शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नारायणगावचे केंद्र हे सर्वोत्तम केव्हीके

By admin | Updated: July 6, 2017 02:40 IST

शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा अथांग सागर, गरजेनुरूप राबवत असलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प, शेतकरी, तरुण आणि कृषी

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा अथांग सागर, गरजेनुरूप राबवत असलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प, शेतकरी, तरुण आणि कृषी पदवीधरांना कृषी उद्योजकतेकडे घेऊन जाण्याकरिता राबवत असलेले स्तुत्य उपक्रम हे केव्हीकेच्या (कृषी विज्ञान केंद्र) कामकाजाची पोच देऊन जाते, असे मत  भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक (कृषी विस्तार) डॉ. वेदप्रकाश चहल यांनी येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान व्यक्त केले.या वेळी पुणे येथील अटारी झोन-८ चे संचालक डॉ. लाखनसिंग, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. एस. राजपूत, अटारी झोन-८ पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. कोळेकर उपस्थित होते.डॉ. वेदप्रकाश चहल हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे सहायक महासंचालक या पदावर कार्यरत आहेत. भारतातील ६६५ केव्हीकेचा ते कार्यभार संभाळतात. केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली.डॉ. वेदप्रकाश चहल यांनी केंद्राच्या कार्याची माहिती  घेतली. अनिलतात्या मेहेर यांनी स्वागत केले.  राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. एस. राजपूत यांनी आभार मानले.विविध प्रकल्पांची पाहणी; वृक्षारोपण केलेडॉ. वेदप्रकाश चहल आणि डॉ. लाखनसिंग यांनी केव्हीकेच्या वसुंधरा फार्म येथे भेट दिली. या वेळी त्यांनी डाळिंब, सीताफळ, पेरू, आंबा या बागांना भेट दिली. तसेच १.५ कोटी लिटरचे शेततळे, समतल चर करून लागवड केलेली आंब्याची बाग, पाणी आणि खत व्यवस्थापन याकरिता केलेली स्वयंचलित सिंचनप्रणाली, पीक प्रात्यक्षिके पाहून ते प्रभावित झाले.  याचबरोबर शेळीपालन, मुक्त गोठा, युरिया ब्रिकेट्स उत्पादन प्रकल्प, डाळ मिल, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प, गांडूळ खत यासारख्या प्रकल्पांना भेट देऊन प्रशंसादेखील केली. डॉ. व्ही. पी. चहल आणि डॉ. लाखनसिंग यांच्या हस्ते वसुंधरा फार्म येथे नारळाचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.