शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

नफेखोर विमा कंपन्यांना केंद्र सरकारची फूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळणाऱ्या कंपन्या बदलाव्यात या राज्य सरकारच्या मागणीला केंद्र सरकारने नकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळणाऱ्या कंपन्या बदलाव्यात या राज्य सरकारच्या मागणीला केंद्र सरकारने नकार दिला आहे. त्यातूनच या कंपन्यांना केंद्र सरकारची फूस असल्याचे दिसत असल्याची टीका भारतीय किसान काँग्रेसने केली.

एकट्या महाराष्ट्रातून या कंपन्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतून ८ हजार कोटी रुपयांचा फायदा कमवला आहे व त्याचवेळी राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळून लावले आहेत, अशी टीका किसान काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी केली.

राज्य सरकारने त्यामुळेच या कंपन्या बदलाव्यात, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र दिले. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. केंद्र सरकार या कंपन्यांना घाबरते आहे का, असा प्रश्न पवार यांनी केला.

राज्यातील सरकारवर सदा तोंडसुख घेणाऱ्या भाजप नेत्यांनी यावर तोंड उघडावे, असा सल्लाही पवार यांंनी दिला. नफेखोर कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्र सरकारचा महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले.