शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चाकण औद्योगिक वसाहत भूसंपादन : वाढीव एफएसआय द्या! ग्रामस्थांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:31 IST

 लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी भूसंपादनाचा दर ठरविण्याची बैठक निष्फळ ठरल्यानंतर या गावातील सरपंच एकत्र आले आहेत. त्यांनी जमिनीच्या बदल्यात १५ टक्के परतावा मिळावा, त्या निवासी भूखंडावर बांधकामासाठी वाढीव एफएसआय मिळावा, त्यात ३३ टक्के बांधकाम व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी, म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होईल, अशा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी भूसंपादनाचा दर ठरविण्याची बैठक निष्फळ ठरल्यानंतर या गावातील सरपंच एकत्र आले आहेत. त्यांनी जमिनीच्या बदल्यात १५ टक्के परतावा मिळावा, त्या निवासी भूखंडावर बांधकामासाठी वाढीव एफएसआय मिळावा, त्यात ३३ टक्के बांधकाम व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी, म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होईल, अशा विविध मागण्या केल्या आहेत.औद्योगिक वसाहतीसाठी] मोठ्या प्रमाणात जमीन संपादन झाले. त्यामुळे हक्काचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कायमचे गेले. उभारलेल्या कारखान्यात नोकºया आणि व्यवसाय मिळत नसल्याची खंतही या वेळी त्यांनी वक्त केली. पुणे जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वासुली (ता. खेड) येथे बैठकीचे आयोजन केले होते. यात १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ठराव करणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोनमध्ये वराळे, भांबोली, सावरदरी, खालुंब्रे, शिंदे व वासुली या गावांमधील जमीन संपादित करण्यात आली. त्यामुळे या गावातील नागरिकांचे हक्काचे उदरनिर्वाहाचे साधन कायमचे गेले. परंतु स्थानिकांना नोकऱ्या, कुठलाही व्यवसाय कारखानदारांनी दिले नाहीत.अनेक कंपन्यांनी त्यांचे जुनेच पुरवठादारांनाच प्राधान्य दिले. म्हणून प्रकल्पबाधित शेतकºयांना उदरनिर्वाहासाठी पुढील सवलती मिळाव्यात असे या बैठकीत ठरविण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, रामदास मेंगळे, इंदुबाई शेळके, बेबीताई बुट्टेपाटील, सुरेश पिंगळे-देशमुख, सागर आंद्रे, गणेश पवार, ग्रामपंचायत सदस्य काळूराम पिंजण, दत्तात्रय टेमगिरे, संजय रौंधळ, मालक पाचपुते, सुरेश बुट्टेपाटील यांच्यासह चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील विविध गावचे आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपसरपंच सुरेश पिंगळे-देशमुख यांनी केले तर आभार रामदास मेंगळे त्यानी मानले.शेतकऱ्यांच्या मागण्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे अनेक भाऊ एकत्र राहात होते, त्यामुळे प्रत्येकास निवासी परतावा मिळावा.निवासी भूखंडावर एक एफएसआयचे बांधकाम करता येते. त्यात वाढ करून दोन एफएसआय करावा व त्यातील ३३ टक्के बांधकाम व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी.ज्या शेतकºयांना १५ टक्के परतावा मिळणे बाकी आहे त्यांना तो मिळावा आणि त्यात ५० टक्के व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी.निवासी भूखंडाला असणारी नऊ मीटर उंचीची अट रद्द करावी.