शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारचे प्राधान्य

By admin | Updated: October 28, 2015 01:34 IST

विद्यमान केंद्र सरकार व जम्मू काश्मीरमधील सरकारने हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले असल्याची माहिती जम्मू काश्मीर विधानसभेचे आमदार सुरिंदर अंबरदार

पुणे : विद्यमान केंद्र सरकार व जम्मू काश्मीरमधील सरकारने हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले असल्याची माहिती जम्मू काश्मीर विधानसभेचे आमदार सुरिंदर अंबरदार यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या निर्वासित हिंदू पंडितांकडे वेळोवेळी सरकारचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, आता ही स्थिती बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मीर हिंदू सभेचे अध्यक्ष रमेश शिवपुरी, मंदार घाटे, विकास ननावरे या वेळी उपस्थित होते. अंबरदार म्हणाले, की भाजप आणि पीडीपी या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. परंतु, काही समान मुद्द्यांवर एकत्र येत विशिष्ट अजेंडा ठरविला आहे. त्यात काश्मीरमधून निघून गेलेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आला आहे. पंडितांच्या पुनर्वसनासाठी २००८ मध्ये केंद्र सरकारने योजना सुरू केली; पण त्यामध्ये गेल्या ७ वर्षांत केवळ १९०० तरुण-तरुणींना रोजगार मिळाले आहेत. पुढील एका वर्षात ४ हजार जणांना रोजगार व सुविधा देण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगत काँग्रेस सरकारकडून जाणूनबुजून हे पुनर्वसन रखडविल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तर, पाकिस्तानी खेळाडू व कलाकार यांच्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबत शिवसेना व केंद्र सरकार दोघांचीही भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)