर्जदाराच्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याकडे पाठविला जातो. पोलीस त्या पत्त्यावर जाऊन त्याच्या घरी, परिसरात चौकशी करतात, चौकीतील दप्तर तपासतात व काही नोंद नसेल तर ‘काहीही दखलपात्र नाही’ असे किंवा एखादी फिर्याद वगैरे असेल तर तशी नोंद करून प्रमाणपत्र देतात. या सर्व प्रक्रियेला बराच म्हणजे कधीकधी महिनाभराचा काळ लागतो. फारच तातडी असेल तरीही किमान एखादा आठवडा तरी जातोच.असे असताना कशासाठी पोलिंग एजंटना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती केली आहे, असे राजकीय पक्षांकडून विचारले जात आहे. उमेदवाराने किंवा राजकीय पक्षानेही त्यांच्या मतदान प्रतिनिधींची नावे एकगठ्ठा पोलीस आयुक्त कार्यालयात दिली, तरीही प्रमाणपत्र देण्यासाठी हीच पद्धत आहे. ही पद्धत न वापरता थेट प्रमाणपत्र दिली तर मग तो फक्त उपचार ठरेल आणि पोलिसांच्या तिजोरीत प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे काही हजारांची भर पडणार आहे. (प्रतिनिधी) प्रमुख कार्यकर्त्यांची धावपळनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी हा विषय उपस्थित केला होता; मात्र वरिष्ठांनी त्याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे यावर काही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता पोलिंग एजंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्याचे अधिकृत पत्र देण्यासाठी आला, की त्याच्याकडे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची विचारणा केली जाणारच आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सध्या धावपळ सुरू आहे.