शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

पुणे-नाशिक महामार्गावर चक्का जाम

By admin | Updated: August 30, 2015 02:59 IST

कुंभमेळा, रक्षाबंधन आणि शनिवार-रविवारची जोडून आलेली सुटी असा तिहेरी ताण वाहतुकीवर आल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आज चक्का जाम झाले. या मार्गावर दिवसभर

राजगुरुनगर : कुंभमेळा, रक्षाबंधन आणि शनिवार-रविवारची जोडून आलेली सुटी असा तिहेरी ताण वाहतुकीवर आल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आज चक्का जाम झाले. या मार्गावर दिवसभर वाहतूककोंडी होती. एक-एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याहून राजगुरुनगरला पोहोचण्यासाठी लोकांना चार तासांचा कालावधी लागत होता. कुंभमेळ्यात आज शाही स्नान असल्यामुळे पुण्याकडून नाशिकला जाणऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. सकाळी ११ वाजल्यापासूनच वाहतूककोंडीला सुरुवात झाली. पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करूनही वाहतूककोंडी होतच होती. मुळातच अरुंद असलेल्या भीमा नदी आणि गावातील ओढा या ठिकाणांच्या दोन पुलांमुळे आणि त्याचवेळी राजगुरुनगरकडे वळणाऱ्या रस्त्यांमुळे वाहतूककोंडी होत होती. टोलनाका ते डाकबंगला हे दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासभर वेळ जात होता. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक अक्षरश: वैतागले होते. एसटी, बस आणि खासगी वाहनाने येणारे लोक राजगुरुनगरकर चांडोलीला उतरून पायी गावात येत होते. चाकणला राजगुरुनगरपेक्षाही गंभीर परिस्थिती असल्याने काल आणि आज पुण्याहून राजगुरुनगरला पोहोचायला लोकांना चार-चार तास लागले. सुदैवाने घाटात काही गंभीर समस्या उद्भवली नसल्याने हळूहळू का होईना वाहतूक सरकत राहिली. अन्यथा सगळा रस्ताच बंद होण्याची वेळ आली असती. रात्री या महामार्गावर अवजड कंटेनर जात असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांना दिवस-रात्र कामावर हजर राहावे लागले. सलग कामामुळे तेही वैतागले होते. खड्ड्यांनी घेतलाएकाचा बळीनाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी एकाचा जीव घेतला आहे. शुक्रवारी रात्री पुणे - नाशिक महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत मोटारसायकल खड्ड्यात आदळून तीन जण रस्त्यावर फेकले गेले. त्यातील प्रशांत लक्ष्मण गाढवे (वय ३७, रा. सावरगाव) यांचा मृत्यू झाला, तर संजय श्रीधर वारुळे, विलास रामचंद्र पवार हे दोघे जखमी झाले आहेत. भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, गोकुळ भालेराव यांनी जखमींना उपचारासाठी हलविले. दरम्यान, महामार्गावरील या खड्ड्याने या तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील हा धोकादायक खड्डा बुजवून टाकला. अपघातातील एक जण हेल्मेटमुळे वाचला. मात्र, हेल्मेटचा चक्काचूर झाला. जयसिंंग रमाजी गाढवे, (रा. सावरगाव, घाडगेवाडी) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मोटारसायकलचालक विलास रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. पी. डमाळे करीत आहेत.