शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान प्रकल्प आठमाही होण्याची शक्यता

By admin | Updated: May 6, 2017 00:02 IST

चासकमानच्या पाण्यासाठी मागील महिनाभरात शिरूर तालुक्यात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व राजकीय टोलेबाजीनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : चासकमानच्या पाण्यासाठी मागील महिनाभरात शिरूर तालुक्यात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व राजकीय टोलेबाजीनंतर येथील राजकीय पदाधिकारी व चासकमानचे अधिकारी यांची गुरुवारी बैठक झाली. येत्या काळात बारमाही सुरू असलेला चासकमान प्रकल्प आठमाही होण्याची शक्यता असल्याचे या बैठकीत अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले यांनी या वेळी सांगितले.टेल टू हेड व हेड टू टेल हा वाद बाजूला ठेवून भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, रवींद्र काळे, प्रमोद पऱ्हाड, शिरूरचे सभापती सुभाष उमाप, धर्मराज वाजे, बंटी टोकले, नीलेश जगताप, मोहन टाकळकर, सुक्राज नऱ्हे आदी उपस्थित होते. बैठकीत कपोले यांनी चासकमान प्रकल्पाचे सादरीकरण केले. यात उपलब्ध पाणी, गळती, प्रकल्पांवर अवलंबित पीकपद्धती, पिण्यासाठी व इतर कारणांसाठी वापरायचे पाण्याचे वर्गीकरणही कपोले यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकल्पावर केवळ ३ टक्के ऊसपिकाचे प्रावधान आहे; मात्र प्रत्यक्षात तब्बल ५५ टक्के ऊसलागवड होत असल्याने पाणीवितरणासह ४० टक्के गळतीचाही अतिरिक्त भार याच पाण्यावर येतोय. याशिवाय, याच पाण्यावर येत्या काळात एसईझेड प्रकल्पाचेही पाणी आरक्षण येणे शक्य असल्याने मूळ प्रकल्पात तरतूद असल्याप्रमाणे चासकमानचे आवर्तन आठमाही करण्याचा अहवाल सरकारकडे सादर होत असल्याची माहितीही या वेळी खात्याकडून देण्यात आली. दरम्यान, शिरूर तालुक्यासाठी प्रत्येक चारीसाठी दोन दिवस पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसारच पाणीवितरण २० मेपर्यंत होणार असे कपोले यांनी सांगितले. कोंढापुरी तळ्यातील पाणी पिण्यासाठी कोंढापुरी येथील तळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दोन दिवस पाणी सोडले जात असले, तरी ते शेतीसाठी वापरले जाणार नाही, याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीसह महावितरणकडूनही मदत घेतली जाणार असल्याचे खात्याकडून सांगण्यात आले. एकूण १४४ किलोमीटर कालव्याच्या पाणीवितरणातून साधारण दीड कोटी रुपये पाणीपट्टी खात्याला मिळायला हवी. मात्र, दर वर्षी फक्त २० ते २५ लाख रुपये एवढीच पाणीपट्टी शेतकरी भरत असल्याचे वास्तवही या बैठकीत चर्चिले गेले. कमी पाणीपट्टी म्हणजे अधिकृत पाणी मागणी कमी, असे गृहीत धरून या प्रकल्पातील पाण्याचा अग्रहक्क शेतकरी अशा प्रवृत्तीमुळे गमवातील, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.