शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारचे प्राधान्य

By admin | Updated: October 28, 2015 01:34 IST

विद्यमान केंद्र सरकार व जम्मू काश्मीरमधील सरकारने हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले असल्याची माहिती जम्मू काश्मीर विधानसभेचे आमदार सुरिंदर अंबरदार

पुणे : विद्यमान केंद्र सरकार व जम्मू काश्मीरमधील सरकारने हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले असल्याची माहिती जम्मू काश्मीर विधानसभेचे आमदार सुरिंदर अंबरदार यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या निर्वासित हिंदू पंडितांकडे वेळोवेळी सरकारचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, आता ही स्थिती बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मीर हिंदू सभेचे अध्यक्ष रमेश शिवपुरी, मंदार घाटे, विकास ननावरे या वेळी उपस्थित होते. अंबरदार म्हणाले, की भाजप आणि पीडीपी या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. परंतु, काही समान मुद्द्यांवर एकत्र येत विशिष्ट अजेंडा ठरविला आहे. त्यात काश्मीरमधून निघून गेलेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आला आहे. पंडितांच्या पुनर्वसनासाठी २००८ मध्ये केंद्र सरकारने योजना सुरू केली; पण त्यामध्ये गेल्या ७ वर्षांत केवळ १९०० तरुण-तरुणींना रोजगार मिळाले आहेत. पुढील एका वर्षात ४ हजार जणांना रोजगार व सुविधा देण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगत काँग्रेस सरकारकडून जाणूनबुजून हे पुनर्वसन रखडविल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तर, पाकिस्तानी खेळाडू व कलाकार यांच्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबत शिवसेना व केंद्र सरकार दोघांचीही भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)