शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्राने त्वरित काढावा तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेल्या तीन विधेयकांमुळे अनेक देशी-विदेशी महाकाय कंपन्या कृषी क्षेत्रात उतरतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेल्या तीन विधेयकांमुळे अनेक देशी-विदेशी महाकाय कंपन्या कृषी क्षेत्रात उतरतील ज्यामुळे शेती, शेतकरी आणि सामान्य जनतेवर विपरीत परिणाम होतील, असे सांगत या विधेयकांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. १) मोर्चा काढला.

यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा दिला. ‘स्वाभिमानी’चे प्रकाश बालवडकर, बापूसाहेब कारंडे, ईश्वर गायकवाड, हनुमंत बालवडकर, उमेश सत्रे तसेच स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख अमोल हिप्परगे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. “दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात संघटना राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने काढलेल्या शेतकरीविरोधी तीन अध्यादेशांवर संपूर्ण देशभरात पडसाद उमटत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा,” या मागणीचे निवेदन ‘स्वाभिमानी’तर्फे प्रशासनाला देण्यात आले.