शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

पीकविम्यात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीकविम्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्राने ‘बीड पॅॅटर्न’ विकसित केला. केंद्र सरकारने त्याची परवानगी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीकविम्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्राने ‘बीड पॅॅटर्न’ विकसित केला. केंद्र सरकारने त्याची परवानगी मध्य प्रदेशला दिली आणि महाराष्ट्राला नाकारली, असा आरोप राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला.

रब्बी हंगामाच्या राज्य नियोजनासाठी भुसे मंगळवारी (दि. ७) पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री भुसे म्हणाले की, मागील वर्षी केंद्र राज्य व शेतकरी यांच्याकडून पीक विम्यापोटी ५ हजार ८०० कोटी जमा झाले. त्यातील फक्त १ हजार कोटी वाटप झाले, म्हणजे ४ हजार कोटींचा नफा झाला. यावर उपाय म्हणून आम्ही ‘बीड पॅॅटर्न’ काढला. यात कंपन्यांनी १० टक्के प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा इतकीच रक्कम जमा पीक विम्यातून घ्यायची. उर्वरित रक्कम सरकार जमा होईल. त्याचे वाटप राज्य सरकार शेतकऱ्यांना करेल. त्यापेक्षा जास्त नुकसान असेल तर ती रक्कम सरकार देईल असे ठरले.

बीड जिल्ह्यात यशस्वीपणे हा पॅॅटर्न राबवला असा दावा करून भुसे म्हणाले, “आम्ही केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्याकडे संपूर्ण राज्यात हाच पॅॅटर्न राबवण्याची परवानगी मागितली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, त्यात हा विषय होता. महाराष्ट्राला परवानगी नाकारण्यात आली. पण केंद्र सरकारने मध्य प्रदेश सरकारला मात्र २ ऑगस्टला परवानगी दिली.”

विमा कंपन्यांना इतका नफा मिळतो तो कशासाठी? असा प्रश्न भुसे यांनी केला. फायदा शेतकऱ्यांचा व्हायला हवा. त्यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांसाठी तरी या ‘बीड पॅॅटर्न’ला केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी नव्याने करत असल्याचे भुसे म्हणाले. तोपर्यंत कंपन्यांनी टाकलेल्या सर्व नियम-अटींचे काटेकोर पालन करण्यासंबधी शेतकरी, कृषी अधिकाऱ्यांना कळवले आहे असे ते म्हणाले. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी आयुक्त धीरजकुमार आदी यावेळी उपस्थित होते.