शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महाश्रमदानानं साजरा करा महाराष्ट्र दिन: आमीर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 12:18 IST

भविष्यात पानी फाऊंडेशन शहरातील पाणी प्रश्नावर काम करणार

पुणे : आगामी महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी शहरवासीयांनी मोठ्या संख्येनं जवळच्या खेड्यात जाऊन श्रमदान करावं असं आवाहन अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी पुण्यात बोलताना केलं. यासाठी jal mitra.paanifoundation.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी असंही त्यांनी सांगितलं.पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, यासाठीच्या पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आलं. 'महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एवढी ताकद आहे की, लोक स्वतःहून पाण्याची अडचण सोडवतील. याबद्दल मला विश्वास वाटतो. पुढील पाच वर्षात पानी फाऊंडेशनची गरज वाटू नये,' असं मत आमीरनं व्यक्त केलं. केवळ ग्रामीण भागातील पाणलोट क्षेत्रातील कामावर थांबणार नसून भविष्यात शहरातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही आमीरनं सांगितलं. स्वदेस चित्रपटातून या कामासाठी प्रेरणा मिळाली का, असं विचारले असता, अद्याप स्वदेस पाहिला नसल्याचं उत्तर आमीरनं दिलं. पानी फाऊंडेशनची संकल्पना सत्यमेव जयते या कार्यक्रमातून आली. या कार्यक्रमाचं तिसरं पर्व झाल्यानंतर एका विषयावर सखोल काम करण्याचा विचार होता आणि आम्ही पाणी व महाराष्ट्र या विषयावर संशोधन करून अडचणी समजून कामाला सुरुवात केली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सिम्बॉयसिसचे डॉ. शं. ब. मुजुमदार, विद्या येरवडेकर, संजीवनी मुजुमदार उपस्थित होते.महाराष्ट्रातल्या 1 कोटी 10 लाख लोकांनी 1 मे रोजी आयोजित केलेल्या महाश्रमदानात सहभागी व्हावं, असा आमचा संकल्प असल्याचं सत्यजित भटकळ यांनी सांगितलं. शहरी आणि ग्रामीण लोकांचं भावनिक नातं निर्माण व्हावं, असाही यामागचा उद्देश असल्याचं भटकळ म्हणाले. महाश्रमदानासाठी किती पैसा खर्च झाला, हा मुद्दा नसून त्यात किती लोक सहभागी झाले, हे महत्त्वाचं असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं.   

टॅग्स :Aamir Khanआमिर खान