शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

भातपिक करपले; पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:17 IST

भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते.

पुणे : भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते. मात्र, परतीच्या पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास करपा रोग पडल्याने हिरावून घेतला आहे. शेतच्या शेत या रोगामुळे भुईसपाट झाले आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगांत राहणाºया भातउत्पादक शेतकºयांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अबलंबून असणारी भातशेती केली जाते. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, हवेली व पुरंदर या तालुक्यांत ७२९५३ एवढे एकूण भातक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा ८० टक्के क्षेत्रावर भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. भातशेती हेच या भागातील शेतकºयांच्या उदनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने या भागात राहणाºया हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाते. भातउत्पादनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने जिरायती क्षेत्र असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती काही वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.यावर्षी मात्र पावसाने भाताला चांगली साथ दिली होती. शेतकरी यंदा चांगला उतारा मिळणार, म्हणून खूश होता. मात्र दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. हळव्या जातीच्या भाताचा पावसाने दाणा सडून नुकसान झाले, तर आता भातावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी डोलत असलेली भातशेती अचानक करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी गडबडला आहे.>पिरंगुट : यंदा समाधानकारक पडलेल्या पावसाने मुळशी तालुक्यात भातपिके जोमात आली. परंतु काढणीच्या वेळी पडलेल्या परतीच्या पावसाने कहर केला. त्यातच भातपिकांवर पडलेल्या करपा रोगामुळे शेतकºयांवर तयार झालेले भातपिक हातून जाण्याच्या मार्गावर आहे.मागील आठवड्यात परतीचा पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून आहे तसेच गेले दोन दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यात भातपिकांवरकरप्याची लागण झाल्याने भात कापावे की नको, असा प्रश्न उभा राहिला आहे. हाती आलेले भातपिक गेल्याने शेतकºयांकडून हळहळ व्यक्त होत आहे.अनेक शेतकरी काढणीवाचून चाललेले पीक हॉलर मशिनने काढत आहेत. परंतु त्यासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने तसेच जनावरांना पेंढ्या मिळत नसल्याने काही शेतकरी भात कापून बांधावर अथवा खडकावर उथळ जागी वाळकी घालीत आहे. काही शेतकरी ढगाळ वातावरण जाण्याची वाट पाहत आहेत.आंदगावातील आटाळवाडी येथील अनिल आटाळे, मोहन भुकेले, विक्रम आटाळे, नामदेव आटाळे, बबन आटाळे, सदाशिव आहेर, हरिभाऊ आटाळे, बबन जोगावडे, दत्तात्रय आटाळे, लक्ष्मण शेलार, श्रीपती शेलार, प्रभाकर आटाळे, राजू भिकोले, दत्तात्रय शेडगे, ज्ञानोबा आटाळे यांच्या शेतातील पिकांवर करप्याची लागण झाली असून शेतकºयांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.