शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

चासकमानचे पाणी ‘ताप’तेय!

By admin | Updated: April 10, 2017 02:20 IST

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा

चासकमान : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे चासकमान धरणाच्या पाणीपातळी घटत आहे. धरणामध्ये ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी धरणाअंतर्गतच्या गावांतील नागरिकांनी केली आहे. सध्या डेहेणे, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी गावाअंतर्गत असलेला पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने अंतर्गत गावांना एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. हे आवर्तन सोडल्यामुळे धरणाखालील गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. परंतु धरणाअंतर्गत असलेल्या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)डेहेणे, खरोशी, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, बुरसेवाडी आदी सह गावांच्या जमिनी धरणामध्ये गेल्याने या गावांना पाणीसमस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. गावांतील महिलांना मैलोन्मैल फेब्रुवारी महिन्यापासून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. यावर्षी १८ टक्के जास्तधरणामध्ये सद्या स्थितीत ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला १६.८१ टक्के इतका होता. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी १८ टक्के जादा पाणीसाठा शिल्लक आहे.पाणलोटमध्ये बंधारे बांधाधरणाअंतर्गत गावांमध्ये प्रशासनाने छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अधिक प्रमाणात बांधावे. यामुळे पाणी अधिक प्रमाणात अडून राहून पाणी साठवण क्षमता वाढेल, अशी मागणी नागरिक करत आहे.४00 क्युसेक्सने पाणी पळविले; जातेगावच्या माजी सरपंचावर गुन्हाकेंंदूर : चासकमान कालव्यातून कारेगाव धानोरे शाखा कालव्यास सोडण्यात आलेले पाणी रात्रीच्या सुमारास शासकीय नियम व आदेशाचे उल्लंघन करून ४०० क्युसेक्स पाणी चोरी केल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : चासकमान कालव्यामधून कारेगाव धानोरे या विभागासाठी पाणी सोडण्यात आले आहे. करंदी गावच्या हद्दीमध्ये पाणी सुरू असताना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलूप तोडून स्वत:च्या व सहकाऱ्यांच्या शेताला पाणी मिळावे या उद्देशाने ४०० क्युसेक्स पाणी चोरून नेले. याबाबत शिक्रापूर येथील चासकमान शाखा एकचे अधिकारी शंकर बसप्पा संतीकर यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. माजी सरपंच समाधान डोके व साथीदारांवर कलम ३७९, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश कांबळे करत आहेत. चासकमान धरणातून सोडण्यात येणारे पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपात सोडण्यात येत असल्यामुळे प्रामुख्याने शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. या परिसरात चासकमानच्या धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते; मात्र पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर, या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती सहन करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. (वार्ताहर)चासकमानचे पाणी सोडून सात दिवस झाले; मात्र जातेगाव खुर्दपर्यंत २०० क्युसेक्सनेच पाणी मिळत आहे. ४०० क्युसेक्स पाणीचोरीचा आरोप माझ्यावर व सहकार्यांवर करण्यात आलेला खोटा असून संबंधित अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. - समाधान डोके, माजी सरपंच, जातेगाव खुर्द शासनाच्या निर्णयामुळे मागील वर्षी याच भागातील उसाचे खूप मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते. यंदाही असाच प्रकार पुन्हा होत आहे. जमीन महसूल कायद्यातील कलम ७० /२ नुसार पाणी प्रथम याच भागात देणे अपेक्षित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप येथील शेतकरी आक्रमक झाले असून पाण्यासाठी मोठा लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.