शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

अतिवृष्टी झाली तर या १७ गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

(स्टार ९७४ डमी) पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यातील ठरविक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ ...

(स्टार ९७४ डमी)

पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यातील ठरविक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांना अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मावळ, मुळशी, भोर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांतील १७ गावे दरडप्रवण म्हणून शासनाने घोषित केली आहेत. अतिवृष्टी झाल्यास या गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील धोकादायक किंवा दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली आहे. तसेच या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या गावातील लोक गाव सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न देखील अद्यापही प्रलंबित आहे.

-----

* जिल्ह्यातील दरडप्रवण धोकादायक असलेली गावे

मावळ तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गबालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी आणि लोहगड, तर भोर तालुक्यातील कोर्ले-जांभुळवाडी, पांगारी-सोनारवाडी, धानवली आणि हेडेन, आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी, मुळशी तालुक्यातील घुटके, खेड तालुक्यातील भोमाळे आणि जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी

-----

* जिल्ह्यातील पुराचे पाणी साचणारी ठिकाणे

पुणे जिल्ह्यात देहु, आळंदी, राजगुरूनगर, शेलपिंपळगाव, डोंगरगाव, पिंपरी सांडस, मांजरी, थेऊर, शिरूर आदी गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यास पुराचे पाणी आतमध्ये शिरू शकते. त्यामुळे या गावातील अतिक्रमणे काढून नदीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा पूरपरिस्थिती आणखि धोकादायक बनू शकते.

-----

* पाणी साचण्याची कारणे

या नदीकाठच्या गावांमध्ये मुख्यत: अतिक्रमण हा मुख्य मुद्दा आहे. अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा निमार्ण होत आहे. तसेच भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, घोडनदी, मुळा, मुठा या नद्यांवर उभारलेल्या पुलांची उंची मयार्दित असल्यामुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत आहे. पुराचे पाणी वेगाने जात नाही. त्यामुळे हे पाणी आजुबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरत आहे.

-----

* पाऊस नको नको सा !

१) आमचे गाव दरडप्रवण म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे दरवषी पावसाळ्यात आम्हाला भितीच्या छायेखालीच राहावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यास आमच्या गावाला धोका आहे. भविष्यात धोकादायक घटना होऊ नये यासाठी शासनाने गावांचा पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- एक नागरिक, मोरमारेवाडी