शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार आरक्षण संपवू पाहतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

केंद्र सरकारला कोणत्याही समाजाचे घेणे देणे नाही. ओबीसी समाजाची जर लोकसंख्या समोर आली तर राजकीय गणिते पुन्हा नव्याने मांडावी ...

केंद्र सरकारला कोणत्याही समाजाचे घेणे देणे नाही. ओबीसी समाजाची जर लोकसंख्या समोर आली तर राजकीय गणिते पुन्हा नव्याने मांडावी लागतील. तसेच काही प्रस्थापितांचा सत्तेतील वाटा कमी होण्याची भीती या सरकारला वाटत आहे. यामुळे सरकार जातीनिहाय जनगणनेमध्ये इतर जातींचा समावेश करायला घाबरत आहे. राज्यात ५१ टकके ओबीसी समाज असून या मध्ये सुमारे ३५२ जातींचा समावेश आहे. मात्र या जातींपैकी केवळ वंजारी, धनगर, माळी या जाती सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. इतर जातींना देखील लाभ मिळायला हवा. तसेच इतर जातींच्या कल्याणासाठी केंद्राने आणि राज्याने निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. ओबीसी मधील काही जाती अजूनही मुख्यप्रहवाच्या जवळपास नाहीत. अद्याप पर्यंत आरक्षणाचा फायदा देखील मिळाला नसल्याची उदाहरणे समाजात आहेत. अनेकवेळा आंदोलन करूनही या समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच विशिष्ट नेत्यांना राजकारणातून बेदखल करण्याचा प्रकार सूरू आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती जाणीवपूर्वक कपात केली जात असून शैक्षणिक नुकसान केले जात आहे. असा आरोप ओबीसी फाऊडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्वाती मोराळे यांनी सांगितले.

कोट

देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजातील आहेत. याचा त्यांना विसर पडला असावा. या समाजाबद्दल अस्था राहिली नसून तो कसा दुबळा होइल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. लोकशाही देशात सर्वच समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द होण्यास केवळ केंद्र सरकार जबाबदार आहे.

बाळासाहेब सानप, अध्यक्ष, ओबीसी, व्ही जे एन टी जन मोर्चा.

.....

जातिनिहाय जगणना झाली तरी , देशातील आणि राज्यातील सर्वच जातींची लोकसंख्या समोर येईल. जर संख्या समोर आली तर अनेक बदल करावे लागतील. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसणार आहे. ओबीसी समाज लोकसंख्येने मोठा आहे. हा समाज जर एकत्र आला तर राजकीय सत्तेची गणिते बदलू शकतो. ओबीसी समाजावर अन्याय केला जात आहे. या समाजातील प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे.

- फुलचंद कराड, भगवान सेना.