शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

उत्सव हे ऐक्याचे बोधक

By admin | Updated: March 22, 2015 00:54 IST

प्रत्येक सणामागे रुपक दडलेले असते. गुढीपाडव्यासोबतच वसंत ॠतूचे आगमन होत असते.

पुणे : प्रत्येक सणामागे रुपक दडलेले असते. गुढीपाडव्यासोबतच वसंत ॠतूचे आगमन होत असते. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा वसंत आणि उत्सवातून पुस्तकरुपी शब्दांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा वसंत बहरायला हवा. यातूनच विचारांची देवाण-घेवाण आणि संस्कृती टिकू शकेल, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. मैत्र-युवा फाउंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखिका वीणा देव, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस, ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी, नीलिमा गुंडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलम जाधव, स्मिता जाधव, स्काऊट-गाईड संस्थेचे जिल्हा मुख्य आयुक्त सुधाकर तांबे, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांमधील वंचित मुलांनी दिंडीत सहभाग घेतला. ‘गुढी साहित्याची, गुढी मांगल्याची, गुढी संस्काराची’ असे म्हणत तरुणाईने पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश दिला. बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहापासून दिंडीला सुरुवात झाली; तर दिंडीचा समारोप महाराणा प्रताप उद्यानाजवळ झाला. नीलेश पाठक, ममता जोशी, अवंती कुलकर्णी, रोशनी यादव, निधी मोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. (प्रतिनिधी)समाजापासून दुरावलेल्या चिमुकल्यांसाठी अशा प्रकारचे सण साजरे करुन त्यांना आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असतो. पाडव्यानिमित्त दागिन्यांची विक्री करुन त्यातून आलेल्या पैशांचा उपयोग वंचित मुलींच्या शिक्षणासाठी करण्याचा संस्थेचा मानस आहे.- संकेत देशपांडे (अध्यक्ष, मैत्र-युवा फाऊंडेशन)