शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

चक्का जाम आंदोलन आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:49 IST

राज्य सरकारने शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य सरकारने शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्यांसाठी येत्या १४ आॅगस्ट रोजी शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्ह्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बारामती, इंदापूरसह शिरुर, चाकण, दौंड आणि जुन्नर परिसरात आंदोलन केले जाणार आहे.राज्य शासनाने शेकतरी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ती फसवी असून शासनाने घातलेल्या अटींमुळे कर्जबाजारी शेतक-यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनीएकत्र येऊन सुकाणू समितीच्या माध्यमातून चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.राज्य सरकारने सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी या फसव्या कर्जमाफीच्या जनजागृतीसाठी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटना सहभागी होणार आहेत.स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे योगेश पांडे म्हणाले, संघटनेच्या वतीने शहरामध्ये आंदोलन केले जाणार नाही. जिल्ह्यात बारामती, शिरुर आणि चाकण येथे आंदोलन केले जाईल. संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी हे खामगाव येथे आंदोलनात सहभागी होतील.शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील म्हणाले, जुन्नर, इंदापूर आणि दौंड येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.