शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

महाश्रमदानानं साजरा करा महाराष्ट्र दिन: आमीर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 12:18 IST

भविष्यात पानी फाऊंडेशन शहरातील पाणी प्रश्नावर काम करणार

पुणे : आगामी महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी शहरवासीयांनी मोठ्या संख्येनं जवळच्या खेड्यात जाऊन श्रमदान करावं असं आवाहन अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी पुण्यात बोलताना केलं. यासाठी jal mitra.paanifoundation.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी असंही त्यांनी सांगितलं.पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, यासाठीच्या पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आलं. 'महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एवढी ताकद आहे की, लोक स्वतःहून पाण्याची अडचण सोडवतील. याबद्दल मला विश्वास वाटतो. पुढील पाच वर्षात पानी फाऊंडेशनची गरज वाटू नये,' असं मत आमीरनं व्यक्त केलं. केवळ ग्रामीण भागातील पाणलोट क्षेत्रातील कामावर थांबणार नसून भविष्यात शहरातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही आमीरनं सांगितलं. स्वदेस चित्रपटातून या कामासाठी प्रेरणा मिळाली का, असं विचारले असता, अद्याप स्वदेस पाहिला नसल्याचं उत्तर आमीरनं दिलं. पानी फाऊंडेशनची संकल्पना सत्यमेव जयते या कार्यक्रमातून आली. या कार्यक्रमाचं तिसरं पर्व झाल्यानंतर एका विषयावर सखोल काम करण्याचा विचार होता आणि आम्ही पाणी व महाराष्ट्र या विषयावर संशोधन करून अडचणी समजून कामाला सुरुवात केली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सिम्बॉयसिसचे डॉ. शं. ब. मुजुमदार, विद्या येरवडेकर, संजीवनी मुजुमदार उपस्थित होते.महाराष्ट्रातल्या 1 कोटी 10 लाख लोकांनी 1 मे रोजी आयोजित केलेल्या महाश्रमदानात सहभागी व्हावं, असा आमचा संकल्प असल्याचं सत्यजित भटकळ यांनी सांगितलं. शहरी आणि ग्रामीण लोकांचं भावनिक नातं निर्माण व्हावं, असाही यामागचा उद्देश असल्याचं भटकळ म्हणाले. महाश्रमदानासाठी किती पैसा खर्च झाला, हा मुद्दा नसून त्यात किती लोक सहभागी झाले, हे महत्त्वाचं असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं.   

टॅग्स :Aamir Khanआमिर खान