शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

चांडोली रुग्णालयाला असुविधांचा वेढा

By admin | Updated: August 19, 2016 05:58 IST

राजगुरुनगरजवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयाला असुविधांचा वेढा पडला असून, इमारतीची दुर्दशा झाली आहे. तर, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरला अवकळा आली

राजगुरुनगर : राजगुरुनगरजवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयाला असुविधांचा वेढा पडला असून, इमारतीची दुर्दशा झाली आहे. तर, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरला अवकळा आली असून, सध्या तेथे कोणीही राहू शकत नाही, अशी अवस्था झाली आहे. चांडोली येथील ग्रामीण तालुक्यातील अनेक गरीब सामान्य रुग्ण उपचारांसाठी येतात. विशेषत:, पश्चिम भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पण, प्रशासनाचे या रुग्णालयाकडे दुर्लक्ष आहे. गेले अनेक दिवस पाण्याची मोटार बंद पडल्याने रुग्णालयाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होते. बऱ्याचदा रुग्णांना वापराचे पाणी स्वत: बाहेर जाऊन आणावे लागते. बाळंतपण करण्यासाठी पाणी नसते एवढी शोकांतिका आहे. पिण्यासाठीचे पाणी त्यांना विकतच घ्यावे लागते. रुग्णालयाचे छत ठिकठिकाणी गळू लागले असून, त्यामुळे येथे वावरताना सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. डोळे तपासणी खोलीमध्ये तर सतत पाणी गळत असल्यामुळे ती खोलीच निकामी झाली आहे. येथील वैद्यकीय अधीक्षकांकडे पंढरपूर रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडे लक्ष देणे मुश्कील झाले आहे. या रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे नियमाप्रमाणे दुपारी एक वाजता बाह्यरुग्ण विभाग बंद होण्याऐवजी चार वाजेपर्यंत चालू राहतो. त्यासाठी या ठिकाणी अधिक लोकांची गरज आहे; पण आरोग्य विभागाचे लक्ष नाही. (वार्ताहर)एका लॅब टेक्निशियनची बदली झाल्यानंतर दुसरा माणूस आला नसल्याने डेंगी, मलेरिया, टायफॉईड, गस्ट्रो, कावीळ इत्यादी रोगांच्या चाचण्या करणे मुश्कील झाले आहे. बऱ्याचदा रुग्णांना त्या बाहेरून आणाव्या लागतात किंवा येथे एचआयव्ही चाचणी करणाऱ्या टेक्निशियनला त्या चाचण्या कराव्या लागतात. येथील पगार करणाऱ्या लेखनिकाची बदली झाली; पण त्याच्या जागेवर दुसरा माणूस न आल्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पगारच अनेक दिवसांपर्यंत होत नाहीत.‘क्वार्टर’ बनले कुत्री-मांजरांचे निवासस्थान डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ‘क्वार्टरना’ तर अक्षरश: अवकळा आली आहे. एकूण १८ क्वार्टर्सपैकी अवघ्या दोन ठिकाणी कर्मचारी कसेबसे राहतात. बाकीच्या क्वार्टर्स कुत्री-मांजरे, उंदीर-घुशींचे निवासस्थान झाल्या आहेत. दरवाजे-खिडक्या तुटल्या आहेत. संडास-बाथरूम निकामी झाले आहेत. लाईटचे वायरिंग बाद झाले आहे. सर्वत्र मण्यार, नाग, घोणस असे विषारी साप निघत असल्यामुळे त्यांमध्ये राहण्याचे लोकांनी सोडून दिले. एक-दोन ठिकाणी लोक जीव मुठीत धरून राहतात. एक डॉक्टर तर चक्क वॉर्डामध्ये खाट टाकून राहतात. क्वार्टर्सच्या चहूबाजूंनी गवत आणि झुडपे माजली आहेत. त्यांचे छत गळत आहे. त्यामुळे बहुसंख्य कर्मचारी राजगुरुनगरमध्ये भाड्याने राहत आहेत. त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.