शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

ऊस ऊत्पादकांसाठी केंद्राचे साडेतीन हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. निर्यातीमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. निर्यातीमधील तफावत भरुन काढण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे. मात्र ही मदत गेल्यार्षीपेक्षा कमी असल्याचे सांगत साखर संघाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, साखरेच्या दरात केंद्राकडून वाढ होत नाही तोवर साखर कारखान्यांचे अर्थकारण सुधारणार नाही. गेल्यावर्षी केंद्राच्या या मदतीमधून शेतकऱ्यांना १० हजार रूपयांची मदत करता आली. यंदा फक्त ६ हजार रूपये देता येतील. साखरेचा दर ३१०० रूपये क्विंटल आहे. परदेशात तो आणखी कमी असतो. तोटा सहन करून साखर विकावी लागते. त्यातील तफावत केंद्राच्या अनुदानातून भरून काढली जाते.

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, साखर आताच देशातच अतिरिक्त आहे. परदेशात ती पाठवायची तर तेथील दराशी स्पर्धा करावी लागेल. त्यामुळे प्रसंगी तोटा सहन करून साखर निर्यात करावी लागते. तोटा झाला की त्याचा परिणाम शेतकऱ्यांना द्यायच्या रकमेवर होतो. कारखान्यांना शेतकऱ्याची एफआरपी देता यावी यासाठीच या निधीचा उपयोग केला जातो. त्यामुळे कारखान्यांच्या तोट्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे केंद्राची ही मदत शेतकऱ्यांसाठी उपयोगाची आहे.