शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्राने त्वरित काढावा तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेल्या तीन विधेयकांमुळे अनेक देशी-विदेशी महाकाय कंपन्या कृषी क्षेत्रात उतरतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेल्या तीन विधेयकांमुळे अनेक देशी-विदेशी महाकाय कंपन्या कृषी क्षेत्रात उतरतील ज्यामुळे शेती, शेतकरी आणि सामान्य जनतेवर विपरीत परिणाम होतील, असे सांगत या विधेयकांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. १) मोर्चा काढला.

यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा दिला. ‘स्वाभिमानी’चे प्रकाश बालवडकर, बापूसाहेब कारंडे, ईश्वर गायकवाड, हनुमंत बालवडकर, उमेश सत्रे तसेच स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख अमोल हिप्परगे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. “दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात संघटना राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने काढलेल्या शेतकरीविरोधी तीन अध्यादेशांवर संपूर्ण देशभरात पडसाद उमटत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा,” या मागणीचे निवेदन ‘स्वाभिमानी’तर्फे प्रशासनाला देण्यात आले.