शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

लशींच्या कमतरतेला केंद्र सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना लस इथे देशात तयार झाली, मग सर्व देशवासियांना ती दिल्यानंतरच परदेशात पुरवठा करायचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना लस इथे देशात तयार झाली, मग सर्व देशवासियांना ती दिल्यानंतरच परदेशात पुरवठा करायचा होता. ही साधी गोष्टही केंद्र सरकारने लक्षात घेतली नाही व त्यातून लशी कमी पडल्या, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आता निदान राज्यांंना परदेशातून लशी आयात करायला केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कौन्सिल हॉलमध्ये शुक्रवारी घेतलेल्या जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. रशियाने आधी त्यांच्या देशातील सर्वांना लस दिली व त्यानंतरच आपल्याकडे पाठवली. जगातील ज्या देशांनी आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले त्यांचा कोरोना कमी होऊन नागरी जीवन पूर्ववत झाले. भारतात लस तयार होऊनही इथे न देता परदेशांमध्ये पाठविली गेली. आता निदान सिरम आणि भारत बायोटेक व लसनिर्मितीची नव्यानेच परवानगी मिळालेल्या कंपन्यांनी आपले उत्पादन भारतीय लोकसंख्येचा विचार करून वाढवायला हवे. याबाबत अदर पुनावाला यांना फोन केला, ते परदेशात आहेत, आठ-दहा दिवसात येतील, पण तिथूनही ते व्यवस्था करू शकतात असे पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकारनेच आधी ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना लस द्यायचा निर्णय घेतला. आता त्या गटाला लस कमी पडत आहेत. तोच १८ ते ४५ पर्यंत देण्याचा निर्णय घेतला. आता ४५ च्या पुढच्या लोकांना लशीचा दुसरा डोस द्यायची वेळ आली. पण लसच नाही. ती मुदत संपण्याच्या आत लस मिळाव्यात असा आमचा प्रयत्न आहे, असे पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती, केंद्र सरकार निणर्य घेऊ शकतात

मराठा आरक्षणावर पवार म्हणाले, निकाल विरोधात गेला, पण त्या निकालातच भारत सरकार व राष्ट्रपती हा निर्णय घेऊ शकतात असे म्हटले आहे. आम्ही सरकारचे शिष्टमंडळ तयार करून पंतप्रधान राष्ट्रपती यांना तशी विनंती करू. फडणवीस सरकारने दिले तेच वकिल आम्ही दिले. त्यात भर घातली. निर्णय इथे एकमतानेच घेतला होता, तो टिकला नाही. सरकारवर याबाबत होणाऱ्या टिकेत काहीच तथ्य नाही. आता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ शकते.