शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

अतिवृष्टी झाली तर या १७ गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

(स्टार ९७४ डमी) पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यातील ठरविक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ ...

(स्टार ९७४ डमी)

पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यातील ठरविक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांना अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मावळ, मुळशी, भोर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांतील १७ गावे दरडप्रवण म्हणून शासनाने घोषित केली आहेत. अतिवृष्टी झाल्यास या गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील धोकादायक किंवा दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली आहे. तसेच या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या गावातील लोक गाव सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न देखील अद्यापही प्रलंबित आहे.

-----

* जिल्ह्यातील दरडप्रवण धोकादायक असलेली गावे

मावळ तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गबालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी आणि लोहगड, तर भोर तालुक्यातील कोर्ले-जांभुळवाडी, पांगारी-सोनारवाडी, धानवली आणि हेडेन, आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी, मुळशी तालुक्यातील घुटके, खेड तालुक्यातील भोमाळे आणि जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी

-----

* जिल्ह्यातील पुराचे पाणी साचणारी ठिकाणे

पुणे जिल्ह्यात देहु, आळंदी, राजगुरूनगर, शेलपिंपळगाव, डोंगरगाव, पिंपरी सांडस, मांजरी, थेऊर, शिरूर आदी गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यास पुराचे पाणी आतमध्ये शिरू शकते. त्यामुळे या गावातील अतिक्रमणे काढून नदीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा पूरपरिस्थिती आणखि धोकादायक बनू शकते.

-----

* पाणी साचण्याची कारणे

या नदीकाठच्या गावांमध्ये मुख्यत: अतिक्रमण हा मुख्य मुद्दा आहे. अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा निमार्ण होत आहे. तसेच भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, घोडनदी, मुळा, मुठा या नद्यांवर उभारलेल्या पुलांची उंची मयार्दित असल्यामुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत आहे. पुराचे पाणी वेगाने जात नाही. त्यामुळे हे पाणी आजुबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरत आहे.

-----

* पाऊस नको नको सा !

१) आमचे गाव दरडप्रवण म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे दरवषी पावसाळ्यात आम्हाला भितीच्या छायेखालीच राहावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यास आमच्या गावाला धोका आहे. भविष्यात धोकादायक घटना होऊ नये यासाठी शासनाने गावांचा पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- एक नागरिक, मोरमारेवाडी