शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

ऊस ऊत्पादकांसाठी केंद्राचे साडेतीन हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. निर्यातीमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. निर्यातीमधील तफावत भरुन काढण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे. मात्र ही मदत गेल्यार्षीपेक्षा कमी असल्याचे सांगत साखर संघाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, साखरेच्या दरात केंद्राकडून वाढ होत नाही तोवर साखर कारखान्यांचे अर्थकारण सुधारणार नाही. गेल्यावर्षी केंद्राच्या या मदतीमधून शेतकऱ्यांना १० हजार रूपयांची मदत करता आली. यंदा फक्त ६ हजार रूपये देता येतील. साखरेचा दर ३१०० रूपये क्विंटल आहे. परदेशात तो आणखी कमी असतो. तोटा सहन करून साखर विकावी लागते. त्यातील तफावत केंद्राच्या अनुदानातून भरून काढली जाते.

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, साखर आताच देशातच अतिरिक्त आहे. परदेशात ती पाठवायची तर तेथील दराशी स्पर्धा करावी लागेल. त्यामुळे प्रसंगी तोटा सहन करून साखर निर्यात करावी लागते. तोटा झाला की त्याचा परिणाम शेतकऱ्यांना द्यायच्या रकमेवर होतो. कारखान्यांना शेतकऱ्याची एफआरपी देता यावी यासाठीच या निधीचा उपयोग केला जातो. त्यामुळे कारखान्यांच्या तोट्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे केंद्राची ही मदत शेतकऱ्यांसाठी उपयोगाची आहे.