शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला २२ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 29, 2014 04:54 IST

‘सामुदायिक विवाहसोहळे ही काळाची गरज असून, अशा सोहळ्यांमध्ये सर्वसामान्यांचे विवाह होणे अपेक्षित आहे,

चाकण : ‘सामुदायिक विवाहसोहळे ही काळाची गरज असून, अशा सोहळ्यांमध्ये सर्वसामान्यांचे विवाह होणे अपेक्षित आहे, त्यासाठी गेल्या बावीस वर्षांपासून चाकण येथे सामुदायिक विवाहसोहळा ही चळवळ अखंडपणे राबविणारे या सोहळ्याचे प्रणेते सुरेश गोरे यांचा आदर्श घेण्याची गरज आहे,’ असे मत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगलदास बांदल यांनी येथे व्यक्त केले. मानव विकास कल्याण ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्यातर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान सदस्य सुरेशभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली येथील मार्केटयार्डच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी बांदल बोलत होते. या सोहळ्यात एकूण २२ जोडपी विवाहबद्ध झाली. या प्रसंगी भोसरीचे आमदार विलासराव लांडे, राजगुरुनगर बँकेच्या संचालिका हेमलता टाकळकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, खेड पंचायत समितीच्या सदस्या अ‍ॅड. अमृता गुरव, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पांडुरंग गोरे, चक्रेश्वर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भगवान बिरदवडे, उद्योगपती बाळासाहेब जाधव, चाकण पतसंस्थेचे संचालक सुरेश कांडगे, उपाध्यक्ष प्रकाश भुजबळ, उद्योजक संजय पुरी, अशोक जाधव, धीरज केळकर, नितीन गोरे, दत्तात्रय गोरे, ऋषिकेश शेवकरी, निवृत्ती जाधव, अनिल धाडगे, विकास गोरे, रामदास जाधव आदींसह वºहाडी मंडळी, ग्रामस्थ, संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी साखरपुडा, हळदी समारंभ आटोपल्यानंतर वाद्यवृंदांच्या गजरात नवरदेवांची संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भव्य-दिव्य सजविलेल्या आकर्षक मंडपात या वेळी बावीस जोडपी विवाहबद्ध झाली. अगदी नियोजनबद्धपणे सोहळा पार पडल्याने या सोहळ्याचे प्रणेते सुरेशभाऊ गोरे यांचे या वेळी कौतुक करण्यात आले. आमदार लांडे यांनीही सुरेश गोरे यांचे कौतुक केले. बाळासाहेब गोरे, नितीन गोरे, विकास गोरे, दत्तात्रय गोरे यांनी स्वागत केले. विवाह सोहळ्याचे प्रणेते सुरेश गोरे यांनी प्रास्ताविक, तर सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजीराजे खराबी यांनी आभार मानले. (वार्ताहर)