शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

भातपिक करपले; पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:17 IST

भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते.

पुणे : भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते. मात्र, परतीच्या पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास करपा रोग पडल्याने हिरावून घेतला आहे. शेतच्या शेत या रोगामुळे भुईसपाट झाले आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगांत राहणाºया भातउत्पादक शेतकºयांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अबलंबून असणारी भातशेती केली जाते. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, हवेली व पुरंदर या तालुक्यांत ७२९५३ एवढे एकूण भातक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा ८० टक्के क्षेत्रावर भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. भातशेती हेच या भागातील शेतकºयांच्या उदनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने या भागात राहणाºया हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाते. भातउत्पादनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने जिरायती क्षेत्र असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती काही वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.यावर्षी मात्र पावसाने भाताला चांगली साथ दिली होती. शेतकरी यंदा चांगला उतारा मिळणार, म्हणून खूश होता. मात्र दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. हळव्या जातीच्या भाताचा पावसाने दाणा सडून नुकसान झाले, तर आता भातावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी डोलत असलेली भातशेती अचानक करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी गडबडला आहे.>पिरंगुट : यंदा समाधानकारक पडलेल्या पावसाने मुळशी तालुक्यात भातपिके जोमात आली. परंतु काढणीच्या वेळी पडलेल्या परतीच्या पावसाने कहर केला. त्यातच भातपिकांवर पडलेल्या करपा रोगामुळे शेतकºयांवर तयार झालेले भातपिक हातून जाण्याच्या मार्गावर आहे.मागील आठवड्यात परतीचा पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून आहे तसेच गेले दोन दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यात भातपिकांवरकरप्याची लागण झाल्याने भात कापावे की नको, असा प्रश्न उभा राहिला आहे. हाती आलेले भातपिक गेल्याने शेतकºयांकडून हळहळ व्यक्त होत आहे.अनेक शेतकरी काढणीवाचून चाललेले पीक हॉलर मशिनने काढत आहेत. परंतु त्यासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने तसेच जनावरांना पेंढ्या मिळत नसल्याने काही शेतकरी भात कापून बांधावर अथवा खडकावर उथळ जागी वाळकी घालीत आहे. काही शेतकरी ढगाळ वातावरण जाण्याची वाट पाहत आहेत.आंदगावातील आटाळवाडी येथील अनिल आटाळे, मोहन भुकेले, विक्रम आटाळे, नामदेव आटाळे, बबन आटाळे, सदाशिव आहेर, हरिभाऊ आटाळे, बबन जोगावडे, दत्तात्रय आटाळे, लक्ष्मण शेलार, श्रीपती शेलार, प्रभाकर आटाळे, राजू भिकोले, दत्तात्रय शेडगे, ज्ञानोबा आटाळे यांच्या शेतातील पिकांवर करप्याची लागण झाली असून शेतकºयांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.