शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

पीकविम्यात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीकविम्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्राने ‘बीड पॅॅटर्न’ विकसित केला. केंद्र सरकारने त्याची परवानगी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीकविम्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्राने ‘बीड पॅॅटर्न’ विकसित केला. केंद्र सरकारने त्याची परवानगी मध्य प्रदेशला दिली आणि महाराष्ट्राला नाकारली, असा आरोप राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला.

रब्बी हंगामाच्या राज्य नियोजनासाठी भुसे मंगळवारी (दि. ७) पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री भुसे म्हणाले की, मागील वर्षी केंद्र राज्य व शेतकरी यांच्याकडून पीक विम्यापोटी ५ हजार ८०० कोटी जमा झाले. त्यातील फक्त १ हजार कोटी वाटप झाले, म्हणजे ४ हजार कोटींचा नफा झाला. यावर उपाय म्हणून आम्ही ‘बीड पॅॅटर्न’ काढला. यात कंपन्यांनी १० टक्के प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा इतकीच रक्कम जमा पीक विम्यातून घ्यायची. उर्वरित रक्कम सरकार जमा होईल. त्याचे वाटप राज्य सरकार शेतकऱ्यांना करेल. त्यापेक्षा जास्त नुकसान असेल तर ती रक्कम सरकार देईल असे ठरले.

बीड जिल्ह्यात यशस्वीपणे हा पॅॅटर्न राबवला असा दावा करून भुसे म्हणाले, “आम्ही केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्याकडे संपूर्ण राज्यात हाच पॅॅटर्न राबवण्याची परवानगी मागितली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, त्यात हा विषय होता. महाराष्ट्राला परवानगी नाकारण्यात आली. पण केंद्र सरकारने मध्य प्रदेश सरकारला मात्र २ ऑगस्टला परवानगी दिली.”

विमा कंपन्यांना इतका नफा मिळतो तो कशासाठी? असा प्रश्न भुसे यांनी केला. फायदा शेतकऱ्यांचा व्हायला हवा. त्यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांसाठी तरी या ‘बीड पॅॅटर्न’ला केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी नव्याने करत असल्याचे भुसे म्हणाले. तोपर्यंत कंपन्यांनी टाकलेल्या सर्व नियम-अटींचे काटेकोर पालन करण्यासंबधी शेतकरी, कृषी अधिकाऱ्यांना कळवले आहे असे ते म्हणाले. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी आयुक्त धीरजकुमार आदी यावेळी उपस्थित होते.