शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

ऊसगाळपाचे यंदा आव्हान

By admin | Updated: October 7, 2014 06:12 IST

राज्यातील गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. साधारणत: ८२५ लाख टन उसाचे गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे

सोमेश्वरनगर : राज्यातील गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. साधारणत: ८२५ लाख टन उसाचे गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे. त्यातच साखरेचे उतरलेले दर, ऊसतोडणी, वाहतूकदारांचा संप, शिल्लक साखर, या कारणांमुळे सहकारी साखर कारखानदारी आणखी अडचणीत येणार आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी मंत्री समितीने १५ आॅक्टोबर ही मुदत दिली आहे. यासाठी कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. राज्यातील १०० सहकारी व ६५ खासगी कारखान्यांपैकी सर्वच कारखाने हंगाम सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप मिटेपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटणार नाहीत. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू आहे. त्यामुळे संपावर तोडगा काढण्याचा निर्णय कोणी घ्यायचा, हा प्रश्न पडला आहे. कारखाने लवकर सुरू झाले तरच उसाचे गाळप वेळेत पूर्ण होईल. अन्यथा काही कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण करण्यासाठी जून महिना उजाडेल. चालू वर्षी उसाचे वाढलेले क्षेत्र पाहता इतर जे कारखाने बंद आहेत, त्यांना पॅकेज उपलब्ध करून देऊन ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील २१३ कारखान्यांपैकी अवघे १६५ कारखानेच सुरू होणार आहेत, तर उर्वरित साखर कारखाने बंद अवस्थेतच आहेत. मंत्री समितीने कारखाने चालू करण्यासाठी १५ आॅक्टोबर ही तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील २१३ साखर कारखान्यांपैकी १६५ साखर कारखान्यांनी १ आॅक्टोबरपर्यंत आपले गाळप परवानगीचे अर्ज प्रादेशिक सह संचालकांकडे दाखले केले आहेत. या कारखान्यांना राज्यातील ८२५ लाख टनाचे गाळप करावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात ९० ते ९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. जरी साखर कारखान्यांना, १५ आॅक्टोबर ही तारीख दिली असली, तरीही राज्यातील साखर कारखान्यांना कारखाने सुरू करण्यासाठी १ नोव्हेंबरचीच वाट पाहावी लागणार आहे. (वार्ताहर)