शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

चासकमान प्रकल्प आठमाही होण्याची शक्यता

By admin | Updated: May 6, 2017 00:02 IST

चासकमानच्या पाण्यासाठी मागील महिनाभरात शिरूर तालुक्यात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व राजकीय टोलेबाजीनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : चासकमानच्या पाण्यासाठी मागील महिनाभरात शिरूर तालुक्यात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व राजकीय टोलेबाजीनंतर येथील राजकीय पदाधिकारी व चासकमानचे अधिकारी यांची गुरुवारी बैठक झाली. येत्या काळात बारमाही सुरू असलेला चासकमान प्रकल्प आठमाही होण्याची शक्यता असल्याचे या बैठकीत अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले यांनी या वेळी सांगितले.टेल टू हेड व हेड टू टेल हा वाद बाजूला ठेवून भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, रवींद्र काळे, प्रमोद पऱ्हाड, शिरूरचे सभापती सुभाष उमाप, धर्मराज वाजे, बंटी टोकले, नीलेश जगताप, मोहन टाकळकर, सुक्राज नऱ्हे आदी उपस्थित होते. बैठकीत कपोले यांनी चासकमान प्रकल्पाचे सादरीकरण केले. यात उपलब्ध पाणी, गळती, प्रकल्पांवर अवलंबित पीकपद्धती, पिण्यासाठी व इतर कारणांसाठी वापरायचे पाण्याचे वर्गीकरणही कपोले यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकल्पावर केवळ ३ टक्के ऊसपिकाचे प्रावधान आहे; मात्र प्रत्यक्षात तब्बल ५५ टक्के ऊसलागवड होत असल्याने पाणीवितरणासह ४० टक्के गळतीचाही अतिरिक्त भार याच पाण्यावर येतोय. याशिवाय, याच पाण्यावर येत्या काळात एसईझेड प्रकल्पाचेही पाणी आरक्षण येणे शक्य असल्याने मूळ प्रकल्पात तरतूद असल्याप्रमाणे चासकमानचे आवर्तन आठमाही करण्याचा अहवाल सरकारकडे सादर होत असल्याची माहितीही या वेळी खात्याकडून देण्यात आली. दरम्यान, शिरूर तालुक्यासाठी प्रत्येक चारीसाठी दोन दिवस पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसारच पाणीवितरण २० मेपर्यंत होणार असे कपोले यांनी सांगितले. कोंढापुरी तळ्यातील पाणी पिण्यासाठी कोंढापुरी येथील तळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दोन दिवस पाणी सोडले जात असले, तरी ते शेतीसाठी वापरले जाणार नाही, याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीसह महावितरणकडूनही मदत घेतली जाणार असल्याचे खात्याकडून सांगण्यात आले. एकूण १४४ किलोमीटर कालव्याच्या पाणीवितरणातून साधारण दीड कोटी रुपये पाणीपट्टी खात्याला मिळायला हवी. मात्र, दर वर्षी फक्त २० ते २५ लाख रुपये एवढीच पाणीपट्टी शेतकरी भरत असल्याचे वास्तवही या बैठकीत चर्चिले गेले. कमी पाणीपट्टी म्हणजे अधिकृत पाणी मागणी कमी, असे गृहीत धरून या प्रकल्पातील पाण्याचा अग्रहक्क शेतकरी अशा प्रवृत्तीमुळे गमवातील, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.