शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

नाटकाच्या प्रयोगावर सेन्सॉरशिप ठरावी

By admin | Updated: February 13, 2017 01:12 IST

नाटक, चित्रपट हे अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम आहे. या माध्यमांतून निखळ करमणूक अनुभवायला मिळते. नाटक, चित्रपट विचारप्रवर्तक असू शकतात.

नाटक, चित्रपट हे अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम आहे. या माध्यमांतून निखळ करमणूक अनुभवायला मिळते. नाटक, चित्रपट विचारप्रवर्तक असू शकतात. मात्र, त्यातून मोठे सामाजिक बदल किंवा क्रांती घडत नाही.मुंबई ही नाट्यव्यवसायाची बाजारपेठ असेल, तर पुणे ही प्रयोगशाळा आहे, असे मला वाटते. नवोदित कलाकार येथे जीव ओतून काम करतात, व्यासपीठाचा उत्तम उपयोग करून घेतात, घडतात आणि संपूर्ण तयारीनिशी रंगभूमीवर उतरतात. गेल्या काही वर्षांत रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. तरुणांचा मालिका, चित्रपटांकडील ओघ वाढला आहे. कारण, हजारो तरुणांना सामावून घेण्याएवढा नाट्यव्यवसाय मोठा आणि व्यापक नाही. तसेच, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करूनही नाटक हा पाया असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.‘हे राम नथुराम’ या नाटकाचे १००० हून अधिक प्रयोग यशस्वी झाले आहेत. या नाटकाविरोधात अचानक आंदोलने सुरू झाली आहेत. पुण्यात आंदोलने करून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला, तर नागपूरमध्ये प्रेक्षकांनी तिकिटेच न काढून प्रयोग रद्द करण्यास भाग पाडले. एखाद्या बाबीचा निषेध आपण कशा प्रकारे नोंदवतो, हे महत्त्वाचे आहे. कलावंतांनी नाटके लोकशाही पद्धतीने, मनापासून करत राहायला हवीत. नाटक यशस्वी होणार की अपयशी, हे प्रेक्षकांना ठरवू द्यायला हवे.नाटकांच्या निर्मितीची संख्या वाढली असली तरी मोजकीच नाटके का चालतात, याचा सखोल विचार करायला हवा. नाटकांमधून नेमके चांगले काय देता येईल, याचा सखोल अभ्यास केल्यास यशस्वी नाटकांची संख्या नक्कीच वाढू शकते. मी बऱ्याच नाट्यस्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. या स्पर्धांमध्ये सादर होणारी नाटके, हाताळले जाणारे विषय, तरुण कलाकारांकडून नाटकासाठी घेतली जाणारी मेहनत हे चित्र खूप आशादायी आहे. पुणे, मुंबई वगळता, महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक तरुण विविध विषय घेऊन समोर येत आहेत ही जमेची बाजू आहे. अनेक कलाकारांसाठी नाटकांमधून मालिका, चित्रपटांचे प्रवेशद्वार खुले होते. परंतु, नाटकातील जिवंतपणा इतर कोणत्याही माध्यमात अनुभवायला मिळत नाही. चित्रपटांतही आशयघन विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे समांतर चित्रपट ही संकल्पना आता अस्तित्वात राहिलेली नाही. चांगले विषय हाताळताना निर्माते, दिग्दर्शकांना व्यावसायिक गणितेही सांभाळावी लागतात. केवळ प्रमोशन आणि गाण्यांचा भडिमार केला, तरच चित्रपट हिट होतो, हा फॉर्म्युला मागे पडला आहे. तरुण प्रेक्षकांना भावणारा, त्यांचे भावविश्व उलगडणारा सिनेमा असेल तर तोही चांगला व्यवसाय करतो.सोशल मीडियाचे दालन आज सर्वांसमोर खुले आहे. या माध्यमातून आपण एकाच वेळी अनेकांशी संपर्कात राहू शकतो. मात्र, सोशल मीडियावर आपण कशा प्रकारे व्यक्त होतो, यावर सर्व गणित अवलंबून असते. सोशल मीडियाचा वापर करताना आपण कशा प्रकारे व्यक्त व्हावे, याची मर्यादा घालून यायला हवी. डेली सोपमुळे कथानकाची किंमत कमी होते, त्याचप्रमाणे, खासगी बाबी या व्यासपीठावर शेअर केल्या जात असल्याने त्याची किंमत कमी झाली आहे. विचार मांडण्याचे हे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे नाटक, चित्रपटांसाठीही सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा.