शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चांडोली रुग्णालयाला असुविधांचा वेढा

By admin | Updated: August 19, 2016 05:58 IST

राजगुरुनगरजवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयाला असुविधांचा वेढा पडला असून, इमारतीची दुर्दशा झाली आहे. तर, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरला अवकळा आली

राजगुरुनगर : राजगुरुनगरजवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयाला असुविधांचा वेढा पडला असून, इमारतीची दुर्दशा झाली आहे. तर, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरला अवकळा आली असून, सध्या तेथे कोणीही राहू शकत नाही, अशी अवस्था झाली आहे. चांडोली येथील ग्रामीण तालुक्यातील अनेक गरीब सामान्य रुग्ण उपचारांसाठी येतात. विशेषत:, पश्चिम भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पण, प्रशासनाचे या रुग्णालयाकडे दुर्लक्ष आहे. गेले अनेक दिवस पाण्याची मोटार बंद पडल्याने रुग्णालयाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होते. बऱ्याचदा रुग्णांना वापराचे पाणी स्वत: बाहेर जाऊन आणावे लागते. बाळंतपण करण्यासाठी पाणी नसते एवढी शोकांतिका आहे. पिण्यासाठीचे पाणी त्यांना विकतच घ्यावे लागते. रुग्णालयाचे छत ठिकठिकाणी गळू लागले असून, त्यामुळे येथे वावरताना सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. डोळे तपासणी खोलीमध्ये तर सतत पाणी गळत असल्यामुळे ती खोलीच निकामी झाली आहे. येथील वैद्यकीय अधीक्षकांकडे पंढरपूर रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडे लक्ष देणे मुश्कील झाले आहे. या रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे नियमाप्रमाणे दुपारी एक वाजता बाह्यरुग्ण विभाग बंद होण्याऐवजी चार वाजेपर्यंत चालू राहतो. त्यासाठी या ठिकाणी अधिक लोकांची गरज आहे; पण आरोग्य विभागाचे लक्ष नाही. (वार्ताहर)एका लॅब टेक्निशियनची बदली झाल्यानंतर दुसरा माणूस आला नसल्याने डेंगी, मलेरिया, टायफॉईड, गस्ट्रो, कावीळ इत्यादी रोगांच्या चाचण्या करणे मुश्कील झाले आहे. बऱ्याचदा रुग्णांना त्या बाहेरून आणाव्या लागतात किंवा येथे एचआयव्ही चाचणी करणाऱ्या टेक्निशियनला त्या चाचण्या कराव्या लागतात. येथील पगार करणाऱ्या लेखनिकाची बदली झाली; पण त्याच्या जागेवर दुसरा माणूस न आल्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पगारच अनेक दिवसांपर्यंत होत नाहीत.‘क्वार्टर’ बनले कुत्री-मांजरांचे निवासस्थान डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ‘क्वार्टरना’ तर अक्षरश: अवकळा आली आहे. एकूण १८ क्वार्टर्सपैकी अवघ्या दोन ठिकाणी कर्मचारी कसेबसे राहतात. बाकीच्या क्वार्टर्स कुत्री-मांजरे, उंदीर-घुशींचे निवासस्थान झाल्या आहेत. दरवाजे-खिडक्या तुटल्या आहेत. संडास-बाथरूम निकामी झाले आहेत. लाईटचे वायरिंग बाद झाले आहे. सर्वत्र मण्यार, नाग, घोणस असे विषारी साप निघत असल्यामुळे त्यांमध्ये राहण्याचे लोकांनी सोडून दिले. एक-दोन ठिकाणी लोक जीव मुठीत धरून राहतात. एक डॉक्टर तर चक्क वॉर्डामध्ये खाट टाकून राहतात. क्वार्टर्सच्या चहूबाजूंनी गवत आणि झुडपे माजली आहेत. त्यांचे छत गळत आहे. त्यामुळे बहुसंख्य कर्मचारी राजगुरुनगरमध्ये भाड्याने राहत आहेत. त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.