शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चाळकवाडी टोल तूर्त बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:45 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला, अशी ग्वाही टोल कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी यांच्यासमोर दिली आहे़ मात्र तो लोकप्रतिनिधी कोण? हे सांगण्यास भीतीपोटी असमर्थता व्यक्त केली़ दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये, अशी मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी तूर्त टोलनाका बंद ठेवण्यास अनुकूलता दर्शविली.़ टोलसंदर्भात येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे बैठक होणार आहे, अशी माहिती प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली़टोल बंद आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आयोजिलेल्या बैठकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवानेते अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, ‘विघ्नहर’चे संचालक संतोषनाना खैरे, भीमाजीशेठ गडगे, गुलाब नेहरकर, अनंतराव चौगुले, धनंजय काळे, सूरज वाजगे, टोलनाक्याचे प्रतिनिधी दाऊद खान, बाधित शेतकरी, आळे गावचे प्रतिनिधी, विविध मान्यवर उपस्थित होते़या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भूसंपादनाच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली़ बाधितांना पारदर्र्शक पद्धतीने व जलदगतीने पैसे मिळणे अपेक्षित होते़ शेतकऱ्यांचे पैसे कोर्टात पाठविले ही चूक आहे़ ती दुरुस्त करून शेतकºयांना लवकरात लवकर पैसे अदा करण्यात येतील़ तसेच तालुक्याच्या ठिकाणी विभागीय कार्यालय सुरू करून तेथे बाधित शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील़ ज्यांचे हिअरिंग आहे लवकर घेऊन निर्णय दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली़बायपासचे काम पूर्ण का होत नाही, अशी विचारणा केली असता, तसेच अतुल बेनके यांनी भूसंपादनाचे लेख जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी टोलचालकांकडे काम अपूर्ण का? याबाबत विचारणा केली. कंपनीचे प्रतिनिधी खान म्हणाले, की इन्व्हेस्टमेंट खूपझाली आहे, काम करण्यास पैसे शिल्लक नाहीत़यावर जिल्हाधिकारी यांनी पैशांची जबाबदारी तुमची आहे, काम पूर्ण झालेच पाहिजे, अशी सूचना केली़ सबठेकेदार पळून का गेला? याबाबत खान यांनी वडगाव आनंद येथील बायपासचे काम सुरू करताना स्थानिक लोकप्रतिनिधीने धमकाविल्याने तो ठेकेदार निघून गेला, अशी माहिती दिली़ यावर उपस्थितांनी लोकप्रतिनिधींच्या नावाचा खुलासा करावा, अशी मागणी केली असता, खान यांनी नाव सांगण्यास भाग पाडू नका, अशी विनंती केल्याने जिल्हाधिकारी यांनी आपल्याला एकांतात नाव सांगावे, असे सांगून यावर पडदा पाडला़बायपासचे काम जलदगतीने करावे़ येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे केंद्र सरकारचे प्रतिनिधी, ठेकेदार, कंपनीला फायनान्स पुरविणारे प्रतिनिधी, अतुल बेनके व इतर मान्यवर यांची बैठक घेण्यात येणार आहे़ यावेळी बेनके यांनी काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद करावा, अशी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी टोलनाका तूर्त बंद ठेवण्याचे मान्य केले़ तसेच आळे येथील पिण्याच्या पाण्याची व्यथा समजावून घेऊन ती पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारीयांनी दिले़