शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानचे पाणी ‘ताप’तेय!

By admin | Updated: April 10, 2017 02:20 IST

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा

चासकमान : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे चासकमान धरणाच्या पाणीपातळी घटत आहे. धरणामध्ये ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी धरणाअंतर्गतच्या गावांतील नागरिकांनी केली आहे. सध्या डेहेणे, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी गावाअंतर्गत असलेला पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने अंतर्गत गावांना एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. हे आवर्तन सोडल्यामुळे धरणाखालील गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. परंतु धरणाअंतर्गत असलेल्या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)डेहेणे, खरोशी, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, बुरसेवाडी आदी सह गावांच्या जमिनी धरणामध्ये गेल्याने या गावांना पाणीसमस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. गावांतील महिलांना मैलोन्मैल फेब्रुवारी महिन्यापासून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. यावर्षी १८ टक्के जास्तधरणामध्ये सद्या स्थितीत ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला १६.८१ टक्के इतका होता. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी १८ टक्के जादा पाणीसाठा शिल्लक आहे.पाणलोटमध्ये बंधारे बांधाधरणाअंतर्गत गावांमध्ये प्रशासनाने छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अधिक प्रमाणात बांधावे. यामुळे पाणी अधिक प्रमाणात अडून राहून पाणी साठवण क्षमता वाढेल, अशी मागणी नागरिक करत आहे.४00 क्युसेक्सने पाणी पळविले; जातेगावच्या माजी सरपंचावर गुन्हाकेंंदूर : चासकमान कालव्यातून कारेगाव धानोरे शाखा कालव्यास सोडण्यात आलेले पाणी रात्रीच्या सुमारास शासकीय नियम व आदेशाचे उल्लंघन करून ४०० क्युसेक्स पाणी चोरी केल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : चासकमान कालव्यामधून कारेगाव धानोरे या विभागासाठी पाणी सोडण्यात आले आहे. करंदी गावच्या हद्दीमध्ये पाणी सुरू असताना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलूप तोडून स्वत:च्या व सहकाऱ्यांच्या शेताला पाणी मिळावे या उद्देशाने ४०० क्युसेक्स पाणी चोरून नेले. याबाबत शिक्रापूर येथील चासकमान शाखा एकचे अधिकारी शंकर बसप्पा संतीकर यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. माजी सरपंच समाधान डोके व साथीदारांवर कलम ३७९, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश कांबळे करत आहेत. चासकमान धरणातून सोडण्यात येणारे पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपात सोडण्यात येत असल्यामुळे प्रामुख्याने शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. या परिसरात चासकमानच्या धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते; मात्र पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर, या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती सहन करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. (वार्ताहर)चासकमानचे पाणी सोडून सात दिवस झाले; मात्र जातेगाव खुर्दपर्यंत २०० क्युसेक्सनेच पाणी मिळत आहे. ४०० क्युसेक्स पाणीचोरीचा आरोप माझ्यावर व सहकार्यांवर करण्यात आलेला खोटा असून संबंधित अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. - समाधान डोके, माजी सरपंच, जातेगाव खुर्द शासनाच्या निर्णयामुळे मागील वर्षी याच भागातील उसाचे खूप मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते. यंदाही असाच प्रकार पुन्हा होत आहे. जमीन महसूल कायद्यातील कलम ७० /२ नुसार पाणी प्रथम याच भागात देणे अपेक्षित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप येथील शेतकरी आक्रमक झाले असून पाण्यासाठी मोठा लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.