शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल समाजाला शिक्षण देण्याचे आव्हान

By admin | Updated: February 9, 2017 02:55 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपला ६८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या या विद्यापीठाने काही वर्षात मोठी कामगिरी केली आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपला ६८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या या विद्यापीठाने काही वर्षात मोठी कामगिरी केली आहे. इतर विद्यापीठांच्या तुलनेत प्रत्येक क्षेत्रात विद्यापीठ नेहमीच आघाडीवर आहे यात कोणतीही शंका नाही. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी विद्यापीठाने निधी उपलब्ध करून दिला. विद्यापीठाने पूर्वीच्याच गोष्टी पुढे घेऊन जाण्याबरोबरच आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षणाच्या ढाच्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.विद्यापीठांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण देणे गरजेचे आहे. पूर्वी सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विनाअनुदानित तत्त्वावरील शैक्षणिक संस्थांना मान्यता देण्यात आली. परिणामी मोठ्या प्रमाणावर शिक्षणसंस्था सुरू झाल्या. मात्र, या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता केवळ बंद खोल्यांमध्ये शिक्षण देऊन चालणार नाही. १९९५ नंतर घडलेल्या इंटरनेटच्या क्रांतीमुळे ज्ञानाचे भांडार खुले झाले. कोट्यवधी नागरिकांच्या हातात मोबाईल आल्याने ज्ञान मिळवणे सोपे झाले. स्मार्टफोनमुळे सर्वच क्षेत्रातील ज्ञान खुले झाले याला युगप्रवर्तन म्हणता येईल. आता तंत्रज्ञानाचे जागतिकीकरण सुरू झाले आहे. त्यातून डिजिटल समाज निर्माण झाला आहे. या समाजाला वर्गात बसून शिक्षकांकडून माहिती नको आहे. परंतु, त्यांना पदवी मिळवण्यासाठी विद्यापीठात किंवा महाविद्यालयात जावेच लागणार आहे. मात्र, ‘मुक्स’च्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने ७००हून अधिक अभ्यासक्रम शिकणे शक्य झाले आहे. जगभरातील साडेतीन कोटी लोक आॅनलाईन अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहे. त्यात भारतातील १० ते १२ टक्के लोकांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यापीठांनी आॅनलाईन शिक्षणाचा विचार केला पाहिजे.गुरुकुल पद्धतीने किंवा वर्गात बसून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची पद्धत बदलावी लागेल. तसेच केवळ डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास सुरुवात करणे अपेक्षित नाही. केवळ बाह्यरूप बदलून उपयोग नाही आंतररूप बदलावे लागेल. ड्रायव्हरलेस कार आणि वर्कलेस कारखाने तयार होत आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे अनेकांचे रोजगार जाणार आहे. परंतु, तांत्रिक बदलामुळेसुद्धा नवीन रोजगार निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना हे रोजगार मिळावेत, यासाठीचे ज्ञान दिले पाहिजे.अनेक विद्यार्थी एकलव्याप्रमाणे शिक्षण घेतील आणि ज्ञान मिळवतील. मात्र, रोजगारासाठी त्यांना पदवी हवी आहे. केवळ यासाठी त्यांना विद्यापीठात यावे लागत आहे.स्वत:चा विकास करण्याबरोबरच समाजाचा विकास करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा आहे. त्यामुळे विद्यापीठांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे. पुणे विद्यापीठानेच नाही तर सर्वच विद्यापीठांनी केवळ अमेरिकेचे विकासाचे मॉडेल स्वीकारू नये. जगभरातील बौद्धिक व्यक्तींचे विचार स्वीकारून शिक्षणाच्या ढाच्यात बदल करण्याचा विचार करावा.पुण्यातील शिक्षणतज्ज्ञांनी जातधर्माच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिले. पुण्याच्या शिक्षणाची केवळ देशातच नाहीतर जगभर चर्चा होते. आता डिजिटल समाजाला गरजेनुसार शिक्षण देऊन युगांतर घडवण्याचे आव्हान सर्व विद्यापीठांसमोर आहे.