शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

ऊसगाळपाचे यंदा आव्हान

By admin | Updated: October 7, 2014 06:12 IST

राज्यातील गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. साधारणत: ८२५ लाख टन उसाचे गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे

सोमेश्वरनगर : राज्यातील गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. साधारणत: ८२५ लाख टन उसाचे गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे. त्यातच साखरेचे उतरलेले दर, ऊसतोडणी, वाहतूकदारांचा संप, शिल्लक साखर, या कारणांमुळे सहकारी साखर कारखानदारी आणखी अडचणीत येणार आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी मंत्री समितीने १५ आॅक्टोबर ही मुदत दिली आहे. यासाठी कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. राज्यातील १०० सहकारी व ६५ खासगी कारखान्यांपैकी सर्वच कारखाने हंगाम सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप मिटेपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटणार नाहीत. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू आहे. त्यामुळे संपावर तोडगा काढण्याचा निर्णय कोणी घ्यायचा, हा प्रश्न पडला आहे. कारखाने लवकर सुरू झाले तरच उसाचे गाळप वेळेत पूर्ण होईल. अन्यथा काही कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण करण्यासाठी जून महिना उजाडेल. चालू वर्षी उसाचे वाढलेले क्षेत्र पाहता इतर जे कारखाने बंद आहेत, त्यांना पॅकेज उपलब्ध करून देऊन ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील २१३ कारखान्यांपैकी अवघे १६५ कारखानेच सुरू होणार आहेत, तर उर्वरित साखर कारखाने बंद अवस्थेतच आहेत. मंत्री समितीने कारखाने चालू करण्यासाठी १५ आॅक्टोबर ही तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील २१३ साखर कारखान्यांपैकी १६५ साखर कारखान्यांनी १ आॅक्टोबरपर्यंत आपले गाळप परवानगीचे अर्ज प्रादेशिक सह संचालकांकडे दाखले केले आहेत. या कारखान्यांना राज्यातील ८२५ लाख टनाचे गाळप करावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात ९० ते ९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. जरी साखर कारखान्यांना, १५ आॅक्टोबर ही तारीख दिली असली, तरीही राज्यातील साखर कारखान्यांना कारखाने सुरू करण्यासाठी १ नोव्हेंबरचीच वाट पाहावी लागणार आहे. (वार्ताहर)