शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

चाळकवाडी टोल तूर्त बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:45 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला, अशी ग्वाही टोल कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी यांच्यासमोर दिली आहे़ मात्र तो लोकप्रतिनिधी कोण? हे सांगण्यास भीतीपोटी असमर्थता व्यक्त केली़ दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये, अशी मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी तूर्त टोलनाका बंद ठेवण्यास अनुकूलता दर्शविली.़ टोलसंदर्भात येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे बैठक होणार आहे, अशी माहिती प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली़टोल बंद आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आयोजिलेल्या बैठकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवानेते अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, ‘विघ्नहर’चे संचालक संतोषनाना खैरे, भीमाजीशेठ गडगे, गुलाब नेहरकर, अनंतराव चौगुले, धनंजय काळे, सूरज वाजगे, टोलनाक्याचे प्रतिनिधी दाऊद खान, बाधित शेतकरी, आळे गावचे प्रतिनिधी, विविध मान्यवर उपस्थित होते़या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भूसंपादनाच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली़ बाधितांना पारदर्र्शक पद्धतीने व जलदगतीने पैसे मिळणे अपेक्षित होते़ शेतकऱ्यांचे पैसे कोर्टात पाठविले ही चूक आहे़ ती दुरुस्त करून शेतकºयांना लवकरात लवकर पैसे अदा करण्यात येतील़ तसेच तालुक्याच्या ठिकाणी विभागीय कार्यालय सुरू करून तेथे बाधित शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील़ ज्यांचे हिअरिंग आहे लवकर घेऊन निर्णय दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली़बायपासचे काम पूर्ण का होत नाही, अशी विचारणा केली असता, तसेच अतुल बेनके यांनी भूसंपादनाचे लेख जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी टोलचालकांकडे काम अपूर्ण का? याबाबत विचारणा केली. कंपनीचे प्रतिनिधी खान म्हणाले, की इन्व्हेस्टमेंट खूपझाली आहे, काम करण्यास पैसे शिल्लक नाहीत़यावर जिल्हाधिकारी यांनी पैशांची जबाबदारी तुमची आहे, काम पूर्ण झालेच पाहिजे, अशी सूचना केली़ सबठेकेदार पळून का गेला? याबाबत खान यांनी वडगाव आनंद येथील बायपासचे काम सुरू करताना स्थानिक लोकप्रतिनिधीने धमकाविल्याने तो ठेकेदार निघून गेला, अशी माहिती दिली़ यावर उपस्थितांनी लोकप्रतिनिधींच्या नावाचा खुलासा करावा, अशी मागणी केली असता, खान यांनी नाव सांगण्यास भाग पाडू नका, अशी विनंती केल्याने जिल्हाधिकारी यांनी आपल्याला एकांतात नाव सांगावे, असे सांगून यावर पडदा पाडला़बायपासचे काम जलदगतीने करावे़ येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे केंद्र सरकारचे प्रतिनिधी, ठेकेदार, कंपनीला फायनान्स पुरविणारे प्रतिनिधी, अतुल बेनके व इतर मान्यवर यांची बैठक घेण्यात येणार आहे़ यावेळी बेनके यांनी काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद करावा, अशी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी टोलनाका तूर्त बंद ठेवण्याचे मान्य केले़ तसेच आळे येथील पिण्याच्या पाण्याची व्यथा समजावून घेऊन ती पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारीयांनी दिले़